Quantcast
Channel: श्रध्दा-संस्कृती – Prahaar.in
Viewing all 1081 articles
Browse latest View live

श्री स्वामी समर्थ : ध्यासाची आली प्रचिती

$
0
0
samarath

प्रदीर्घ काळापासून मी दिंडोरीप्रणीत मार्गातील एक सामान्य सेवेकरी. सुरुवातीला सेवा कशी करायची हेच माहीत नव्हते, तर सेवामार्ग म्हणजे काय? ही तर फार अवघड गोष्ट होती, असो.

samarathडोंबिवली शहरात ब्र. भु. प. पू. मोरे दादांची अनेक हितगुजं झाली, पण ती श्रवण करण्याचे भाग्य कधीच लाभले नाही. मी डोंबिवली (पश्चिम) येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयाजवळील श्री दत्त मंदिरात दर गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजता आरतीला जात होतो. आरतीनंतर संबंधितांचे मार्गदर्शन व नंतर प्रसाद घेऊन मार्गस्थ होत असे.

एप्रिल १९८८मधील ही सत्य स्थिती, वार गुरुवार होता, संध्याकाळची नेहमीची आरती व त्यानंतर मार्गदर्शनाची वेळ व मार्गदर्शन करणारी व्यक्ती व केंद्रातील प्रत्येक व्यक्ती रडत होती. एकच हंबरडा होता,

‘‘मोरे दादांचे महानिर्वाण झाले व दादा सर्वाना सोडून गेले.’’

क्षणभर खूपच भांबावून गेलो, प्रसाद न घेताच घरी गेलो, रात्रभर झोप लागत नव्हती, कोण दादा? ही कोणी सामान्य व्यक्ती असूच शकत नाही व माझ्या आयुष्यात दादासाहेब कोण हा एकच ध्यास लागला. ‘‘तेजोनिधी’’ ग्रंथ हातात पडल्यावर दादा म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थाचे रूप होते हे लक्षात आले. परंतु त्यांचे दर्शनसुद्धा लाभले नाही याची खंत मनात होती.

हळूहळू कार्याचा अभ्यास व मागोवा घ्यायला सुरुवात केली. अचानक वीस वर्षानंतर प.पू. गुरुमाऊलींकडे जाण्याचा योग आला. तो म्हणजे नाशिकचे बाजीराव सोनावणे, पत्रकार यांच्यामुळेच. ध्यासापोटी व आंतरिक जिव्हाळ्याने डोंबिवलीत नवीन दोन साप्ताहिक सेवा केंद्रांच्या निर्मितीचे भाग्य लाभले व प. पू. गुरुमाऊलींकडे येणे- जाणे वरचेवर वाढीस लागले.

एक दिवस प. पू. गुरुमाऊलींकडे बसलो होतो. प.पू. गुरुमाऊलींनी मी काही न विचारताच, माझ्या अंत:करणातील विषयाला सुरुवात केली. ब्रह्मीभूत प.पू. मोरेदादा कोण होते व चर्चा करीत असताना डोंबिवलीचा विषय, दादासाहेबांचे डोंबिवलीवर खूप प्रेम होते व डोंबिवली म्हणजे दादासाहेबांची ओसरी होती. व प.पू. गुरुमाऊलींच्या डोळ्यातून अश्रू आले. ते अश्रू बरेच काही सांगून गेले.

त्या दिवसापासून एकच ध्यास होता, तो म्हणजे, डोंबिवलीत त्रिकाल आरती केंद्र व्हायलाच हवे. ब्रह्मीभूत प.पू. मोरेदादा, प.पू. गुरुमाऊली व मा. श्री. चंद्रकांतदादा ही सर्वच श्री स्वामी समर्थ महाराजांची विविध रूपे, फक्त पोषाख बदलला. प.पू. गुरुमाऊलींना पुनश्च डोंबिवलीत त्रिकाल आरती केंद्रासाठी विनंती केली, त्यावर प.पू. गुरुमाऊलींनी सांगितले, ‘‘कामाला लागा, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा. जागा कोणीही देईल. काळजी करू नका.’’

१ मे २०१२ रोजी चंद्रकांतदादांचे हितगुज ठाकूर हॉल, डोंबिवली (पूर्व) येथे आयोजित केले होते. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी नव्याने सुरू झालेल्या राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व) सेवा केंद्राने घेतली होती. योगायोग म्हणजे दादासाहेबांच्या हातूनच त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सहा फूट उंचीच्या फोटो प्रतिमेची पूजा व स्थापना राजाजी पथ सेवा केंद्रात झाली.

त्या दिवशी चंद्रकातदादांच्या मुखातून शब्द आले की, ‘‘आजपासून श्री स्वामी समर्थ महाराज पुनश्च डोंबिवलीतील राजाजी पथ सेवा केंद्रात स्थानापन्न झाले. हितगुजाचे वेळी, प.पू. मोरेदादांच्या आठवणीने आ. चंद्रकांतदादांना पण गहिवरून आले. रविवार २३ जून २०१३ रोजी वटपौर्णिमेच्या शुभदिनी शेवटच्या आरतीस प्रारंभ झाला व साप्ताहिक सेवा केंद्राचे त्रिकाल आरती सेवा केंद्रात रूपांतर झाले.

एका वर्षात साप्ताहिक सेवा केंद्राचे रूपांतर त्रिकाल आरती केंद्रात होणे ही किमया अर्थातच चंद्रकांतदादांचा चरणस्पर्श या वास्तूस झाल्यामुळेच घडून आली. योगायोग म्हणजे १९८८ ते २०१३ या तब्बल २५ वर्षापूर्वीचा सेवा केंद्राचा ध्यास पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची ही जागा म्हणजे श्री दत्त मंदिराची ओसरी, साक्षात दत्त महाराजांनी ब्र.भु.प.पू. मोरेदादांना त्यांची स्वत:ची ओसरी दिली.

प. पू. दादासाहेबांच्या ओसरीचे स्वप्न ध्यासातूनच साकार झाले. धन्य प. पू. गुरुमाऊली व आ. चंद्रकांतदादा. ‘‘अहंकाराचा वार न लागो मज’’ ही श्री स्वामी समर्थ चरणी त्रिवार प्रार्थना.

‘‘कर्ता आणि करविता तुज एक स्वामीनाथा, माझिया ठायी वार्ता मीपणाची नसो’’
श्री दत्त मंदिराच्या वास्तूचे मालक भगत परिवार व सर्व नवीन भाग्यवान सेवेकरी यांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले.


सत्कर्माची फळे झाडे। लाविन मी जिकडे तिकडे।।

$
0
0
shri swami samarath

संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या जीवनाचा आलेख पाहिला, अभ्यासला तर असे दिसून येते की हा अवलिया आपल्याच मस्तीत गुंग झालेला होता. 

shri swami samarathसंतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या जीवनाचा आलेख पाहिला, अभ्यासला तर असे दिसून येते की हा अवलिया आपल्याच मस्तीत गुंग झालेला होता. दिगंबर अवस्थेत राहणा-या या अवलियाने सदैव मानवतेची ध्वजा उंचावण्यासाठी जे करता येईल ते करत आपल्याला स्वामी किंवा संत महाराज या उपाधी देऊन समाजात मान्यता मिळावी अशी वृत्ती बाळगून या कलंदर अवलियाने कधी वागणूक ठेवली नाही. पण चंदनाच्या झाडाला आपण सुगंधी असल्याचा डोंगारा पिटावा लागत नाही, तसेच या संतश्रेष्ठाचे झाले. फार मोठया संख्येने भक्तांचे थवे शेगावी दाखल होऊ लागले. बंकटलालच्या घरात या भक्तांच्या गर्दीमुळे महाराज न्हाऊन गेले.

कोणाचे लक्ष आपल्याकडे नाही हे लक्षात घेऊन शेगाव नगरीतून महाराज निघून गेले. महाराजांचे चालणे वायुगतीचे, पिंपळगावच्या अलीकडील असलेल्या अरण्यात पडक्या शिवमंदिरात पद्मासन घालून महाराज ध्यानमग्न झाले. या मंदिराजवळच वाहणारा ओढा होता, तेथे आपल्या चरणा-या गुरांना पाणी पिण्यासाठी गुराख्याच्या मुलांनी ओढयावर आणले. त्या पडक्या शिवमंदिरात ध्यानस्थ असलेला योगी पुरुष पाहून या गुराख्याच्या मुलांना आश्चर्य वाटले. हा योगीपुरुष हलवले, आवाज दिला तरी जागा होईना.

मुलांनी विचार केला याला भूक लागली असावी? जवळची भाकर त्यांच्या तोंडासमोर धरली तरी तो खाईना, त्याचे ध्यान आता होईल, मग होईल असा विचार करून मुले थांबली. संध्याकाळ होण्यापूर्वी गावात पोहोचले पाहिजे म्हणून गुरे घेऊन मुले निघाली. भाकरी योगी पुरुषाच्या पुढे तशीच ठेवलेली. गावात गेल्यानंतर मुलांनी ध्यानस्थ योग्याची गोष्ट सांगितली.

दुस-या दिवशी सकाळी पिंपळगावचे गावकरी त्या पडक्या शिवमंदिरात दाखल झाले. तो ध्यानमग्न योगी तसाच बसलेला आढळला. कालची भाकरी त्याच्या पुढयात पडलेली होती. योगी काही बोलेना, डोळे उघडेना. योगी समाधी अवस्थेत आहे. त्याला गावात नेण्याचा निर्णय गावक-यांनी घेतला. ढोल-ताशे लावून मिरवणुकीने योगी पुरुषाला मारुती मंदिरात नेऊन बसविले. मंगळवारी शेगावच्या बाजारात पिंपळगावकरांनी या गोयी पुरुषाची गोष्ट शेगावकरांना सांगितली. ती गोष्ट कळताच बंकटलालने सपत्निक पिंपळगावला जाऊन त्या योगी पुरुषाचे दर्शन घेतले.

महाराज तुम्ही शेगाव सोडू नका. तुमचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नाचा कण पोटी न घेणारे तुमचे भक्त शेगावी उपाशी आहेत, असे सांगून बंकटलालने पिंपळगावच्या लोकांना समजाविले. पिंपळगावचा सावकार बंकटलाल असल्यामुळे सा-यांनी त्याचे ऐकले. महाराज बंकटलालला म्हणाले, तुझ्याकडे तू लक्ष्मी कोंडून ठेवली तेथे मी का राहावे? बंकटलालने विनयाने उत्तर दिले. तुम्ही तेथे आहात म्हणून तिची कृपा माझ्यावर आहे. महाराज शेगावी परतले, पण १५ दिवस होत नाही तर पुन्हा त्यांनी शेगाव सोडले. अडगाव येथे जाण्यासाठी ते निघाले.

ते वैशाखाचे दिवस होते. सूर्य आग ओकत होता. घामाने ओथंबलेली शरीरे घेऊन लोकांचे व्यवहार चाललेले. दिगंबर असलेल्या महाराजांना उन्हाचा ताप जाणवत होता, त्यात संतश्रेष्ठ गजाननाला तहान लागली, घशाला कोरड पडलेली. महाराज पाण्यासाठी वणवण हिंडत राहिले. कोरडया विहिरी, पाण्याचा मागमूस कुठेही दिसेना तेवढयात एका झाडाखाली पाण्याची घागर ठेवलेली त्यांना दिसली, पाण्यासाठी व्याकूळ झालेले गजानन त्या घागरीच्या दिशेने धावले.

घागरींना हात लावणार तेवढयात शेतात पाणी घालणारा शेतकरी भास्कर वसकला, माझ्यासाठी मी पाणी आणले, त्याला हात लावू नको. पाणी पाजणे हे पुण्यकर्म आहे, असे महाराजांनी म्हणताच, लंगडया- लुळ्यांना पाणी देणे महत्त्वाचे. तू धडधाकड दिसतोस, तू जाऊन पाणी शोध, पुण्याईच्या गोष्टी तू मला सांगू नको, असे भास्करने खडसावले.

महाराजांनी दृष्टी फिरविली. थोडयाच अंतरावर त्यांना एक पडकी विहीर दिसली. विहिरीच्या दिशेने ते चालत असताना भास्कर ओरडला, विहिरीला पाण्याचे टिपूस नाही, म्हणून घरून पाण्याची घागर आणावी लागते. महाराजांनी त्याच्याकडे पाहिले विहिरीत महाराज उतरले विहिरीचे तापलेले खडक पायाला चटके देऊ लागले. कुठेही पाण्याची ओळ सुद्धा नव्हती.

रणरणत्या उन्हात पुन्हा विहिरीच्या काठावर महाराज आले. पाण्यासाठी कासावीस झालेल्या महाराजांनी एका झाडाखाली आसन मांडले. त्या सर्वसाक्षी ईश्वराची आराधना करीत पाण्यावाचून त्रस्त असलेल्या लोकांना परमेश्वरांनी पाणी द्यावे, म्हणून कळवळून प्रार्थना केली. दासगणूंनी श्री गजानन विजय ग्रंथात,

ऐसे विनविता ईश्वरा। विहिरीलागी फुटला झरा।
उफाळ्याचा साजिरा। विहीर भरली क्षणामध्ये।।

अशी ओवी लिहिलेली आहे. पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीचे पाणी समाधानाने महाराज पिऊ लागले. ते पाहताच भास्कर चक्रावला. त्याने समर्थ गजाननाचे पाय धरले. ही प्रपंचमाया खोटी असून सद्गुरुनाथा मी तुम्हाला शरण आलो आहे. महाराजांनी, तुझ्यासाठी विहिरीला पाणी आणले तू आता बगीचा लाव.

भास्कर म्हणाला, साक्षात्काराचा सुरुंग लावून तुम्ही हा खडक फोडला. भावाचे लागलेले उदक घेऊन भक्तीपंथाचा मळा मी फुलवीन अशी मानसिकता साक्षात्कार होताच भास्कराची बनली.अवलिया असलेले गजानन हा भक्तीचा मळा फुलविण्यासाठीच इतरत्र फिरत होते.
माऊलीने पसायदानामध्ये जे मागणे मागितले तेच संतश्रेष्ठ गजानन महाराजांनी साकारले.

चला कल्पतरूंचे आरव।
चेतना चिंतामणीचे गाव।
बोलते जे आर्णव। पियुषांचे।।

नैवेद्य म्हणजे काय?

$
0
0
onam

देवाला निवेदनीय असे जे द्रव्य ते द्रव्य म्हणजे नैवेद्य होय. म्हणजे ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी, त्याला देता येण्यासारखी खाद्य वस्तू, खाद्य पदार्थ म्हणजे नैवेद्य असे आपण म्हणू या.

onam

‘तंत्रसार’ या ग्रंथात पुढे दिल्याप्रमाणे नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा किंवा असू शकतो.
त्यात म्हटले आहे की,

‘‘नैवेदनैय असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे. ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे. त्यालाच ‘नैैवेद्य’ म्हणतात.

भक्ष्य – गिळता येण्यासारखे,
भोज्य – चावूनै खाता येईल असे,
लेह्य – चाटता येईल असे,
पेय – पिता येईल असे आणि
चुष्य – चोखता येईल..
असे ते पाच प्रकार आहेत.
असा हा पंचविध नैवेद्य देवाची पूजा करूनै त्याला समर्पावा.’’

तंत्रासारातील मूळ श्लोक पुढीलप्रमाणे-

नैवेदनैय यद द्रव्यं,
प्रशस्तं प्रयतं तथा
तद भक्ष्यार्हम पंचविधं
नैवेद्यमिति कथ्यते।
भक्ष्यं, भोज्यं च लेह्यं च,
पेयं चुष्यं च पंचममे
सर्वत्र चैतनैवेद्यमाराध्यास्यै नैिवेदयेत
विष्णूला दुधभात,
शिवाला दहीभात,
गणपतीला मोदक अथवा गूळखोबरे,
सूर्याला गूळभात आणि
देवीला सांजा (तिखट सांजा नैाही. गोडाचा सांजा म्हणजेच शिरा.) किंवा श्रीखंड प्रिय आहे.
दूध आणि फळे सर्व देवांनैा प्रिय आहेत.

नैैवेद्य कसा दाखवतात?

»  नैवेद्य दाखवतानैा देवापुढे चौकोनैी मंडळ करूनै त्यात पुनै्हा ७ असे चिनै्ह करूनै मग त्याच्यावर नैवेद्याचे ताट, भांडे, पात्र ठेऊनै मग नैवेद्य दाखवावा.

»  या पात्रावर तुलसीपत्र ठेऊनै मगच तो नैवेद्य देवाला अर्पण करावा.

»  तुलसीपत्र ठेवले की, ‘माझा यावरचा अधिकार संपला आहे आणि आता हे पूर्णत: तुझे आहे’, हा भाव व्यक्त होतो आणि आपला अधिकार संपतो.

»  सोन, रूपे, तांबे, दगड, कमलपत्र आणि यज्ञीय लाकूड यापैकी एका पात्रात ठेऊनै नैवेद्य दाखवावा असे सांगितले गेलेले आहे.

»  नैवेद्य देवाच्या उजव्या हाताला ठेवावा. डाव्या हाताला ठेवल्यास तो अभक्ष्य म्हणजे खाण्यास अयोग्य होतो.

»  तुलसीपत्र, दुर्वा किंवा पुष्प यांनैी नैवेद्याचे प्रोक्षण करावे. म्हणजे यांनैी नैवेद्यावर पाणी शिंपडावे म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास, अर्पण करण्यास योग्य होतो.

»  मग नैवेद्याचे पात्राभोवती डावीकडूनै उजवीकडे असे आपल्या उजव्या हातानैे पाणी सोडत मंडल करत यावे.

»  नंतर ‘‘प्राणाय स्वाहा, अपानैाय स्वाहा, व्यानैाय स्वाहा, उदानैाय स्वाहा, समानैाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा’’असे म्हणत म्हणत नैवेद्याचा घास देवाच्या मुखाकडे न्यावा. त्यावेळी आपला डावा हात आपल्या हृदयाजवळ असावा, मान झुकलेली असावी. असे करून झाले की, ‘मध्ये पानैयं समर्पयामि’असे म्हणून उदक द्यावे. म्हणजे पाणी द्यावे म्हणजे पाणी जवळ न्यावे अथवा ताम्हनात सोडावे.

मग पुन्हा वरचा हा ‘स्वाहा’ मंत्र म्हणत म्हणत ज्या देवतेला तो नैवेद्य दाखवायचा असेल त्या देवतेचे नाव घेत(इथेविशिष्ट देवतेचे नाव घेत नसल्याने मी अमुक देवताभ्यो म्हणत आहे) ‘अमुक देवताभ्यो नैम: नैवेद्यं समर्पयामि’असे म्हणावे आणि ताम्हनात उदक सोडावे. [उदक म्हणजे पाणी] महानैवेद्य हा पुरण, वरण, पक्वनै्नै, भाज्या, कोिशबिरी इत्यादी षडरस अनै्नैाचा असावा.

नैवेद्य दाखवून झाल्यावर देवाची आरती करावी.

नैैवेद्य दाखवून झाला की जो पदार्थ असेल त्याचे ‘प्रसादात’ रूपांतर होते. त्यामुळे मी देवाला प्रसाद दाखवतो आहे असे म्हणता येत नाही तर मी देवाला नैवेद्य दाखवतो आणि तुला त्याचा प्रसाद देतो हे योग्य आहे. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण तो लगेच स्वत:ही खाऊ नैये आणि इतरांना लगेच वाटू सुद्धा नये.

थोडा वेळ तो देवापुढे तसाच ठेवा. हां, पण झुरळे, पाली, उंदीर, माशा, मुंग्या यांचा त्याला उपद्रव होत नैाही नैा हे पाहणे अगत्याचे आहे हे सांगायला नैकोच.

आपल्याला प्रत्यक्ष नैवेद्य दाखवता येत नैसेल तर आपण मानैस पूजा करूनै त्यामध्ये आपल्याला हवा तो नैवेद्य प्रभूला अर्पण करू शकतो आणि या मानैस पूजेमध्ये प्रचंड शक्ती आहे. अगदी प्रत्यक्ष पूजेपेक्षाही. कारण आपण त्यावेळेला देवाशी पूर्णत: एकरूप होऊनै जातो.

मनाला प्रयत्न करून मानस पूजेचे चित्र रंगवावे लागते आणि मनैाला मग हळूहळू असा हा शांतीरूप आकार यायला लागतो आणि मग आपले जीवनैच पवित्र, सुगंधी बनैूनै जाते.

आपला देह हा देवाचे मंदिर होतो आणि आत आत्मा परमेश्वर आहे हे आकळायला लागते.

स्मरण योग्य सुंदर मंत्र।

$
0
0
diva 2

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविन्द: प्रभाते करदर्शनम्।।

diva 2प्रात: कर-दर्शनम्

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती।
करमूले तू गोविन्द: प्रभाते करदर्शनम्।।

पृथ्वी क्षमा प्रार्थना

समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडिते।
विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्र्पश क्षमश्वमेव।।

नवग्रह स्मरण

ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरान्तकारी भानु: शशी भूमिसुतो बुधष्टद्धr(155)।
गुरु शुक्र: शनिराहुकेतव: कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्।।

स्नान मंत्र

गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती।
नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरू।।

सूर्यनमस्कार

ॐ सूर्य आत्मा जगतस्तस्युषश्च
आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने।
दीर्घमायुर्बलं र्वीय व्याधि शोक विनाशनम्
सूर्य पादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहम्?

ॐ मित्राय नम:
ॐ रवये नम:
ॐ सूर्याय नम:
ॐ भानवे नम:
ॐ खगाय नम:
ॐ पूष्णे नम:
ॐ हिरण्यगर्भाय नम:
ॐ मरीचये नम:
ॐ आदित्याय नम:
ॐ सवित्रे नम:
ॐ अर्काय नम:
ॐ भास्कराय नम:
ॐ श्री सवितृ सूर्यनारायणाय नम:
आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदमम् भास्कर।
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तु ते।।

दीप दर्शन
शुभं करोति कल्याणम्
आरोग्यम् धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोस्तु ते।।
दीपो ज्योति परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोस्तु ते।।

गणपती स्तोत्र

गणपती: विघ्नराजो लम्बतुन्डो गजानन:।
द्वै मातुरश्च हेरम्ब एकदंतो गणाधिप:।।
विनायक: चारुकर्ण: पशुपालो भवात्मज:।
द्वादश एतानि नामानि प्रात: उत्थाय य: पठेत्।।
विश्वम तस्य भवेद् वश्यम् न च विघ्नम् भवेत् क्वचित्।

विघ्नेश्वराय वरदाय शुभप्रियाय।
लम्बोदराय विकटाय गजाननाय।।
नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय।
गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते।।

शुक्लाम्बरधरं देवं शशिर्वण चतुर्भुजं।
प्रसन्नवदनं ध्यायेतसर्वविघ्नोपशान्तये।।

आदिशक्ती वंदना

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते।।

शिव स्तुती

कर्पूर गौरम करुणावतारं,
संसार सारं भुजगेन्द्र हारं।
सदा वसंतं हृदयार विन्दे,
भवं भवानी सहितं नमामि।।

विष्णु स्तुती

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम्।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिध्र्यानगम्यम्
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।।

कृष्ण स्तुती

कस्तुरी तिलकम ललाटपटले, वक्षस्थले कौस्तुभम।
नासाग्रे वरमौक्तिकम करतले, वेणू करे कंकणम।।
सर्वागे हरिचन्दनम सुललितम, कंठे च मुक्तावलि।
गोपस्त्री परिवेश्तिथो विजयते, गोपाल चूडामणी।।

मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम्।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम्।।

श्रीराम वंदना

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये।।

श्रीरामाष्टक

हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा।
गोविन्दा गरुडम्ध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा।।
हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते।
बैकुण्ठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहिमाम्।।

एक श्लोकी रामायण

आदौ रामतपोवनादि गमनं हत्वा मृगं कांचनम्।
वैदेही हरणं जटायू मरणं सुग्रीवसम्भाषणम्।।
बालीनिर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदाहनम्।
पश्चाद्रावण कुम्भकर्णहननं एतद्घि श्री रामायणम्।।

सरस्वती वंदना

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वींणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपदमासना?
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता।
सा माम पातु सरस्वती भगवती
नि:शेषजाड्या पाहा।।

हनुमान वंदना

अतुलितबलधामं हेमशैलाभदेहम्।
दनुजवनकृषानुम् ज्ञानिनांग्रगणयम्।
सकलगुणनिधानं वानराणामधीशम्।
रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि।।

मनोजवं मारुततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।।

स्वस्ती-वाचन

ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा:
स्वस्ती न: पूषा विश्ववेदा:।
स्वस्ती नस्र्ताक्ष्यो अरिष्ट्टनेमि:
स्वस्ती नो बृहस्पतिर्दधातु।।

शांतिपाठ

ऊँ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।
ॐ द्यौ: शान्तिरन्तरिक्ष (गुँ) शान्ति:,
पृथिवी शान्तिराप: शान्तिरोषधय: शान्ति:।
वनस्पतय: शान्तिर्वश्वि देवा: शान्तिब्र्रह्म शान्ति:,
सर्व (गुँ) शान्ति:, शान्तिरेव शान्ति:, सा मा शान्तिरेधि।।
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:

सत्यनारायण मंदिर!

$
0
0
satyanarayan_pic2

रत्नागिरी डोंगरात वसलेले प्रसिद्ध मंदिर राजमहेंद्री आणि वैझाग विमानतळापासून फक्त ८० किलोमीटर अंतरावर असणा-या सत्यनारायण मंदिराची ही माहिती.

satyanarayan_pic2सत्यनारायण मंदिर हे देशातील काही पवित्र ठिकाणांपैकी एक समजले जाते. आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात अन्नावरम इथे हे मंदिर वसलेले असून ते सर्वत्र पूजल्या जाणा-या भगवान सत्यनारायणांचे मंदिर आहे. दररोज हजारो भक्तगण या पवित्र ठिकाणी येऊन सत्यनारायणाची पूजा करतात आणि देवाचे आशीर्वाद घेतात. दररोज सकाळी सहा ते संध्याकाळी सहादरम्यान इथे पूजा केली जाते.

सणासुदीच्या काळात सत्यनारायणाची पूजा रात्रीपर्यंत चालते. मंदिरात प्रशस्त सभागृह असून एका वेळेस हजारो लोकांना तिथे सत्यनारायणाची पूजा करता येते. मंदिरातर्फे राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम सुविधाही केली जाते.

गव्हाच्या पिठापासून तयार केला जाणारा सत्यनारायण प्रसाद अतिशय रुचकर असतो आणि सर्वाना आवडतो. पर्यटकांना मंदिर प्रशासनातर्फे चालवली जाणारी गोशाळा (पवित्रगाईचे स्थान), वेद पाठशाला, आयुर्वेद पाठशाळा आदी ठिकाणेही पाहता येतात. भगवान सत्यनारायण मंदिराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचे ठिकाण, जे विशाखापट्टणम विमानतळापासून जवळ असून हे शहर भारतातील सर्व प्रमुख शहरांशी हवाई, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीने जोडले गेलेले आहे.

राजामहेंद्री हे पर्यटकांनी नावाजलेले आंध्र प्रदेशमधील आणखी एक ठिकाण असून तिथे बॅकवॉटर्स, पामच्या झावळ्यांनी नटलेले िदडीचे कालवे, गोदावरी नदी जिथे बंगालच्या खाडीला मिळते, तिथल्या पपिकोंडालू ते अंतरवेदी मार्गावरील हाऊसबोट्स अशा विविध गोष्टी पर्यटकांना अनुभवायला मिळतात. गोदावरी नदीसाठी दररोज केली जाणारी हराती प्रथा ही पाहण्यासारखी असते.

भस्म स्नान का करावे?

$
0
0
shiva

भस्म लावले की अंगाला येणारा घाम शोषून घेतला जातो. त्वचेच्या खाली असणारी विषारी द्रव्येदेखील ही राख शोषून घेते, म्हणूनच जलोदर, पायांना येणारी सूज, पार्श्वशूल, छातीत वाढणारे पाणी इ. जल महाभूत विकृती जन्य आजारात भस्मस्नान (लेपन) हे चिकित्सास्वरूप आहे. भस्म लावले की अंगाला येणारा घाम शोषून घेतला जातो. त्वचेच्या खाली असणारी विषारी द्रव्येदेखील ही राख शोषून घेते, म्हणूनच जलोदर, पायांना येणारी सूज, पार्श्वशूल, छातीत वाढणारे पाणी इ. जल महाभूत विकृती जन्य आजारात भस्मस्नान (लेपन) हे चिकित्सास्वरूप आहे. राखेमध्ये शोषक गुण जास्त आहे. जिथे पाणी जास्त आहे, तिथे राख वापरली की पाणी शोषून घेतले जाते.

shivaभस्म स्नान – यज्ञात तयार झालेल्या भस्माने स्नान. आंघोळीचे वेगवेगळे प्रकार ग्रंथात वाचायला मिळतात.

भस्म लावले की अंगाला येणारा घाम शोषून घेतला जातो. त्वचेच्या खाली असणारी विषारी द्रव्येदेखील ही राख शोषून घेते, म्हणूनच जलोदर, पायांना येणारी सूज, पार्श्वशूल, छातीत वाढणारे पाणी इ. जल महाभूत विकृती जन्य आजारात भस्मस्नान (लेपन) हे चिकित्सास्वरूप आहे.

राखेमध्ये शोषक गुण जास्त आहे. जिथे पाणी जास्त आहे, तिथे राख वापरली की पाणी शोषून घेतले जाते. मग शरीरात साठलेल्या पाण्याला बाहेरून लावलेली राख का शोषून घेणार नाही?

ही राख अंगाला लावायची. संध्या करणारे ब्राह्मण अंगाला भस्माचे पट्टे नाही का लावत!

जिथे घाम साठतो, अशा ठिकाणी हे भस्म लावले जाते. आपण कोणतीही टाल्कम पावडर कशी लावतो ? उन्हाळ्यात घामोळ्याची पावडर कशी लावतो ? फक्त द्रव्य बदलले. वास आणि आवरण. अगदी त्याच हेतूने हे भस्म लावले जात असावे.

या भस्मामध्ये आणखी एक विलक्षण गुण आहे. तापमान स्थिर ठेवण्याचा. म्हणून भोलेनाथ शंकर हिमालयात केवळ व्याघ्राजीन लपेटून राहतात आणि अंगाला चिताभस्म फासून घेतात. या रोजी लागणा-या भस्मासाठी एका खास माणसाची नेमणूकही करतात, ज्याला आपण भस्मासुर म्हणून ओळखतो.

आजदेखील कुंभमेळ्यात येणारे नागा साधू पाहिलेत, अंगाला भस्म लावलेले आणि पूर्णत: दिगंबरावस्थेत! वारा, थंडी यांच्यापासून रक्षण करणारी हे दिव्यौषध. कोणाला ती राख वाटेल, तर कोणाला विभूती, कोणाला मषी, तर कोणाला भस्म. गुणधर्म तर बदलणार नाहीत!

भस्म स्नान म्हणजेच ज्यांना संध्या करायची आहे, त्यांनी मुख्य आंघोळीनंतर भस्म अंगाला लावायचे आहे.

यज्ञामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींच्या लाकडाच्या ओल्या समिधा (एक वीत लांबीचे, करंगळी एवढया जाडीचे, ताज्या वनस्पतींचे तुकडे) हवन म्हणून वापरल्या जातात. यात मुख्यत्वेकरून औदुंबर, पिंपळ, रूई, दुर्वा, आघाडा, दर्भ, लव्हाळी, शतावरी, गुळवेल या वनस्पतींच्या काडया, दूध, तूप, लाह्या इ. सात्त्विक पदार्थ, रेशमी वस्त्र, केळी, तांदूळ, तीळ, नारळ आदी पदार्थ अग्नीच्या मुखात अर्पण केले जातात.

विशिष्ट मंत्रातून तयार होणा-या विशिष्ट लहरींद्वारे, विशिष्ट देवता तत्त्वापर्यंत हे हविद्रव्य पोचवले जाते. ही श्रद्धा आहे. ही द्रव्ये जाळून नष्ट करणे म्हणावे की औषधी भस्म तयार करण्यासाठी हवन करावे, असे म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, व्यवहारात भस्म फक्त ब्राह्मण वर्णातील पुरुषच लावतात.

तो एक वैदिक विधी आहे. वेदाने काही बंधने स्त्रीयांवर घातली आहेत, ती त्यांच्या काळानुसार, शरीरशक्तीनुसार, वर्णानुसार पावित्र्य जपण्याच्या क्षमतेनुसार, उच्चारातील शुद्ध-अशुद्ध समजण्याच्या कुवतीनुसार सांगितलेली आहेत. असो. विषयांतर होईल.
भस्माचे गुण लक्षात घेतले तर अंगाला लावलेले भस्म शरीरातील विजातीय (३७्रल्ल२) शोषून घेण्यास मदत करते.

वैद्यकीय व्यवहार लक्षात घेतल्यास

अंगाला आलेली सूज कमी करण्यासाठी
जलोदरासारख्या आजारात पोटातील वाढलेले पाणी कमी करण्यासाठी मदत करायला घरगुती उपाय म्हणून.
सांध्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी
अंतर्गत अवयवांना आलेली सूज कमी करण्यासाठी.

हे भस्मस्नान करू शकतो.

जशी गरज असेल तसे, पाण्यात अथवा गोमूत्रात अथवा दुधात भस्म कालवून, भगवान धन्वंतरीचे स्मरण करून, अंगाला लावावे.

साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटांत हा लेप वाळतो. काढून टाकून आणखी पंधरा मिनिटांनी गरजेनुसार पाण्याची आंघोळ करावी.

हेच भस्म दोन दोन चिमूट खाल्ले तरी आभ्यंतर शुद्धीदेखील होते. औषध हे काही गोळ्या बाटलीतीलच पाहिजे असे नाही.

आयुर्वेद सांगतो, युक्ती वापरली तर जगातील प्रत्येक वस्तू ही औषधकारणार्थ वापरता येते. असंच हे भस्म.

यज्ञात तयार झालेले हे भस्म मिळतच नसेल तर काय करावे?

गावठी, देशी गायीच्या गोव-या जाळून त्याची तयार झालेली विभूती भस्म म्हणून जरूर वापरावी.

लहान मुलांना तर याची चव खूप आवडते. वारंवार माती खाणा-या मुलांसाठी भस्म हे वरदानच आहे. आता या भस्मात कॅल्शियम किती आणि अन्य घटक किती हे शोधणे, आपले काम नव्हे.

आम्हाला परिणामांशी मतलब. शरीर सुंदर, सतेज, टवटवीत हवे आणि व्याधींशिवाय शंभर वर्षे!

मानवतेच्या कार्याची महान सेवा करावी :

$
0
0
samarath

आपण पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहोत. हळूहळू या व्यवसायात आमूलाग्र बदल होत आहे. जमिनीचे होणारे तुकडे व त्यातून वाढणा-या गरजा, वर्तमान आणि भविष्यात आपले राहणीमान यात बदल होत आहे. जमीन आम्ही कसायची व त्याला कर्जपुरवठा करेल त्याला उत्पन्न द्यायचे अशी स्थिती गेली ५० वर्षे शेतीत चालू आहे.

samarathशेती हा अतिशय महत्त्वाचा विषय निसर्गाच्या भरवशावर अवलंबून आहे. जीवसृष्टीतील प्राणी व पक्ष्यांना पावसाच्या आगमनाची चाहूल लागते, त्याचे त्याला ज्ञान आहे. परंपरेने हे ज्ञान माणसाकडेही होते. आज मात्र माणूस हे विसरत चालला आहे, अशी खंत व्यक्त करून अनेक संतांनी आपल्या अभंगातून कृषीविषयक सल्ले दिल्याचे प. पू. गुरुमाऊलींनी स्पष्ट केले.

शेतकरी बंधूंना कळकळीची विनंती आहे की, पर्जन्यदेवतेची प्रार्थना करून तिला साद घाला, तुमची हाक नक्की ऐकली जाईल. ग्रामीण भागातील पदवीधर तरुण मंडळी थोरामोठय़ांचे ऐकत नाही. आम्ही खूप मोठे झाले आहोत असे समजून व्यसनाधीन होतात.

त्यावर खात्रीचा उपाय म्हणून येत्या नववर्षापासून राज्यासह देशात आम्ही ‘ग्राम अभियान’ सुरू करीत आहोत. राज्यातील प्रत्येक तालुक्यात व गावपातळीवर श्री स्वामी समर्थ संस्कार केंद्र कामे करतात. हे काम चार भिंतींच्या आत ठेवू नका, असा उपदेश त्यांनी उपस्थित सेवेक-यांना केला.

संस्काराचे महत्त्व पटवून देताना प. पू. गुरुमाऊली म्हणाले, आज संस्काराची गरज आहे. योग्य वयात ते झाले पाहिजेत. पालकांनी त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करून चांगले संस्कार करावेत. माणूस जन्माला येताना मांसाचा गोळा म्हणून जन्माला येतो. या गोळ्यावर संस्कार करावे लागतात.

ग्राम अभियानाअंतर्गत गाव दत्तक घेऊन हा सर्व प्रयत्न करण्यात येणार आहे. यात बालसंस्कार, युवा संस्कार, वैद्यकीय सेवा, विवाह मंडळ अभियंता, वास्तुविशारद सेवा, याज्ञिकी सेवा देण्यात येईल, असे प. पू. गुरुमाऊली यांनी स्पष्ट केले.

जेव्हा माणूस स्वत:च्या पायावर उभा राहतो तेव्हा मन:शांतीची गरज भासते. मन:शांती बाजारात मिळत नाही, ती मिळते आध्यात्मातून. म्हणूनच आम्हाला शास्त्र आणि आध्यात्माची सांगड घालायची आहे.

‘गीता’ म्हणजे अमृत-सिंचन

$
0
0
geeta

गेली हजारो वर्षे भारतीय तत्त्वज्ञानाच्या अनेक मीमांसकांनी, भाष्यकारांनी, उपनिषदकारांनी, साधुसंतांनी तत्त्ववेत्त्यांनी सगळी शास्त्रे थोडा वेळ बाजूस ठेवून विश्वातील गुरुत्वाचे गीतारूपी अमृत जास्तीत जास्त सामान्यांना पाजण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे व ‘यावत चंद्र दिवाकरौ’ ही आदर्श गुरू-शिष्यांची जोडी मानवजातीला दीर्घकाल आदर्शवत राहणार आहे.

geetaपरब्रह्माने स्वत: जे जगाचे कल्याण केले त्याहूनही पांडवांच्याद्वारे सर्व दुष्टांचा नि:पात करून मागील सर्व कल्पनांना एक गोड धक्का दिला तो असा. एका विशिष्ट कार्यासाठी देवाने अवतार घेऊन ते कार्य करणे हा संकेत डावलून आपले इच्छित कार्य सामान्यांना दिलासा आणि धीर देऊन करून घेणे, त्याला पुनीत करणे नव्हे, त्याला आपल्यासारखेच बनविणे हा एक मानवजातीच्या दृष्टीने फार मोठा लाभ या गीतारूपी अमृताने झालेला आहे.

गीतेनंतर जेवढे अवतार, साधुसंत, महात्मे झाले त्यांच्यात गीतार्थ लावण्याची, गीता जीवन जगण्याची समाजाला गीतामय बनविण्याची चढाओढ सुरू झाली. गेल्या पाचहजार वर्षात असा एकही तत्त्ववेत्ता झाला नाही की ज्याने कोठलेही विवेचन करताना, बोलताना, चालताना, सांगताना गीतेचा उल्लेख केला नाही आणि म्हणून गुरुतत्त्वाचे विवेचन करताना भगवान व्यासांनी ‘कृष्णं वंदे जगत् गुरुम्’ हा भगवान श्रीकृष्णाच्या मूल्यमापनाचा एकमेव मंत्र सांगितलेला आहे व त्याची महती या एका वाक्यात आहे.

गीता हा गुरू-शिष्यांचा संवाद असून तो संवाद कुठल्याही देवळात, मंदिरात, आश्रमात, गुहेत केलेला नाही. जेथे आपले अस्तित्व राहील की नाही, अशा युद्धाच्या खणखणाटात प्रत्यक्ष काळाने समोर राहून ठाण मांडले आहे. सर्व संकल्प, विकल्प, सिद्धी या दूर गेलेल्या आहेत. फक्त मरणे अथवा मारणे एवढय़ा अति निकराच्या संग्रामी हे ज्ञानामृत भगवंताने अर्जुनाला पाजून, अर्जुनाला उद्धारून संबंध जगाच्या उद्धाराचा अमृतकलश विश्वाला प्रदान केलेला आहे आणि म्हणून आपल्याला गुरू भेटणे ही दैवाधीन गोष्ट आहे.

आपण चांगल्या कुळात जन्म न घेणे ही दैवाधीन गोष्ट आहे. आपल्याला संपत्ती मिळणे ही दैवाधीन गोष्ट आहे. पण सत् शिष्य होणे, सन्मार्गाला जाणे, जास्तीत जास्त द्वेषापासून निर्दोषापर्यंत वाटचाल करणे ही तर आपली स्वत:ची बाब आहे. जोपर्यंत मानवजात या स्वकर्तृत्वाला जवळ करत नाही तोपर्यंत विश्वात कितीही गुरू, सद्गुरू असले तरी आपले शाश्वत कल्याण होणार नाही.

गुरू कसा असावा याचा ध्यास करणे व त्या ध्यासाचे पराकोटीतच सद्गुरूचे कळत-नकळत संमेलन होत असते, म्हणूनच अर्जुनाने श्रीकृष्णाकडे युद्धाच्या मदतीची याचना करताना कृष्णाचे सर्व यादव सैन्य कौरवाकडे ठेवण्यास संमती दिली व कृष्णाजवळ एकच मागणी मागितली, ‘देवा मला तू पाहिजेस. बाकी काही नको.’ हे वाक्य जगातल्या सर्वश्रेष्ठ शिष्याचे सर्व मानजातीने आपल्या हृदयात सतत कोरून ठेवण्याचे एक शाश्वत मूल्य आहे.
ब-याच थोरा-मोठय़ांनी देवांचे, गुरूंचे, संतांचे, खूप वर्णन, महत्त्व, गुणगान, सेवा केलेल्या आहेत.

त्या प्रचंड सेवाभावाच्या ओझ्याखाली सर्वसामान्य मानव दुबळा होत चाललेला आहे. ते विशिष्ट ज्ञान, त्याची विशिष्ट अर्थसंगती ईश्वरी गुणगानामुळे स्वत:त आलेली असहाय्यता सर्व काही परमेश्वरच करतो. हा दुबळेपणा, या दुबळेपणातून निर्माण झालेल्या अंध परंपरा, संप्रदाय, सांप्रदायिक हट्ट याची बेसुमार निर्मिती झाली असून व्यक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्हीच्या अन्वयार्थात उठसूट परमेश्वराचे मोठेपणाचे केलेले गुणगान.

त्या गुणगानात वैराग्ययुक्त भक्ती, ज्ञान यांचा विसर पडून आपण स्वत: शिष्यसाधक होऊन जास्तीत जास्त वरील भक्ती वैराग्ययुक्त ज्ञानाची वाटचाल करणे जरूर आहे. त्यातून स्वच्छ असा निर्मळ मार्ग सुस्पष्ट होतो व मोक्ष गुरूनंतर फार मोठी कर्तव्ये करण्यासाठी गुरुतत्त्वाची कास धरावी लागते.

अर्जुनानंतर भक्त महादेव हे एक फार मोठे उदाहरण आहे. प्रत्यक्ष परब्रह्म स्वत: सगुण रूपात सहवासात असतानासुद्धा परमेश्वराने नामदेव महाराजांना त्यांचे साधनेतील अपूर्णत्वाची जाणीव करून देताच एवढय़ा धैर्याचा मेरूमणी नामदेव तो सुद्धा देवाशी बोलता झाला की देवा मला आता कशाचीच गरज उरली नाही. तुम्ही मला कशा करता कच्चा म्हणता.

मी आता पूर्ण पक्का झालो आहे, असे म्हणून देवाशी भांडणा-या नामदेवाला एक पक्क्या गुरूकडे पाठवावे लागले. तसेच कलियुगात पूर्णब्रह्म स्वरूपात विश्वाचे कल्याणार्थ पूर्णब्रह्म दत्त महाराज अनेक अवतार घेऊन अनेकांना उपदेशातून स्वआचरणातून मार्गदर्शन करीत स्वत: विश्वाचे गुरू असून अतिविनम्र भावाने स्वत: साधकाच्या भावात सतत गर्क होते. स्वत: गुरू असून त्यांनी सर्व जगाला गुरू केले.

‘‘जो जो ज्याला घेतला गुण
तो तो म्या गुरू केला जाण
गुरूशी आले अपारपण
जग संपूर्ण गुरू दिसे’’

असे जे विनम्र भावनेने दत्त महाराज म्हणतात ते आपल्यासारख्या जनांना सेवा. नम्रता, जिज्ञासा, अहंकार-शून्यता नकळत शिकवितात.

स्वत: गेल्या हजार वर्षात दत्त महाराजांनी अवतार घेतले, मार्गदर्शन केले. अवतारांतून गुरूपद घेतले. परंतु परसत्तेच्या सेवेत राहणारे प्रचंड प्रज्ञा व भक्ती असलेले प्रपंच व परमार्थ यांचे बरोबर परसत्तेचे दास नसलेले अगदी नाईलाजास्तव सतत मनात परसत्तेचा तिरस्कार असूनही काही विशिष्ट ध्येय धोरणासाठी ते पद भूषविणारे दौलतबादचे किल्लेदार संत शिरोमणी जनार्दन स्वामी यांचे स्वत: दत्त महाराजांनी गुरूपद घेतले.

हा एक आध्यात्मिक धर्म नीतीचा ऱ्हास चालविला आहे. त्या परसत्तेचा नाश करण्याऐवजी त्यांची चाकरी करणा-या जनार्दन स्वामींना आपल्या विशिष्ट ध्येय-धोरणाने दत्त महाराजांनी प्रसन्न करून त्यांचे गुरूपद मिळविले व एक वेगळी अशी नवी परंपरा साकार करून तेथून त्या परंपरेतून जो सत्शिष्य तयार झाला. संत एकनाथ महाराज की ज्यांचे घरी भगवान श्रीकृष्णाने स्वत:ची सेवा करून घेतली.

।। श्री स्वामी समर्थ।।


जन्म गेला धनलोभा

$
0
0
samarath

श्री स्वामीराज माऊलींच्या अवतार कार्यातील नारायण सरोवराच्या ठिकाणी घडलेली कथा आपल्यासारख्या सामान्य भक्ताला बरंच काही शिकवून जाते. गुजरात राज्यातील कच्छ प्रदेशात ‘श्रीकृष्णत्रिविक्रम’ या नावाचे क्षेत्र आहे. द्वारकेपासून थोडे दूर आहे. तेथे यात्रेच्या वेळी तीर्थकुंडात पवित्र स्नान करण्यासाठी लोकांच्याकडून पैसे घेत असत.

samarathपैशाशिवाय कुणाही भाविकाला स्नान करू दिले जात नसे. श्री महाराजांची स्वारी त्या स्नानासाठी गेली असता तेथील पुजा-याने मज्जाव केला. महाराज वितंडवाद करणा-या या कृतीला मोठय़ाने हसले आणि गुप्त होऊन थेट तीर्थातील पाण्यात प्रगटले.

‘‘उदकावरी नृसिंहमुनी बसले सिद्धासनी’’ असा उल्लेख ग्रंथकारांनी केलेला आहे. एक रात्र एक दिवस अन्न-पाण्यावीन तसेच बसून होते. असे सुंदर वर्णन या प्रसंगाचे शास्त्रकारांनी केलेले आहे. श्री. गुरुलीलामृत ग्रंथातील नवव्या अध्यायातील ही कथा किती मोठा बोध देऊन जाते पाहा.

। सामान्य प्रापंचिक माणसांविषयी विचार करूया।
जन्म गेला धन लोभात। बहुत मिळता नव्हे तृप्त।
मैंद, नोळखिले भगवंत। संते महंत विद्वज्जन।
जैसे स्मशानातील गृधकाळ।
पिंडादि भक्षति श्वानादिक।।
तीर्थक्षेत्रस्थ आम्ही लोक।
लोभी निर्लज्ज संस्थानी।।
मार्गी तस्कर सर्वस्व लुटिती।
सोडिती मारीती जीव घेती।।

व्यापरिच आमुची वृत्ती। मोठे दुर्मति आम्ही असे।। गुरुलिला।। अ.९ ओ. १२ ते १८
अनितीने, अधर्माने, अन्यायाने, धर्मशास्त्राविरुद्ध आचरण करून, चोरी करून, लुबाडणूक करून, अतिभ्रष्टाचाराने, दुस-याला दु:ख देऊन मिळविलेला पैसा हा पैसाच असतो. तो लक्ष्मीमातेचे रूप घेऊन घरात राहूच शकत नाही. तो पैसा वाममार्गानेच येतो आणि वाममार्गानेच जातो. त्याचे फळही तसेच मिळते ते कसे पाहा?

घरात आजारपण वाढेल, चिंता वाढेल, डॉक्टरांशी जवळीक होईल. अपंग, वेडे, हेकेखोरपणा, व्यसनाधीनता, दु:ख वाढत जाईल. घरातील सुख, शांती निघून जाऊन अशांती, अस्वस्थता, चिंता वाढलेली आहे असे चित्र दिसेल. ही वस्तुस्थिती भक्तांच्या लक्षात आणून देण्यासाठीच श्री महाराजांनी वरील गोष्ट घडवून आणलेली आहे.

तीर्थक्षेत्री सर्रास चाललेला हा प्रकार केवळ धनाच्या लोभापाई होतो. ही गोष्ट खरी आहे. तीर्थाच्या ठिकाणी चाललेला व्यवहार, बाजार हा महाराजांना पसंत नव्हता. त्यामुळे पुजा-याच्या प्रतिकातून अनिष्ठतेला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. तुकाराम महाराजांचे अभंगरूपी शब्द पाहा.

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।
उदास विचारे वेच करी।।

न्यायाने, नीतीने, प्रामाणिक कष्ट करून मिळविलेले धन असावे. म्हणजे ते लक्ष्मीरूपात घरात राहते. आनंद, सूख समाधान देत असते.

श्रोतेहो, लक्ष्मी म्हणजे फक्त धन, जड-जवाहिरे, बंगला, गाडी एवढंच अर्थ नाही. बरं का! धर्मशास्त्र तसे सांगत नाही. घरातील सुख, शांतता, सुबत्ता, समृद्धी, प्रसन्नता, समाधान, प्रत्येकाशी सुसंवाद, घरातील प्रत्येकाचा स्नेहभाव, सहिष्णुता, आनंदी वातावरण, सांघिकता, आदरभाव, नम्रता, एकोपा ही त्या लक्ष्मीमातेचीच चालती बोलती रूपं आहेत. लक्ष्मीमाता ही भगवान विष्णूंची धर्मपत्नी असली तरीही ती त्यांच्या चरणसेवेसाठीच तत्पर असते हे लक्षात ठेवले पाहिजे.

लक्ष्मी या शब्दाची फोड करून पाहा (लक्ष + मी) मीपणा म्हणजे अहंकार विसरून जिथे लक्ष संपूर्णपणे देवाच्या चरण कमलावरच आहे. तिला लक्ष्मीमाता म्हणतात. आज दुर्दैवाने पैसा सर्वस्व बनू पाहात आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो वरचढ ठरतो आहे. या अर्थाने पाहिले तर ज्याचे पैशावर लक्ष आहे असा अर्थ निघतो. हे धर्माचरणाच्या विरुद्ध आहे.

श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्येक प्रसंगातून भक्तांना सावध केलेले आहे. हा जन्म-मरणाचा संसार सागर तरून जायचा असेल तर सन्मार्ग, भक्तिमार्ग हा एकमेव आधार रस्ता आहे. घरामध्ये योग्य, उत्तम मार्गाचा पैसा आला पाहिजे. सत्वशील मार्गाने येणारा पैसा हा लक्ष्मीच्या रूपाने येतो आणि अखंड वास्तव्य करतो. घरामध्ये सगळ्यांचे आरोग्य चांगले असणे.

घरात स्वच्छता, टापटीप असणे, नवरा-बायको यांच्यामध्ये प्रेमभाव, आदरभाव, एकमेकांविषयी सन्मान असणे, मुलंबाळे आज्ञाधारक व नम्र असणे बुद्धिवान असणे वडीलधा-यांचा आदर असणे, साधुसंतांचा सहवास मिळणे, त्याचे पूजन होणे, घरातील सगळे मितआहारी असणे. शुद्ध, सात्विक आहार घेणारे असणे. दानधर्माची आवड असणे. ही सगळी घरातील लक्ष्मीची रूपे आहेत.

या सगळ्यांना लक्ष्मीची वेगवेगळी रूपं मानून त्यांची नावेही वेगवेगळी आहेत. तनलक्ष्मी (शरीरसंपदा), धनलक्ष्मी, माधुर्य लक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, लक्ष्यलक्ष्मी, महालक्ष्मी, विचारलक्ष्मी, जयलक्ष्मी, विजयलक्ष्मी, राजलक्ष्मी, साम्राज्यलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, नरनारायणलक्ष्मी, गृहलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, अन्नपूर्णा, वैभवलक्ष्मी, गोलक्ष्मी आणि शेवटचा सर्वत्र जाणवणारा प्रकार म्हणजे ‘कडकलक्ष्मी’…

या कडकलक्ष्मीवरून एक गोष्ट आठवली, भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांच्यात प्रेमाने श्रेष्ठत्वाच्या गोष्टी चालल्या होत्या. माता लक्ष्मींचे म्हणणे होते, मी श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय पानही हलत नाही. विष्णूदेव म्हणाले सिद्ध करून दाखव? तेवढय़ात लक्ष्मीमातेचे लक्ष मृत्युलोकांत चाललेल्या प्रेतयात्रेवर गेले.

प्रेतावर लोक भरपूर पैसे उधळत होते आणि ते गोळा करण्यासाठी लोक धडपडत होते. सोन्याच्या नाण्यांचा प्रचंड पाऊस प्रेतावर पडत होता. लक्ष्मीमाता म्हणाल्या बघा आहे की नाही मी श्रेष्ठ. लोक प्रेताकडे दुर्लक्ष करून नाणी गोळा करत आहेत.

विष्णूनारायण भगवान हसले. म्हणाले, लक्ष्मीबाई अगं, ज्यांच्यात मी आहे, तेच लोक तुझ्या प्राप्तीसाठी धडपडत आहे, ज्याच्यामध्ये मी नाही तोच माणूस प्रेत बनून पडून राहिला आहे. ते प्रेत कुठे उठून तुझ्याकडे झेपावत आहे. प्रेत तर पैशांकडे ढुंकूनही पाहात नाही. म्हणजे मी आहे म्हणून तू आहेस.

ज्यांच्यात मी नाही, तिथे तुलाही किंमत नाही. प्रेताला पैशाचा काय उपयोग? म्हणून तुझ्यापेक्षाही मी श्रेष्ठ आहे. हे सगळे पाहून लगेच लक्ष्मीमातेने माघार घेतली. देवाचे श्रेष्ठत्व मान्य केले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी वरील नमूद प्रसंगातून हेच दाखवून दिलेले आहे. धर्माचरण हे सर्वश्रेष्ठ आहे. गुरुदेव दत्ता दिगंबरा श्रीपाद वल्लभ, नृसिंहसरस्वती, स्वामी समर्थ दिगंबरा।।

योग ही भारतीय संस्कृतीची उदात्त देणगी

$
0
0
GAANAND MAHARA new copy

योग ही मानवी जगताला आयुरारोग्याची दिलेली भारतीय संस्कृतीची उदात्त देणगी आहे. सृष्टीतला ईश्वर शोधताना आत्मतत्त्वांनी प्रेरित झालेल्या ऋषींनी शरीराचे आरोग्य राखण्यासाठी सृष्टीची काही तत्त्वे अंगीकारली, त्यातून योगासनाची निर्मिती झाली.

GAANAND MAHARA new copyसरपटणारा साप पाहून सर्पासन आले, तर डबक्यात डरांव डरांव करणा-या बेडकापासून मंडुकासन झाले. १५० वर्षे आयुष्य काढणा-या कासवापासून प्राणायामाची प्रेरणा ऋषींना मिळाली. पुढे महर्षी पतंजलींनी या योगासनांना सूत्ररूप दिले, त्याचे शास्त्र केले. आज जगात सर्वत्र या आरोग्याच्या गुरुकिल्लीचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे.

चंद्रावर पाय रोवणा-या माणसाला सृष्टीचे ईश्वर तत्त्व जागवण्यासाठी किंबहुना त्या सृष्टीशी आत्मतत्त्वाचे नाते जोडणे याचे नाव ‘योग’ आहे. हे विवेचन करण्याचे कारण संतश्रेष्ठ गजानन हे योगप्रभू होते.

श्री गजानन विजयग्रंथाचा ६वा अध्याय हा या योगप्रभूची योगातील पारंगतता दाखविणारा आहे. बंकटलालच्या मळ्यात मक्याची कणसे खाण्यासाठी भक्तगणांसोबत महाराज गेलेत. कणसे भाजण्यासाठी एका मोठय़ा चिंचेच्या झाडाखाली शेकोटी पेटविण्यात आली. कणसे भाजणे सुरू झाले. झालेल्या धुरामुळे झाडावरचे आग्या मोहोळ उठले.

आग्या मोहळाच्या माश्यांचा जथ्था फेर घेऊ लागला. त्या माश्या चावू नये म्हणून जो तो सैरावैरा पळत सुटला. महाराज मात्र निश्चिंत बसलेले होते. महाराजांच्या अंगावर चवताळलेल्या माश्यांनी जणू घोंगडी केली. हे सारे पाहून बंकटलाल हा अत्यंत दु:खी झाला, तो महाराजांकडे धावला, तो जवळ येताच महाराजांनी,

‘‘जीवांनो जा निघोन।
बसा मोहोळी जाऊन।
माझ्या बंकटाकारण।
तुम्ही कोणी न चावावे।।
जमलेल्या मंडळीत।
बंकट हाच नि:स्सीम भक्त।
जो माझ्या प्रित्यर्थ।
येत आहे धावोनिया।।

असे महाराजांनी म्हणताच सा-या माश्या या मोहळावर जाऊन बसल्या आणि महाराज हसू लागले. बंकटलालला ते म्हणाले जिलेबी, पुढे असली की, ते खाणारे आणि माश्या आल्या की पळून जाणारे हे स्वार्थी भक्त आहेत. बंकटलालने महाराजांच्या अंगातील मधमाश्यांचे काटे काढण्यासाठी सोनाराला बोलावू का? असे श्री महाराजांना विचारले, त्यावर महाराज म्हणाले, माशीरूपी सच्चिदानंदाला मी जाणले आहे.

तोच माशी झाला तर मी देखील त्याचेच स्वरूप आहे. त्यामुळे मला कुठलीच बाधा होणार नाही. असे म्हणून त्यांनी योग बलानी कुंभक करताच सारे काटे शरीरातून बाहेर आले. तो अघटित प्रकार पाहताच लोक आश्चर्यचकित झाले. कणसे भाजण्यात आली व कणसे सेवणाचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला हे पाहून बंकटलालचा संकल्प पूर्ण झाला. त्याला समाधान वाटले.

अकोट येथे कोतशा अलीचे शिष्य असणा-या नरसिंगजींना भेटण्यासाठी श्री महाराज गेले. दोघांची ही श्रीराम-भरत भेट अकोटलगत असणा-या अरण्यात झाली. नरसिंगजी हे संसारी महाराजांनी त्यांना ‘गार पाण्यात राहते। परि न पाणी शिरू देते। यापरि त्या रहावे।

अपेक्षा रहित असावे।
चित्तातून ना ढळू द्यावे।
सच्चिदानंद ईशाला।।
असा उपदेश केला.

दर्यापुराच्या शेजारी असलेल्या शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित होता. चार भाषा अवगत असलेल्या या पंडितांची परिसरात ख्याती होती. सूर्यपूजक असणारा वज्रभूषण गावानजीक असलेल्या नदीत प्रात:काळी स्नान करीत सूर्यनारायणाला अध्र्य देत असे.

नेहमीप्रमाणे सूर्यआराधना सुरू असताना महाराज वाळवंटी बसलेले त्याला दिसले. त्याने धावत जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. सूर्याची मित्राय नम:, सूर्याय नम:, भानवे नम:, खगाय नम: अशी नावे घेत त्यांनी महाराजांना साष्टांग दंडवत घातले. तो ज्ञाननिधी

योगेश्वर पाहताच हे पूर्णब्रह्म जगच्चालक ज्ञानराशी।
ऐसे युगायुगी किती अवतार घेसी।
झाल्यास दर्शन तुझे भयरोग, चिंता।
नासे गजानन गुरो। मज पाव आता।

अशी प्रार्थना वज्रभूषणाने केली. त्या पंडिताला आपण अंगिकारलेले व्रत चालवावे, कर्म मार्ग सोडू नको असा महाराजांनी उपदेश केला. महाराज शेगावी परतले. बंकटलाल प्रपंचाकडे मी राहणे बरे नाही असे सांगून महाराज मारुती मंदिरात राहू लागले. मंदिरात मारोतीरायाचा उत्सव सुरू होता.

हा उत्सव महिनाभर चालायचा कीर्तन, अन्नदान, महापूजा असे सोहळे उत्सवात व्हायचे, महाराज मंदिरी रमले. सदैव आपल्या मस्तीत जगणा-या या अवलियाने केलेल्या प्रत्येक कृतीला वेगळ्याच अर्थाची महिरप तुम्हा-आम्हाला लावावी लागते, फक्त त्यासाठी श्रद्धेची दृष्टी हवी.

प्रसिद्ध संत भोलेनाथ बाबा यांनी भक्तांना केलेल्या उपदेशात एक महावाक्य सांगितले आहे. ‘‘तू मुझे याद कर, याद शब्द उलटा करनेसे दया बन जाता है। परमश्रेष्ठ संत गजाननाचा महिमा गात असताना हृदयी श्रद्धा ठेवून या गजानन गुरूची आठवण केली की, संकटाचे समरसांचे उत्तुंग डोंगर फुटल्याशिवाय राहणार नाही. या डोंगराच्या झालेल्या ठीक-या गजानन कृपेचा महिमाच गात राहील. यात संशय नाही.

अक्षता

$
0
0
akshata

पूजेसाठी, तसेच मंगलकार्यात, औक्षणप्रसंगी वापरल्या जाणाऱ्या कुंकुमिश्रित तांदळांना ‘अक्षता’ म्हणतात. मूळ संस्कृत शब्द ‘अक्षत’ हा आहे.

akshata‘अ+क्षत’ अशी याची फोड आहे. (क्षत म्हणजे जखम) अक्षतचा अर्थ सुरक्षित, दु:ख विरहित. याचा एक अर्थ कल्याण असाही आहे. हा शब्द अक्षदा असा लिहिण्याची चूक होऊ शकते, ती टाळावी. अक्षता शब्दाविषयी थोडी अजून माहिती!

आपण लग्नात (फक्त तांदूळ – अक्षता वापरतो.. दुसरे कोणतेही धान्य नाही.) अक्षता वापरतो याची खालील दोन महत्त्वाची कारणे - हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही.. त्याला आतून कीड पडत नाही.. म्हणूनच शुद्ध चारित्र्याला / शुद्धतेला धुतलेल्या तांदळाची उपमा दिली जाते!

दुसरे म्हणजे तांदळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते.. तेव्हा ते खरे बहरते..! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे.. पण लग्नानंतर दुस-या घरी जाते आणि तिथे ती बहरते.. यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी.. असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात.. आपल्याकडच्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत.. पण आपल्याला त्याची माहिती नसते.. हे दुर्दैव!!

कोल्हापूरचा ज्योतिबा

$
0
0
jyotiba temple

ज्योतिबा हा खंडोबाचा अवतार आहे हे सा-यांनाच माहीत आहे. रत्नागिरी, कोल्हापूर येथील पंचक्रोशीतील अधिक कुळांचे ज्योतिबा हे कुलदैवत आहेत.

jyotiba templeज्योतिबा मंदिरात गेल्यावर नंदादीपातील ज्योतीचे दर्शन घ्यावे लागते. त्यानंतर काळभैरवाचे पूजन केल्यावर ज्योतिबाचे दर्शन भक्तगण करत असतात. ज्योतिबासाठी चैत्र पौर्णिमेला हस्त नक्षत्री यात्रा भरवली जाते. यावेळेस देवाची पालखी निघते.

पालखी सोहळ्यात उंच उंच काटया निशाण आणि ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’ या जयघोषाणे आसमंत भरून निघतो. ज्योतिबाला रविवारी नैवेद्य दाखवला जातो. काही कुळात दर रविवारी देवतेचे पूजन करून नामस्मरण करतात. काही लोक नामस्मरणाच्या दिवशी उपवास ठेवतात.

ज्योतिबा देवताची ख्याती अशी सांगितली जाते की, काही सिंध लोक रत्नागिरी बंदरावर उतरले होते, त्यानंतर ते कोल्हापुरास वास्तव्यास गेले.

सिंधी लोक तेजाला, प्रकाशाला आपलं दैवत मानत असत. म्हणून त्या देवतेला ‘ज्योती’ असे नाव पडले. त्यांनी सोबत आणलेल्या देवताची डोंगरावर स्थापना केली. याच देवतेला महाराष्ट्रातील लोक ‘ज्योतिबा’ म्हणतात. त्यांनी ज्योतीच्या नावापुढे ‘बा’ हा शब्द लावला.

‘बा’चा अर्थ वडिलधारी असल्याने त्यांनी ‘ज्योती’ देवाला ‘ज्योतिबा’ असे संबोधले. ज्योतिबाचा डोंगर फार प्रसिद्ध आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर आणि गाव आहे. ज्योतिबा हे दैवत शीव आणि सूर्याचे रूप मानले जाते. हे प्राचीन दैवत काळाच्या ओघात अनेकांचे कुलदैवत बनले.

कालांतराने ज्योतिबाचा पेहराव आणि रूपही बदलून गेले. कोल्हापूरच्या दक्षिण दिशेला असलेल्या ज्योतिबाच्या डोंगरावर एकूण तीन देवळं आहेत.

केदारेश्वर, केदारलिंग आणि रामलिंग. या देवळांचे प्रवेशद्वार दगडांचेच आहे. या तीन देवळांच्या मध्ये केदारलिंग आहे. कोल्हापूर पगडीतील, घोडयावर स्वार असलेली ज्योतिबाची मूर्ती आहे.

ज्योतिबाच्या जन्मदिवशी, श्रावण षष्ठीला भाविकांची गर्दी होते. देशाच्या कानाकोप-यांतून भाविक या सोहळ्यासाठी येत असतात. चैत्र पोर्णिमेला ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. ज्योतिबाच्या चांदीची मूर्ती वाजत गाजत यमाईदेवीच्या मंदिराकडे निघते. ढोल-ताशाच्या गजरावर भक्तगण देहभान विसरून नाचत असतात.

देवपूजेला योग्य पुष्पांचा निर्णय

$
0
0
prajakta

देवाला फुलं वाहण्याचा प्रकार धर्मशास्त्रात असा संगितला आहे की, पान, फूल, फळ ही जशी उत्पन्न झाली तशी देवाला अर्पण करावी.

prajakta॥ जाती शमी कुशा: कुंकूमल्लिका करविरजम्।
नागपुन्नागकाऽशोक रक्तनिलोत्पलानीच॥
चंपकं बकुलंचैव पद्मबिल्वं पवित्रकम्॥
एतानी सर्वदेवानां संग्राहयांनी समानिच।
तत्र विशेषेणविष्णो:तुलसीप्रिया॥ तंदुक्तं॥
मानिकांचनपुष्पाणि तथामुक्तामयानिच।
तुलसीपत्रदानस्य कलांनरहती षोडशीं॥

अर्थात : देवाला फुलं वाहण्याचा प्रकार धर्मशास्त्रात असा संगितला आहे की, पान, फूल, फळ ही जशी उत्पन्न झाली तशी देवाला अर्पण करावी.

कोणत्या देवाला कोणती फुले वाहावी ?

जाई, सौंदड, दर्भ, मोगरा, कणेरी, उंडणीचे फूल, अशोक, तांबडी व काळी कमळे, चाफा-बकुळी, बेल ही पुष्पे व पत्रेही पूजेस योग्य आहेत असं शास्त्र सांगतं. तसेच विशेषत: विष्णूला तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे. हरिकादी मणी, सोने, मोती, यांची पुष्पे असली तरी तुळशीचे एक पान वाहिल्याचे पुण्य सोन्याच्या किंवा मोत्याच्या माळांपेक्षा सोळा पट जास्त आहे असे सांगितले आहे.

॥ शिवप्रियाणि॥ चतुर्णापुष्पजातीनां गंधमाघ्नातिशंकर: ।
अर्कस्य करवीरस्य बिल्वस्यच बकस्यच॥
धत्तूरबृहतिपुष्पै:पूजनेगोलक्षदानफलं।
एवं गणेशस्य दुर्वाकुरा: जगदंबिकाया: नानाविधपुष्पाणि ॥
रवे:रक्तं करवीरपुष्पम्॥ न शुष्कै:पूजयेद्देवं कुसुमैर्नमहीगतै:।
नविशिर्णदलै:शिष्टैर्नाशुभैर्नाविकासितै:॥ पुतिगंधोग्रगंधिनी स्वल्पगंधीनीवर्जयेत्॥
समित्पुष्पकुशादीनी वहंतंनाभिवादयेत् तद्धारीचैवनान्यान् द्दिनिर्माल्वंतद्भवेत्तयो: ॥
नाक्षतैर्चयेद्विष्णुं न तुलस्या गणाधिपम् । नदूर्वया यजेद्देवीं बिल्वोन्मतैर्नभास्करम्॥
धूपहीने भवेन्मृत्यू दीपहीने दरिद्रता॥
नवेद्यहीने दुíभक्षं मंत्रहीनं नतत्फलं। अग्राह्यंशिवनिर्माल्यं पत्रं पुष्पं फलं जलं॥ शालग्रामस्य संस्पर्शात्र्सव याति पवित्रतां॥

अर्थात : अर्कपुष्प (रुचकी), कण्हेर, बिल्व आणि बकुळी यांचा सुगंध शिवाला फार प्रिय आहे. तसेच धोत्र्याची फुलांनी शंकराचे पूजन केले असता लाख गोदान केल्याचे फळ मिळते असे शास्त्र सांगते. गणपतीला दुर्वा प्रिय आहेत. देवीला विविध प्रकारची फुले प्रिय आहेत. सूर्याला तांबडया कण्हेरीचे फूल प्रिय आहे.

तसेच सुकलेली, जमिनीवर पडलेली, कुजलेले, उमलायच्या अगोदरच्या अवस्थेतील म्हणजे कळी असताना, अशी फुले देवाला वाहून पूजा करू नये असे शास्त्रात सांगितले आहे.

तसेच ज्याचा गंध फार उग्र अथवा दरुगध किंवा सुगंध नसलेली अशी फुले देवाला वाहू नयेत. ज्यांच्या हातात समिधा-फुले-दर्भ आहेत अशा मनुष्यास नमस्कार करू नये व त्यांनीही दुस-यास नमस्कार करू नये. तसे केले असता ती सर्व पुष्प इत्यादी निर्माल्य होतात असे शास्त्र आहे.

आता कोणत्या देवाला काय वाहू नये ते पाहू ?

»  विष्णूला अक्षता, गणपतीला तुळशी, देवीला दुर्वा, सूर्याला बेल व धोत्र्याची फुले वाहू नयेत.

»  शिवाला अर्पण केलेले पान-फूल-फळ- किंवा पाणी हे घेऊ नये तरी शाळीग्राम स्पर्शाने हे सर्व पवित्र होते.

»  पूजेला धूप नसेल तर अर्चकाला मृत्युदायक आहे. पूजेत दीप नसेल तर अर्चकाला दारिद्रय़ येईल.

»  नवेद्य नसेल तर अर्चकाला दुíभक्ष येईल.

»  मंत्ररहित पूजा केली असता ती निष्फळ ठरते.

ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता!

$
0
0
Dnyaneshwar

अलीकडच्या काही शतकांमध्ये जे क्रांतिकारक शोध लागले आहेत, त्यांचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते. अशा काही उदाहरणांची ही झलक..

Dnyaneshwarविज्ञान युगाचा अभिमान धरणाऱ्या मंडळींना ज्ञानेश्वरीने विज्ञानावर कशी मात केली आहे हे त्यातील काही ओव्यांवरून लक्षात येईल.
अलीकडच्या काही शतकांमध्ये जे क्रांतिकारक शोध लागले आहेत, त्यांचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते.

सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपíनकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममरतडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे (आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो). ज्ञानेश्वरीने ७२५ वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.

‘‘उदय-अस्ताचे प्रमाणे,
जैसे न चालता सूर्याचे चालणे,
तैसे नष्कम्र्यत्व जाणे,
कर्मीचि असता’’

सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतिकारक शोध ठरत नाही काय?
मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात,

‘‘शुक्र-शोणिताचा सांधा,
मिळता पाचांचा बांधा,
वायुतत्त्व दशधा,
एकचि झाले’’

शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत. सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षातील आहे. परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदतीशिवाय शोणीत पेशींचा उल्लेख केला आहे.

माऊली कुठल्या मेडिकल कॉलेजात गेले होते? इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते. पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञांत बराच काळ वाद चालला होता. पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य झाला आहे. ज्ञानेश्वरीने ७२५ वर्षापूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले.

‘‘पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा,
तरी हा भूगोलचि काखे सुवावा,
तैसा विस्तारू माझा पाहावा,
तरी जाणावे माते’’

भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. आणि पृथ्वी गोल असल्याचे नि:संदिग्ध सांगताना परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय.

पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे-दीडशे वर्षापूर्वीचा आहे. परंतु माऊली ७२५ वर्षापूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.

‘‘तया उदकाचेनि आवेशे,
प्रगटले तेज लखलखीत दिसे,
मग तया विजेमाजी असे,
सलील कायी?’’

सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलीकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानेश्वरीत
लिहितात की, सूर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो.

ती पावसाचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी :

‘‘मी सूर्याचेनि वेषे,
तपे तै हे शोषे,
पाठी इंद्र होवोनि वष्रे,
मग पुढती भरे’.

विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे.
या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला

‘‘ना तरी भौमा नाम मंगळ,
रोहिणीते म्हणती जळ,
तैसा सुखप्रवाद बरळ, विषयांचा’’
किंवा

‘‘जिये मंगळाचिये अंकुरी,
सवेचि अमंगळाची पडे पारी’’
किंवा

‘‘ग्रहांमध्ये इंगळ,
तयाते म्हणति मंगळ’’.
इतकेच नव्हे, तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्र :

‘‘परी जळो ते मूळ-नक्षत्री जैसे’’
किंवा स्वाती नक्षत्र :

‘‘स्वातीचेनि पाणिये, होती जरी मोतिये, तरी अंगी सुंदराचिये, का शोभति तिये’’
कॅमेरा आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यांचे मूळही ज्ञानेश्वरीत सापडते :

‘‘जेथ हे संसारचित्र उमटे,
तो मनरूप पटू फाटे,
जैसे सरोवर आटे,
मग प्रतिमा नाही’’

अर्थात संकल्प-विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही.

या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल.

विज्ञानयुगात दिशाभूल झालेल्या युवक-युवतींनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडविण्याऱ्या संत वाङ्मयाच्या सहवासात यावे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, श्री तुकाराम गाथा व दासबोधाचा मन:पूर्वक ध्यास घ्यावा म्हणजे प्रत्येकाला जीवनाचे अनंतरूप समजेल, मात्र यासाठी विज्ञानाचा वृथा अहंकार टाकून संतांना सर्वभावे शरण जाऊन त्यांचाच सत्संग करावा लागेल.

स्त्रीजन्माचे अहेव लेणे

$
0
0
manglagur

सौभाग्यवती स्त्रियांना आपल्या भावना, संवेदना, आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातीलच एक सण किंवा व्रत म्हणजे मंगळागौर.पार्वतीसारखे जन्मभराचे अहेवपण लाभावे, पतीवरती मृत्यूची सावली पडू नये आणि त्याचबरोबर निसर्गातील वृक्ष-वेलींचा परिचय व्हावा, त्यांच्या सहवासाने श्रावणातले हिरवे वैभव जीवनात यावे यासाठी या व्रतांचे नियोजन झाले असावे.

manglagurमंगळागौर..लग्न झाल्यावर नववधूने आपल्या सुखी संसारासाठी आणि अपत्य प्राप्तीसाठी करायची पूजा.

गौरी म्हणजे पार्वती. हिरवाईने नटलेली वसुंधरा ही साक्षात पार्वतीच. श्रावणात तिच्या हिरव्या लावण्याला बहर आलेला असतो आणि त्यासाठी तिच्या पूजनाची परंपरा मंगळवारी सुरू झालेली आहे. एकेकाळी भारतीय स्त्रियांचे जीवन असंख्य रूढी-परंपरांनी बंदिस्त होते. त्यामुळे मंगळागौरीसारखी व्रतवैकल्ये म्हणजे त्यांच्या उत्साहाला उधाण यायचे.

लग्नानंतर येणारी पहिली मंगळागौर दणक्यात साजरी केली जाते. मांगल्य, पावित्र्य आणि सूचिता यांचा त्रिवेणी संगम मंगळागौरीत आढळतो. पार्वतीसारखे जन्मभराचे अहेवपण लाभावे, पतीवरती मृत्यूची भयाण सावली पडू नये म्हणून हे व्रत साजरे करण्याची प्रथा निर्माण झाली.

निसर्गातील वृक्ष-वेली यांचा परिचय व्हावा, त्यांच्या सहवासाने श्रावणातले हिरवे वैभव जीवनात यावे यासाठी मंगळागौरीसारख्या व्रतांचे नियोजन झाले असावे.

श्रावण महिन्यातील हा एक खास स्त्रियांचा सण. सौभाग्यवती स्त्रियांना आपल्या भावना, संवेदना, आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे मंगळागौर.

मंगळागौर ही एक सौभाग्यदेवता आहे. आपल्या पतीच्या रक्षणासाठी, भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्त्वाचे मानले जातात. या वारी पूजा केली म्हणजे जन्माचे सार्थक झाले असा समज आहे.

या पूजेसाठी लग्न होऊन पाचपेक्षा अधिक वर्षे झाली नाहीत अशाच सौभाग्यवतींना बोलावण्यात येते. यांना ‘वपोरी-वसोळी’ म्हणतात. मंगळागौरीच्या व्रतात शंकर, गणपती व गौरीची पूजा करतात.

मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा-शंकराची पूजा. पती-पत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर पहिली पाच वष्रे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात.

नवविवाहित स्त्रिया या दिवशी न्हाऊन, सोवळे नेसून पूजेला बसतात. पूजा झाल्यावर सर्व जणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मुक्याने जेवायचे असते.

जेवणानंतर तुळशीचे पान खातात. या पूजेकरिता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचे पूजेचे साहित्य, बुक्का, अक्षता, पाच खारका, पाच सुपा-या, पाच बदाम, पाच खोब-याच्या वाटया, सोळा प्रकारची पत्री (पाने), दोन वस्त्र, आठ वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, सोळा काडवाती, तुळशीची पाने, केळी किंवा पेरूचा नवेद्य, पंचामृत, दुधाचा नवेद्य, जानवे, सोळा विडय़ांची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, शक्य असल्यास केवडयाचे कणीस, एक नारळ, कापड, हळद-कुंकू इ. साहित्याची गरज असते.

ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदीकुंकवासाठी बोलावतात. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाने ओटी भरतात. रात्रीसाठी पोळ्या, मटकीची उसळ, वाटली डाळ, करंज्या, चकल्या, लाडू वगरे फराळाचे जिन्नस करतात व सर्वाना जेवायला बोलवतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात.

पूर्वीच्या काळी आजूबाजूच्या सगळ्या सुवासिनी जमून ही पूजा करायच्या. त्या दिवशी रात्री गाणी म्हणून, खेळ खेळून जागरणं करायचे असायचे. तेवढाच नववधूला सगळ्यांचा परिचय आणि एक संधी माहेरी येण्याची. ‘आपल्या नव-याला सांग. निळ्या घोडयावर बस. निळी वस्त्र परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.’

मंगळागौर पूजन

सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते.त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती (बहुधा, अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची) मांडण्यात येते. शेजारी महादेवाची िपडही ठेवतात. मंगळागौरीची षोडषोपचार पूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते.

पत्री पूजा

वेगवेगळ्या झाडांची पानं व फुले या पूजेत वापरली जातात. ही झाडे औषधीदृष्टया अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुकांता, शमी, शेवंती वगरे झाडांची पाने या कामाला येतात.

पूजा करताना १६ प्रकारच्या पत्री वहाव्यात असा समज आहे. पूर्वी भारतात आयुर्वेदाचा प्रसार होता. या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची नव्या विवाहितेस ओळख व्हावी व पुढील आयुष्यात गरज पडल्यास ते झाड पटकन ओळखता यावे अशी पत्रीपूजेमागची भावना असू शकते.

मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ

वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिप-या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा इत्यादी. असे साधारणत: ११० प्रकारचे खेळ गाणी म्हणत खेळले जातात.

यात सुमारे २१ प्रकारच्या फुगडया, ६ प्रकार आगोटा-पागोटयाचे असतात. या खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो, हा हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणा-या महिलांना या खेळातून आनंदही मिळे.


दत्तप्रभूंचं आजोळ

$
0
0
datta

एक अद्भुत स्थान..करंजी येथील ‘श्रीदत्तप्रभूंचं आजोळ’ हे पावन परंतु अप्रसिद्ध स्थळ. त्रेतायुगात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या भर माध्यान्ही, महर्षी अत्री आणि महापतिव्रता साध्वी अनसूया यांच्या सुपुत्र रूपानं भगवन दत्तात्रेयांनी अवतार धारण केला.

dattaब्रह्मदेवांच्या चार मानसपुत्रांपैकी महर्षी भृगू हे ज्येष्ठ पुत्र, दुसरे महर्षी अंगिरस, तिसरे महर्षी अत्री आणि चौथे महर्षी वैखानस! महर्षी अत्री आणि महर्षी अंगिरस यांना मानाचं स्थान थेट सप्तर्षीमध्येही आहे.

साक्षात श्रीलक्ष्मीमातेचे पुत्र असलेल्या कर्दममुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजेच महर्षी अत्रींची पत्नी महासाध्वी माता अनसूया! अत्रीमुनींचं ज्ञान, तप:सामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दममुनी-देवाहुतीही त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या अनसूया या सौंदर्यवती-सुशील कन्येचा अत्रीमुनींशी विवाह लावून दिला.

‘अनसूया’ म्हणजे’असूयारहित’! अशा या महान सती अनसूयेचं माहेर अर्थात दत्तप्रभूंचं आजोळ (महर्षी कर्दममुनींचा आश्रम) दंडकारण्याचा अतिशय रम्य परिसर असलेल्या दिंडोरीजवळ ‘करंजी’ या गावी आहे.

अगदी भर नाशिक-वणी मार्गावर वणीकडे जाताना डाव्या बाजूला लागतं ओझरखेड धरण आणि उजव्या बाजूला मुख्य रस्त्यापासून केवळ ३-४ कि.मी. आत हे पवित्र स्थान आहे. यालाच ‘निर्जल मठ’ असंही म्हणतात.

याच परिसरात पराशर, मरकडेय, कण्व या तपस्वी महर्षीचेही आश्रम होते. साक्षात श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन ‘सिद्धानां कपिलो मुनी:’ असं केलंय त्या कपिलमुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे.

दत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही व भारतामधून इथेच एकमेव पाहायला मूर्ती मिळते. प्रत्यक्ष गंगामाईनं दत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या शिवदयाळ स्वामींना प्रसादस्वरूप दिलेली आहे. मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमतेम एक वित उंचीची ही पांढरीशुभ्र मूर्ती ठेवलेली आहे.

इथे आणखी एक आश्चर्य असं पाहायला मिळालं की परिसरात असलेले सगळे कुत्रे दुपारी बाराच्या आरतीला देवळाच्या गाभा-याच्या आत जमतात आणि आरती संपल्यावर निघून जातात.

श्रीकृष्णाला विसरू नका..

$
0
0
krushan

श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता. त्याने मनात आणलं असतं तर एकटयाने कौरवांचा पराभव केला असता. पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही. या कृतीतून संदेश दिला की, तुम्ही स्वत:चा संघर्ष करायला, स्वत: सज्ज झालात तरच मी तुमच्या पाठीशी आहे. कारण श्रीकृष्णाचा कर्मयोगावर विश्वास होता.

krushanश्रीकृष्णाची चरित्रकथा सांगते की श्रीकृष्ण जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती. त्यातून तो वाचला. पुढे सतत जीवावर संकटं आली. तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला. प्रसंगी पळसुद्धा काढला. पण संकटं टळावीत म्हणून स्वत:ची कुंडली घेऊन त्याने ज्योतिषी गाठला नाही, ना उपास केले.

ना अनवाणी पायाने फिरला. त्याने पुरस्कार केला फक्त ‘कर्मयोगाचा!!’ भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकला. तेव्हा कृष्णाने, ना अर्जुनाची कुंडली मांडली, ना गंडे-दोरे बांधले. ‘तुझं युद्ध तुलाच करावं लागेल’, असं त्याने अर्जुनाला ठणकावून सांगितलं. अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं.. तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वत: अर्जुनातर्फे लढाई केली नाही.

श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता. त्याने मनात आणलं असतं तर एकटयाने कौरवांचा पराभव केला असता. पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही. जर अर्जुन लढला तरच त्याने अर्जुनाचे सारथ्य करण्याची तयारी दाखवली. एक महान योद्धा सारथी बनला. अर्जुनाला स्वत:ची लढाई, स्वत:लाच करायला लावली.

या कृतीतून संदेश दिला की, तुम्ही स्वत:चा संघर्ष करायला स्वत: सज्ज झालात तरच मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुमचा सारथी बनायला तयार आहे. पण तुम्ही लढायला तयार नसाल, तर मी तुमच्या वतीने संघर्ष करणार नाही. तुमच्या पदरात फुकट यश टाकणार नाही. कोणत्याही देवाचा-देवीचा आशीर्वाद घ्यायला जाल तेव्हा श्रीकृष्णाला विसरू नका.

अनवाणी चालत जायची गरज नाही. उपाशी राहायची गरज नाही.. शस्त्र खाली टाकू नका. प्रत्येक व्यक्तीकडे गुणांचं शस्त्र आहे. नेमकं तेच शस्त्र काढा आणि त्याचा उपयोग करून लढा. कोणताही देव-देवी तुमची लढाई लढणार नाही. तुमची स्वप्नं फुकटात पूर्ण करून देणार नाही. स्वत:ची लढाई स्वत:च लढा !!!

५६ भोग म्हणजे काय?

$
0
0
vvv

येत्या बुधवारी, २४ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. यानिमित्ताने श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जाणा-या ५६ भोगाची माहिती.

vvvदेवाला ५६ प्रकारचे पक्वान्न वाढले जातात. त्यालाच छप्पन भोग असं म्हणतात. हे पक्वान्न रसगुल्ल्यापासून सुरू होतात त्यात दही, भात, पुरी, पापड असं सगळं असून ही सामग्री वेलचीवर संपते. अष्टोप्रहार भोजन करणा-या बालकृष्णाला अर्पण केल्या जाणा-या या ५६ भोगाच्या छान कथा आहेत.

दिवसाचे आठ प्रहर असतात. असं म्हटलं जातं की यशोदा बालकृष्णाला दिवसभरात आठ वेळ जेवायला वाढायची. इंद्राच्या प्रकोपामुळे लोकांना वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता तेव्हा जवळपास ७ दिवस अन्न आणि पाणी ग्रहण केलं नव्हतं. आठव्या दिवशी कृष्णाने इंद्राचा प्रकोप कमी झालेला पाहिला, पाऊस थांबला तेव्हा त्याने गाववाल्यांना घरी जायला सांगितलं.

मात्र कृष्णाने सात दिवस काहीच खाल्लेलं नाही याचं तिथल्या गावकऱ्यांना, यशोदेला अतिशय दु:ख झालं. म्हणूनच कृष्णाप्रती आपली भक्ती म्हणून गावकरी आणि यशोदेने ७ दिवस आणि ८ प्रहर (वेळा) असे ७ ७ ८ = ५६ इतके पदार्थ करून कृष्णासमोर ठेवले. श्रीमद् भगवदनुसार गोपिकांनी श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून एक महिना यमुना नदीत स्नान केलं आणि कालीमातेची प्रार्थनाही केली.

कृष्णानेही त्यांना तशीच संमती दिली. त्यांच्या व्रताची समाप्ती झाल्यावर गोपिकांनी आनंदाने कृष्णासाठी छप्पन भोग दिले. हे छप्पन भोग म्हणजे त्याच्या ५६ मैत्रिणी होत्या. असंही म्हटलं जातं की त्या काळात कृष्ण राधासंगे एक मोठया कमळावर बसायचे. त्या कमळाला तीन भाग होते.

एका भागात आठ, दुस-या भागात सोळा आणि तिस-या भागात बत्तीस पाकळ्या होत्या. प्रत्येक पाकळीवर एक प्रमुख सखी आणि मध्यभागी श्रीकृष्ण स्वत: विराजमान होत असत. याप्रमाणे पूर्ण पाकळ्यांची संख्या छप्पन होत असे. असाच याचा अर्थ सांगितला जातो. हे छप्पन भोग पुढीलप्रमाणे आहेत.

» भक्त (भात),
» सूप (डाळ),
» प्रलेह (चटणी),
» सदिका (कढी),
» दधिशाकजा (दही-ताकाची कढी),
» सिखरिणी (शिखरण),
» अवलेह (सरबत),
» बालका (बाटी),
» इक्षू खेरिणी (मुरंबा),
» त्रिकोण (शर्करायुक्त),
» बटक (वडा),
» मधू शीर्षक (मठरी),
» फेणिका (फेणी),
» परिष्ट (पुरी),
» शतपत्र (खजला),
» सधिद्रक (घेवर),
» चक्राम (मालपुआ),
» चिल्डिका (चोला),
» सुधाकुंडलिका (जिलेबी),
» धृतपूर (मेसू),
» वायुपूर (रसगुल्ला),
» चन्द्रकला (पगी हुई),
» दधि (महारायता),
» स्थूली (थुली),
» कर्पूरनाडी (लौंगपुरी- लवंगलतिका),
» खंड मंडल (खुरमा),
» गोधूम (दलिया),
» परिखा,
» सुफलाढया (सौंफयुक्त),
» दधिरूप (बिलसारू),
» मोदक (लड्ड),
» शाक (साग),
» सौधान (अधानौ अचार),
» मंडका (मोठ),
» पायस (खीर)
» दधि (दही),
» गोघृत,
» हैयंगपीनम (मक्खन),
» मंडुरी (मलाई),
» कूपिका (रबडी),
» पर्पट (पापड),
» शक्तिका (सीरा),
» लसिका (लस्सी),
» सुवत,
» संघाय (मोहन),
» सुफला (सुपारी),
» सीता (वेलची),
» फल,
» तांबूल,
» मोहन भोग,
» लवण,(मीठ)
» कषाय,
» मधुर,
» तिक्त,
» कटू,
» अम्ल

समाधान ही परमेश्वराची खरी देणगी

$
0
0
samadhan

प्रत्येकाला असं वाटतं की, मी कुणाची निंदा करीत नाही, धर्माने वागतो, तरी दु:खी आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात, हे कसे काय? अगदी कितीही सात्त्विक मनुष्य असला, तरी त्याच्या हे मनात आल्यावाचून राहात नाही.

samadhanनामाचा विटाळ ज्याने मानला तो सुखी दिसावा, आणि नाम ज्याने कंठी धरले त्याला दु:ख व्हावे, यावरून भगवंताला न्यायी कसे म्हणावे, अशीही पुष्कळांना शंका येते. खरोखर, याचे मर्म जर आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल की, बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दु:खात बुडलेले असतात.

विषय त्यांना पुष्कळ मिळाले, पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग! दोन रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता आणि दुसरा खडकाळ आणि काटयाकुटय़ांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता; तर कोणता रस्ता आपण धरायचा? भगवंताकडे जाणा-या लोकांचे गीतेमध्ये दोन वर्ग सांगितले आहेत; एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी.

ज्यांची स्वभावत:च वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो, जे जन्मापासून तयार असतात, ते सांख्यमार्गी होत. ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात, पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते, म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन, ते कर्मयोगी होत. सांख्यांचा साधनमार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो; आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकारक असतो.

सांख्य हा भगवंताकडे चट्दिशी पोहोचतो, पण आपण क्रमाक्रमाने जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता? तो मार्ग असा – वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा, पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे, हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे.

दहा माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण विचारले तर ती माणसे दहा निरनिराळी कारणे सांगतील. यावरून असे दिसते की जगातील कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचे शास्त्र निराळेच आहे. ते प्रपंचापासून शिकता येत नाही.

ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून, तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत. प्रत्येकाला काही तरी कमी असणारच. पण मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की, आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे; म्हणून त्याचे दु:ख कायम राहते.

भगवंतावाचून असणारे वैभव आणि ऐश्वर्य हे कधीच सुखसमाधान देऊ शकत नाहीत. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे, ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय.

प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे.

पावणादेवी भगवती देवी

$
0
0
kuladevat

बांदिवडे गाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात गडनदी किनारी वसलेले आहे. आमचं गाव तसं लहान पाच वाडय़ांचेच आहे. ४५० घरं आणि लोकसंख्या १३०० आहे. गावात तीन शाळा आणि एक अंगणवाडी आहे. अशा गावात हे वडील देवाचे स्थान आहे. महालक्ष्मी राजसत्तेची मालकीण, गावचा मेळेकरी रवळनाथ देव.

kuladevatगाव पांडरी पावणादेवी (तुळजापूरची भवानी) आणि तिच्या बाजूला भगवती भवानी उभी आहे. गावाचा रक्षणकर्ता असलेल्या गावडे देव गावडे ब्राह्मणाच्या मंदिराची रचना फक्त एका मोरयावर आहे. गाव बसवलेल्या कऱ्हाडवरून आणलेल्या क-हाडी ब्राह्मण देवाचे तोंड गावच्या पश्चिम दिशेला आहे आणि त्या देवाच्या दुस-या टोकाला असलेल्या गावडे देवाचे तोंड पूर्वेस आहे.

तसंच गणपती, दत्त महाराज, पंढरीनाथ पांडुरंग, बाराची पूर्वेस, इटला देवी, तपनावरचो ब्राह्मण, गांगो, घाडीवस, पेडावरचा बाबा (देवचार), पत्रादेवी, छळनातली ब्राह्मण, वळनातलो महापुरुष, अंगीचो चाळो, गारुडयाची डुंगो, न्हय दांडयाची देवचार, टाक्यावरी देवचार आणि लाकडी पाषाण असलेले आकारी ब्राह्मण या देवतांचा आशीर्वाद आहे. अशा या जागृत देवस्थानामुळे गावावर येणा-या संकटांचं निवारण होतं.

या गावात दोन मांडण्या आहेत आणि दोन गावकर आहेत. एक जुन्या मांडणीचे आणि दुसरे नव्या मांडणीचे. प्रत्येक मांडणीत गावकर, परब-प्रभू, थळकर परब-प्रभू, गुरव, घाडीगावकर, गावडे-गावकर समप्रमाणात आहेत. ते प्रत्येक जण आपल्या मांडणीचे कार्य पार पाडतात. प्रत्येक मांडणीचे ५-५ खांब आहेत. पाषाण एक, तरंग दोन.

गावात दसरा, टिपर, गोंधळ, होळी, लखमेश्वर, देवालयातील सात दिवसांचा नामसप्ताह, पावणादेवीच्या मंदिरातील सात पाराचा नाम सप्ताह, देव. डाळपस्वारी आणि विठोबाच्या मंदिरातील सात पारांचा नाम सप्ताह हे कार्यक्रम सर्व ग्रामस्थ आनंदाने साजरा करतात.

माहेरवाशिणींना पावणा-या देवचार बाबाची सत्यता अशी आहे, की सन १९९४ साली नवीन मांडणीच्या लोकांनी काढलेल्या देव डाळपस्वारीच्या वेळी खोरणी घालण्यास झालेल्या विलंबामुळे पालवे वाडीतील परब यांच्या घराच्या खळ्यात अचानक डोंगळे जमा झाले आणि त्यावेळी तुळी घेतो न घेतो तोच पावणादेवीचे वारेसूत्र दादा घाडीगावकर यांच्यावर आणि देवाचार बाबाच्या भेटीला अंधारालाही न जुमानता गडगे-आकाडे ओलांडी देवाचार बाबाच्या स्थळी जाऊन थांबले.

हे सगळं घडताना तिथे जमलेल्या जनतेस थोडा वेळ काही समजलेच नाही. पूर्व परंपरेनुसार देवचार बाबाची खोरणी रात्री ७-८ यादरम्यान पडली पाहिजे, असं असतं. पण या खोरणीस विलंब झाल्यामुळे हा प्रकार घडला. हे बांदिवडे गावच्या देवस्थानाच्या इतिहासात जमा झाले.

गावात पावणादेवीचा गोंधळ गावकरी मोठया उत्साहाने साजरा करतात. या दिवशी सगळे पावणादेवीचे भक्त मग ते मुंबईचे चाकरमनी असले तरीही वेळात वेळ काढून येतात. आणि मनोभावे देवीची पूजा करून आपल्या शुभकार्याला सुरुवात करतात.

Viewing all 1081 articles
Browse latest View live