Quantcast
Channel: श्रध्दा-संस्कृती – Prahaar.in
Viewing all 1081 articles
Browse latest View live

वडाच्या पारंब्या धरून राहा

$
0
0
Sri Swami Samarth

मागील भागात आपण गुरुलीलामृत ग्रथातील पहिल्या अध्यायातील १७०व्या ओवीचा विचार करत होतो. ओवीचा अर्थ एका भागात संपविणे योग्य होणार नाही. म्हणून त्या ओवीचे सूत्र आपण पुढे नेऊयात.

Sri Swami Samarthमागील भागात आपण गुरुलीलामृत ग्रथातील पहिल्या अध्यायातील १७०व्या ओवीचा विचार करत होतो. ओवीचा अर्थ एका भागात संपविणे योग्य होणार नाही. म्हणून त्या ओवीचे सूत्र आपण पुढे नेऊयात.

माणसाचा आचार, विचार, उच्चार एक असला पाहिजे तेव्हाच तो जीवनात यशस्वी होतो हे सूत्र आहे. परंतु, दुर्दैवाने आपण तसे वागत नाही. त्यामुळे आपणच अनर्थ ओढावून घेतो. अधर्माने वागायला लागतो. रामायणात एक दृष्टांत आला आहे. प्रभू रामचंद्र, माता सीता आणि बंधूश्रेष्ठ लक्ष्मण हे तिघे पंचवटीत होते. त्यावेळी सीतामाईंना सोनेरी हरीण दृष्टीस पडले. त्याबरोबर त्यांचा विचार सुरू झाला. विचाराने मनाचा ताबा घेतला. मन द्विधा अवस्थेत गेले. एक मन सोनेरी हरणच्या कातडय़ाची चोळी बनविण्याची अपेक्षा करीत होते. तर दुसरे मन ते धर्माच्या विरुद्ध आहे.

तिची अपेक्षा करू नकोस असे बजावित होते. शेवटी पहिल्या मनाचाच विजय झाला. वाईट ते अधिक झाले. सीतामाईंचा विचार बिघडला. विचार बिघडल्याबरोबर त्यांनी आपल्या पतीदेवांना हुकूम केला आणि त्यांना म्हणजे प्रभू रामचंद्रांना पत्नी इच्छापूर्ती धर्माची आठवण करून दिली. विचार प्रगल्भ झाल्याबरोबर त्याचा उच्चार केला. विचार बिघडला आणि त्या बिघडलेल्या विचाराचा उच्चार केला, त्यामुळे राम यांना हरीण मारण्यासाठी जावे लागले. त्याचा परिणाम संकट ओढवून घेण्यात झाला. म्हणजे आचरण झाले. पहिल्यांदा विचार बिघडला, त्यामुळे उच्चार बाहेर पडला. हरणाच्या पाठीमागे पतीला कामाला लावले. त्यामुळे आचारही बिघडला. हे सगळं कशामुळे घडले तर दृढनिश्चयी नसल्यामुळे घडले. सीतामाईंच्या दोन डोळय़ांनी एकरूपता न दाखविल्याने मनाची द्वीधा अवस्था कायम राहिली. दोन मनांनी दोन वेगळे रस्ते दाखविले. त्यात चुकीच्या विचारांचा प्रभाव अधिक झाला. त्यामुळे द्वय अधरपुटींना म्हणजेच ओठांनी चुकीचे उच्चारण केले हा झाला दृष्टांत.

श्रोतेहो! आपली सर्वाची अशी अवस्था पावलोपावली होते की नाही? श्री स्वामी समर्थाना भक्तांची अशी अवस्था होऊ नये म्हणून सतत काळजी असायची. त्याकरिता ग्रंथ अभ्यासाची गरज आहे. इथे लेख विस्तारामुळे देत नाही. परंतु आपण सामान्य माणसं नेहमी द्वीधा अवस्थेत असतो. एखादे काम एकाला सांगितले तर त्याच्यावर आपला भरवसा राहात नाही. मग त्यासाठी पुन्हा वेगवेगळे मार्ग अवलंबतो. उदारपणे मन एकावर विसंबून राहात नाही. समजा आपले उपास्य दैवत आंबाबाई आहे. आपण काय करतो? मंगळवार करतो. देवीची पूजा बांधतो. नवस बोलतो. मग देवी बरेच दिवस काम करीत नाही. मग कुणीतरी सांगतं तुम्ही सोमवार करून महादेवाची उपासना करा. तरीही काम होत नाही. मग दत्तप्रभूंना सांगा, गुरुवार करा. मग काम होईल. परंतु नाही. शनिवार मारुतीचा वार.शनिमहाराजांची पीडा आहे. त्यामुळे काम होत नाही. मग शनिमहाराज मारुतीरायाच्या ऐकण्यात आहे. सध्या टी. व्ही.वर जय मल्हार ही सीरियल चालू आहे. बानूची सगळी कामे खंडेराय करतात. आपलेही करतील. खंडेरायांचा वार रविवार आहे. चला रविवार करू. तरीही काम होत नाही. मग शुक्रवारही आईचाच आहे. शुक्रवारही करूया. आता राहता राहिला बुधवार. पांडुरंगाने तर सगळय़ा संतांचे घर चालवले आहे. तो गरिबांचा देव आहे.

तो नक्की आपलं ऐकेल! त्याचीही बुधवारी पूजा करू! स्वामी समर्थ चरित्राचे निर्माते याला भक्ती मानत नाहीत. कारण श्री महाराज स्वत:च सांगत, ‘बाबांनो! वडाच्या पारंब्या धरून राहा!’ याचा अर्थ काय? तर वटवृक्षाचे एकदा बारकाईने निरीक्षण करा. वडाच्या झाडाच्या पारंब्या वरून खाली येतात. त्या अगदी सरळ रेषेत खाली येतात. जमिनीत पुन्हा रुजतात. त्याच ठिकाणी वाढतात. त्यातून पुन्हा नवीन वृक्ष जन्मास येतो. वटवृक्ष विशाल असतो. तो सतत विस्तारतो. दीर्घायुषी असतो. अनेकांच्या उपयोगी येतो. औषधी असतो. घनदाट सावली देतो. स्थितप्रज्ञ असतो. म्हणून त्याला समाधी वृक्षही म्हणतात. वर्षानुवष्रे समाधी लावून बसल्यासारखा भासतो. तो कितीही उंच वाढला, विस्तारला तरीही तो पुन्हा जमिनीकडे म्हणजेच आपल्या मुळाकडे आईकडेच झेपावतो. आईला कधीच विसरत नाही. आपले मूळ कधीच सोडत नाही. म्हणून महाराज त्याचे उदाहरण देतात.

एक निश्चयी, दृढ निश्चयी, आपल्या मूळ उद्दिष्टाला धरून राहण्याचा, कितीही संकटे आली तरीही आपल्या आराध्य देवतेला, आपल्य सद्गुरू वचनाला, सत्य संकल्पाला न सोडण्याचा सल्ला श्री स्वामी समर्थ महाराज देतात. द्वीधा मन:स्थिती न ठेवता एकाच दृढ निश्चयाला धरून राहा असा त्या उपदेशाचा अर्थ आहे.
। मना सत्यसंकल्प जीवी धरावा।।
९७६५४१०२९५

कठीण प्रसंगात स्वामींनीच तारले

बेताची परिस्थिती आणि संसारात होरपळले असतानाच स्वामींच्या चरणी माथा टेकविण्याचे भाग्य मला मिळाले आणि माझ्या संसाराची विस्कटलेली घडी आज सुरळीत झाली. आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले; पण मी स्वामींच्या नामाचा घेतलेला ध्यास हा आजही सोडलेला नाही. रोज स्वामींचे अकराशे वेळा जप आणि नामस्मरण या जोरावर आज मी माझ्या आयुष्यात समाधान पावले आहे. १९९४ पासून मी स्वामींची भक्ती करत आहे. मला जळी, स्थळी स्वामींचा अनुभव आला. जेव्हा जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग आले तेव्हा तेव्हा स्वामींनीच आम्हाला तारले आहे.

माझा मुलगा लहान असताना त्याला रिक्षातून दवाखान्यात नेत असताना दहा वर्षापूर्वी कांजूरला आमची रिक्षा कलंडली आणि अपघात झाला. माझ्या डोक्याला जबर मार लागला. अशा वेळी कुणीही पुढे सरसावले नाही. मात्र एक व्यक्ती पुढे सरसावली आणि त्यांनी प्रथम माझ्या मुलाला उचलून मला तात्काळ हॉस्पिटलला हलवले. त्या व्यक्तीमुळे माझ्यावर वेळीच उपचार झाले आणि माझे प्राण वाचले. ती व्यक्ती मला स्वामींच्या रूपानेच भेटली. मी दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाते. रोज जप करणे आणि स्वामींच्या मठात जाणे हा माझा गेल्या काही वर्षाचा नेम आहे आणि त्यात कधीही खंड पडलेला नाही. स्वामीच आमचे तारणहार आहेत. त्या अपघातात डोळय़ाला बसलेल्या मारामुळे अलीकडे माझी दृष्टीही कमी आली होती. पण डॉक्टरांनी हे ऑपरेशन शंभर टक्के यशस्वी होणार नाही असे सांगितले होते. पण स्वामींच्या कृपेने आज तेच ऑपरेशन शंभर टक्के यशस्वी झाले आहे.

सुरुवातीला परिस्थितीमुळे खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. अक्षरश: यामध्ये मी पोळून गेले होते. आजारपण, दोन मुलांचं शिक्षण सांभाळून संसाराचा डोलारा सावरताना अनेक यातना झाल्या. यावेळी अनेक अडचणी आल्या; पण नित्यनेमाने स्वामींची केलेली भक्ती आज फळास आली आहे. माझा मोठा मुलगा आज चांगल्या नोकरीस आहे तर दुसरा मुलगा सी. ए. करत आहे. स्वामींनी कठीण प्रसंगात दिलेली साथ ही कधीही न विसरण्याजोगी आहे. आज स्वामींमुळे मला चांगले दिवस पाहावयास मिळाले आहेत. त्यामुळे स्वामींच्या भक्तीमध्ये कधीही खंड पडलेला नाही. मी भांडुपला राहते. पण दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाण्याचा माझा नेमही कधी चुकलेला नाही. दादर किंवा भांडुपमध्ये स्वामींच्या मठामध्ये मी नित्यनेमाने स्वामींच्या दर्शनासाठी जात आहे. कठीण प्रसंगातून आज स्वामींनी चांगले दिवस दाखविल्यामुळे माझ्या पतींचाही आज स्वामींवर पूर्ण विश्वास असून तेही वेळ मिळेल तेव्हा दादर येथे मठामध्ये जातात. त्यामुळे स्वामीच आमचे श्वास आणि ध्यास आहेत.

श्री स्वामी समर्थ स्तोत्र

आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळीवनातील निबीड अरण्यात, एकांतस्थळी एक महात्मा काष्ठ समाधीत निमग्न होता. शरीरावर लता, वेली, झुडपे, वारूळही उगवू लागली. एके दिवशी एका लाकूडतोडय़ाने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तो घाव वारूळ फोडून त्या समाधीस्त योग्याच्या मांडीवर बसला. त्यापाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूडतोडय़ा भयभीत झाला. इतक्यात त्या योग्याची समाधी भंग पावली. ते देहभानावर आले.

लाकूडतोडय़ास अभयदान दिले. तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी तेथून बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत. स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला, याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो. श्रीशैल्य पर्वतराजीतून बाहेर पडून श्री स्वामी समर्थानी कोणकोणत्या स्थानांना भेटी दिल्या, हे इतिहासाला ज्ञात नाही. परंतु स्वामींच्या कथनातून वेळोवेळी जी माहिती झाली त्यातून काही आडाखे बांधता येतात.

ते सर्वप्रथम काशीक्षेत्री आले. त्यानंतर आसेतुहिमाचल विविध तीर्थक्षेत्रांतून त्यांनी भ्रमण केले. ज्ञात इतिहासाप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रथम सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे प्रकट झाले. त्यानंतर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर असे करीत अक्कलकोटला आले. स्वामींनी अक्कलकोटला वडाच्या झाडाखाली दीर्घकाळ वास्तव्य केले, म्हणून त्यांना वटवृक्ष स्वामी म्हणून संबोधले जाते. चैत्र वद्य १३, मंगळवार, बहुधान्यनाम संवत्सर शके १८०० इ.स. १८७८ या दिवशी सायंकाळी चारच्या सुमाराला श्री स्वामी महाराज निजानंदी विलीन झाले. श्री स्वामींनी शिष्य श्री बाळप्पा महाराजांवर अनुग्रह केला. त्यांनी आपल्या चिन्मय पादुका व इतर प्रासादिक चिन्हे देऊन, अक्कलकोटला मठ स्थापन केले.

बाळप्पांना मंत्रदीक्षा देऊन त्यांना त्रयोदशाक्षरी महामूलमंत्राचा उपदेश केला. स्वामीभक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. बाळप्पा महाराजांनी स्वामींच्या आज्ञेनुसार अक्कलकोटला मठ बांधून दत्तात्रेय गुरुपीठाची स्थापना केली. गुरू दत्तात्रेयांच्या परंपरेतील भगवान अवधूत दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती (गाणगापूर) आणि श्री स्वामी समर्थ अशी श्रेष्ठ गुरू परंपरा अवधूत पीठास लाभली आहे. महान गुरू परंपरेतील
श्री स्वामी समर्थाच्या नंतरचे चौथे उत्तराधिकारी म्हणून अक्कलकोट रेल्वे स्टेशन रस्त्यावरील शिवपुरी आश्रमाचे सत्यधर्मप्रणेता परमसद्गुरू श्री गजानन महाराज १९३८ मध्ये पीठारूढ झाले.

श्री स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय. आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज आहे. अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे. त्यांची आराधना करावी. त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर हे मंत्रस्वरूप मानून अंत:करणाने ग्रहण करावे. अशी गुरुसेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंती मोक्षप्राप्ती होते. वाटेल त्याच्या हातचे अन्न ग्रहण करू नये. निरंतर केवळ विषय चिंतन करणा-या स्त्री अगर पुरुषाच्या हातचा विडाही खाल तर तुम्हीही तसेच व्हाल. दुष्ट मनुष्याच्या हातचे अन्न खाल तर तुम्हीही दुष्ट व्हाल. एक ईश्वरच सर्वत्र भरलेला आहे अशी भावना करा, जेणेकरून तुमचे मन निरंतर पवित्र राहील. परावलंबी नसावे, स्वत: उद्योग करावा व खावे. गांजा केव्हाही ओढू नये, त्याने अपाय होतो. आपल्या धर्माप्रमाणेच (कर्तव्यकर्मानुसार) वागावे, त्यानेच सर्वत्र विजय प्राप्त होतो.

ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही स्वत: कोणतीही ज्ञानपिपासा दाखविल्याशिवाय गुरू आपण होऊन ज्ञानोपदेश देणार नाहीत. साधना करताना ज्या काही सिद्धी प्राप्त होतात, त्यांचा चमत्कार दाखविण्याच्या कामी उपयोग करणे गर आहे. परमार्थज्ञानाचा उपयोग स्वचरितार्थाचे साधन म्हणून करणे हे अयोग्य आहे. ईश्वरीय ज्ञानाचा उपदेश करणा-या सर्व धर्म मतांचे व सर्व पंथांचे अंतिम ध्येय एकच असल्यामुळे सर्व धर्म मते व पंथ वंदनीय आहेत. या जगात प्राप्त होणारी सुख-दु:खे, परमात्म्याच्या इच्छेने घडतात असे मानून त्यांचा स्वीकार करावा.

मूर्तिपूजा ही त्याविषयी रहस्य जाणून करावी, केवळ मूर्तिपूजाच करीत राहणे, हेच मनुष्यप्राण्याचे कर्तव्य नाही. परमात्मप्राप्ती हे खरे ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे.


श्री स्वामी समर्थ

$
0
0
Swami Samartha

‘श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र-विलेपार्ले’ ह्या धर्मादाय संस्थेची स्थापना १९९२ साली केवळ विलेपाल्र्यातील प्रौढ स्वामीभक्तांच्या विनंतीमुळे झाली. दादर मठात जाणे ट्रॉफीक वाढल्याने सहज शक्य होत नसल्याने विलेपाल्र्यात दर्शनापुरते का होईना श्री स्वामी महाराजांचा मठ असावा अशी सर्वाची इच्छा होती.

Swami Samartha‘श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र-विलेपार्ले’ ह्या धर्मादाय संस्थेची स्थापना १९९२ साली केवळ विलेपाल्र्यातील प्रौढ स्वामीभक्तांच्या विनंतीमुळे झाली. दादर मठात जाणे ट्रॉफीक वाढल्याने सहज शक्य होत नसल्याने विलेपाल्र्यात दर्शनापुरते का होईना श्री स्वामी महाराजांचा मठ असावा अशी सर्वाची इच्छा होती. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने रविवार दि. २४ डिसेंबर २००० रोजी विलेपार्ले (पूर्व.), हनुमान रोड, श्रीधर बिल्डिंगमागील जागेत मठाची स्थापना झाली. प्रसिद्ध गायक कै. जयवंत कुळकर्णी, अजितकुमार कडकडे प्राणप्रतिष्ठेच्या दिनी उपस्थित होते.

७ जुलै २००१ वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर रात्रौ १०.३० वाजता ‘स्वामी मठात’ चमत्कार घडला. मठातील पादुकांमधून भगव्या रंगाच्या तेजोमय प्रकाश निर्माण झाला. आणि क्षणार्धात श्री स्वामी महाराजांच्या तसबिरीत लुप्त झाला. हा चमत्कार ह्या वेळी उपस्थित असलेल्या सहा भक्तांनी पाहिला. १२ वर्षानंतर घडलेला हा चमत्कार जाहिररीत्या सर्वाच्या कानावर घातला गेला. श्री स्वामी महाराजांची मुख्य तसबीर श्रेष्ठ चित्रकार शेखर साने ह्यांनी मठास सप्रेम भेटीदाखल दिली आहे. मठात देवी शांतादुर्गेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असून नवरात्रोत्सव मोठा प्रेमभावाने संपन्न केला जातो. गाभा-यात श्री गणेश, श्री दत्तात्रेय, श्री मंगेश, माय तुळजाभवानी, माय महालक्ष्मी आदी देव-देवतांच्या मूर्ती आहेत.

गाणगापूर येथील श्रीदत्त स्थानाकडून सप्रेम मिळालेल्या नृसिंह सरस्वतींच्या पादुका आणि गादी आहेत. मठात श्री स्वामी महाराजांचे शिष्य श्री स्वामीसूत महाराज, श्री गजानन महाराज, श्री बिडकर महाराज, श्री स्वामी स्वरूपानंद महाराज, श्री नाना महाराज दाते, श्री गजानन महाराज (अक्कलकोट गादी) ह्यांच्या तसबिरी असून त्यांचा सदैव जयजयकार केला जातो. आरती रात्रौ ठीक ८ वाजता सुरू होते. विडा आणि हुक्का दाखवून आरती संपन्न होते. मठातर्फे श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन- समाधी दिन, गुरुपौर्णिमा, वसंत पंचमी, नवरात्रोत्सव, दत्त जयंती उत्सव सोहळे प्रेमभावाने साजरे केले जातात. दत्त जयंतीस संध्याकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी प्रदक्षिणेसाठी प्रयाण करते. प्रदक्षिणा सोहळा अत्यंत उत्साहाने-प्रेमभावाने असंख्य भक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. रक्तदानाची शिबिरे वर्षातून ३ वेळा भरवली जातात. गरजू स्वामी भक्तांस शैक्षणिक आणि वैद्यकीय मदत मठातर्फे दिली जाते.

‘अशक्यही शक्य करतील स्वामी’ ह्या वचनाप्रमाणे २००९ साली १ ते ८ मार्च दरम्यान ‘अतिरुद्राभिषेक’ सोहळा मठातर्फे विलेपाल्र्यात संपन्न झाला. २०० ब्राह्मणांच्या सहकार्याने सोहळा संपूर्ण यशस्वी झाला. न भुतो न भविष्यती अशी प्रचिती श्री स्वामी महाराजांनी आम्हां सर्व भक्तवृंदाना दिली. अतिरुद्राभिषेकाच्या पूर्ततेची प्रचिती म्हणून ‘अक्कलकोट, तुळजापूर, शेगाव, गोवा’ येथे अवकाळी पाऊस पडला. आम्ही सर्व भक्तवृंद धन्य झालो.
पुढील काळात ‘स्वामी मठाचे’ डिजिटीलायझेशन करण्याचा विश्वस्तांचा मानस आहे. महाराष्ट्रातील सर्व स्वामी केद्रांसाठी आर्थिक निधी उपलब्ध व्हावा ह्यासाठी प्रती महिना रु. ५१ फक्त स्वामी दक्षिणा देणा-या स्वामीभक्तांच्या नावांची नोंद फेसबुक अकाऊंटवर नोंदविण्यात येणार आहे. ९ एप्रिल २०१६ ‘स्वामी प्रकट दिनाच्या शुभमुहूर्तावर किमान २५,००० भक्तांची नोंद फेसबुकवर करण्यास प्रारंभ होणार आहे.’ स्वामी भक्तांच्या सहकार्याने यशप्राप्ती होणारच, असा विश्वास आहे. विलेपार्ले मठातर्फे सर्व भक्तांना आयुष्य-आरोग्य-सुखसमाधान लाभो ही श्री स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना.

‘हम गया नही जिंदा है’ श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी भक्त हो, आपले अलिखित ठरलेले आहे की, गुरुलीलामृत ग्रंथ श्रद्धेने वाचायचा; परंतु पारायणासारखा नव्हे तर दररोज थोडाच वाचायचा, तो केवळ अभ्यास म्हणून. त्यांच्यात आलेल्या कथांचा आपल्या जीवनाशी काही संबंध आहे का? त्या कथा आम्हाला सन्मार्ग शिकवून जातात काय? त्या कथांशी आमच्या जीवनात घडलेल्या किंवा वर्तमानात घडत असणा-या गोंष्टींशी काही साधम्र्य आहे काय? याचा शोध घेण्याचे काम आपण या लेखमालेतून करत आहोत. ग्रंथ पूजन, ग्रंथाचे पारायण हा धर्माने घालून दिलेला नियम, संस्कार म्हणून योग्यच आहे. त्यानिमित्ताने ग्रंथ हाताळण्याची, डोळय़ाखालून घालण्याची किंवा ग्रंथाच्या तत्त्वज्ञानाशी जवळीक वाढते. हे खरे आहे. नव्हे ती अत्यावश्यक गरज आहे. नियमधर्म आहे. परंतु यातून एक गोष्ट होते.

ती केवळ पूजेपुरते किंवा पारायणापुरतेच नाते जोडले जाते. हल्ली याच गोष्टीचे प्रदर्शन केले जात आहे. आम्हाला बरीच मंडळी भेटतात. आम्ही गुरुलीलामृत ग्रंथाची पाचशे पारायण केली आहेत. संपूर्ण ग्रंथ आमचा पाठ झाला आहे. परंतु आम्हाला म्हणावी तशी प्रचिती श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेली नाही. काही पारायणासाठी तर दहा दहा लाख रुपये खर्च झालेले आहेत. इतका भव्यदिव्य कार्यक्रम केला होता. वगैरे वगैरे. असे ऐकल्यावर आम्हास वाटते. यात महाराजांचा काय दोष द्यायचा? त्यांनी तर असे कधीच सांगितलेले नाही. किंवा कुणाकडून काहीही घेतलेलं नाही? कुणालाही पारायण करा तरच मी तुम्हाला प्रसन्न होईल. असेही सांगितलेले नाही. किंवा कुणाच्या तरी मोठय़ा सेवकाच्या अंगात संचारून इतकी मोठी पूजा किंवा दहा लाख रुपये खर्च करा तरच मी प्रसन्न होईन अन्यथा नाही. असेही सांगितलेले नाही. कारण महाराज स्मर्तुग्रामी आहेत. म्हणजे कसे आहेत? स्मरण करताक्षणी तुम्हास साथ देणारे आहेत. तुम्ही माझे स्मरण करा. त्याक्षणी मी तुमचा आहे.

‘हम गया नहीं जिंदा है’

काय याचा अर्थ? महाराज असं का म्हणाले? का असं त्यांना म्हणावं लागलं असेल? का केवळ भक्ताचं समाधान करावयाचं म्हणून तर बोलले नसतील ना? किंवा काही तरी बोलून वेळ निभावून न्यायची म्हणून तर त्यांनी वरील वाक्याचा उच्चार केला नसेल ना? की वा त्रागून, वैतागून म्हटले असेल का? मी गेलो नाही. जिवंत आहे. असे सांगण्याचे कारण काय असावे. तर याचे उत्तर एकच नाही.

श्री स्वामी समर्थाचा अवतारच जगताच्या कल्याणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी आणि गोरगरीब, पीडितांच्या संकटमुक्तीसाठी झालेला आहे. दुसरी बाब अत्यंत महत्त्वाची म्हणजे देव, साधू, संत, सज्जन यांचे अवतार हे समाज कल्याणार्थ झालेले असतात. ते समाजाच्या गुरुस्थानी असतात. चुकलेल्या-भागलेल्या जीवांना उन्नतीचा मार्ग दाखविण्यासाठी, मोक्षप्राप्तीचा आनंद मिळवून देण्यासाठी झालेले असतात. म्हणून त्यांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा, वास्तवादीच असतो. तो प्रमाण असतो. आध्यात्माच्या बाबतीत त्याला ब्रह्मवाक्य म्हणतात. त्यामुळे वरील व्यक्त केलेल्या सर्व शंका या निर्थक आणि बालीश आहेत हे नक्की.

श्री महाराजांच्या वरील बोधवाक्य उच्चारणाच्या वेळची कथा मुद्दाम इथे देत नाही. परंतु ज्यांच्यासाठी हे उच्चारण श्री महाराजांनी केले त्या महान स्वामी सेवकाच्या त्यावेळच्या मानसिक स्थितीचा आपण विचार करायला हवा. तशी परिस्थिती, मानसिक अवस्था आपलीही ब-याच वेळा होते. हे या दृष्यांतून समजण्यासारखे आहे. या एका वाक्यातून दोन वेगवेगळे अर्थ निघतात. त्यासाठी एक दृष्यांत पाहू.

एका गुरू महाराजांनी आपल्या चार-पाच शिष्यांना बोलावले आणि त्यांना एक एक सफरचंद प्रसाद म्हणून दिले आणि त्यांना अट घातली की बाळांनो हे एक दिव्य सफरचंद आहे. फक्त ते अशा ठिकाणी खाऊन टाका की ज्या ठिकाणी खाताना तुम्हाला कुणीही बघणार नाही. गुरू आज्ञा घेऊन सगळे शिष्य निर्जन ठिकाणच्या शोधात निघाले. गुरूंच्या आश्रमाच्या पाठीमागे जाऊन एक खाऊन टाकले. एक खोल विहिरीत गेला. एक शिष्य घनदाट झाडीत गेला. तर एक जण खूप लांब जंगलात चालत गेला. परंतु पुन्हा शिष्यांना बोलावले, फळ खाल्ले का? म्हणून विचारले. प्रत्येकाने आपण कुठे जाऊन आलो व फळ कसे, कुठे खाल्ले, हे सांगितले.

सगळय़ाचे झाल्यावर ज्याने फळ परत आणून दिले त्याला गुरूंनी विचारले, खायचे सोडून तू परत का दिले? त्यावर तो शिष्य म्हणाला, गुरुमहाराज मी सगळीकडे दूरवर जाऊन आलो. परंतु कोणी पाहणार नाही, अशी एकही जागा सापडली नाही. कोणीही नाहर असे असले तरी माझं मन त्याकडे सतत पाहत होतं. त्यामुळे कोणीही पाहत नाही. अशी जागाच नाही. माझा मी तरी त्याकडे टक लावून पाहत होतो. दृष्टांत संपला. महाराज म्हणाले, तू काय करतोस? कुठे कोणती कृती करतोस? पाप करतोस की पुण्य करतोस? मनातून करतोस की वरवरचे काम करतोस? हे सगळे मला समजते. तुला वाटत असेल. श्री स्वामी समर्थानी आत समाधी घेतली. आता आपण कसेही वागायला रिकामे झालो? लक्षात ठेव. मी गेलो नाही. मी जिवंत आहे. मी पाहतो आहे. तुला सन्मार्गानेच वागायला पाहिजे. - डॉ. हेरंबराज पाठक

परमात्माप्राप्तीचे ध्येय

आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळवनातील निबिड अरण्यात, एकांतस्थळी एक महात्मा काष्ठ समाधीत निमग्न होता. शरीरावर लता, वेली, झुडपे, वारुळेही उगवू लागली. एकेदिवशी एका लाकूडतोडय़ाने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तो घाव वारूळ फोडून त्या समाधिस्त योग्याच्या मांडीवर बसला. त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूडतोडय़ा भयभीत झाला. इतक्यात त्या योग्याची समाधी भंग पावली. ते देहभानावर आले.

लाकूडतोडय़ास अभयदान दिले. तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी तेथून बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत. स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला, याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो.

श्रीशैल्य पर्वतराजीतून बाहेर पडून श्री स्वामी समर्थानी कोणकोणत्या स्थळांना भेटी दिल्या, हे इतिहासाला ज्ञात नाही. परंतु स्वामींच्या कथनातून वेळोवेळी जी माहिती झाली त्यातून काही आडाखे बांधता येतात.

ते सर्वप्रथम काशीक्षेत्री आले. त्यानंतर आसेतुहिमाचल विविध तीर्थक्षेत्रांतून त्यांनी भ्रमण केले. ज्ञात इतिहासाप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रथम सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे प्रकट झाले. त्यानंतर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर असे करीत अक्कलकोटला आले. स्वामींनी अक्कलकोटला वडाच्या झाडाखाली दीर्घकाळ वास्तव्य केले, म्हणून त्यांना वटवृक्ष स्वामी म्हणून संबोधले जाते.

चैत्र वद्य १३, मंगळवार, बहुधान्यनाम संवत्सर शके १८०० इ. स १८७८ यादिवशी सायंकाळी चारच्या सुमाराला श्री स्वामी महाराज निजानंदी विलीन झाले.

श्री स्वामींनी शिष्य श्री बाळप्पा महाराजांवर अनुग्रह केला. त्यांनी आपल्या चिन्मय पादुका व इतर प्रासादिक चिन्हे देऊन, अक्कलकोटला मठ स्थापन केले. बाळप्पांना मंत्रदीक्षा देऊन त्यांना त्रयोदशाक्षरी महामूलमंत्राचा उपदेश केला.

स्वामीभक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. बाळप्पा महाराजांनी स्वामींच्या आज्ञेनुसार अक्कलकोटला मठ बांधून दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती (गाणगापूर) आणि श्री स्वामी समर्थ अशी श्रेष्ठ गुरुपंरपरा अवधूत पीठास लाभली आहे. महान गुरू परंपरेतील श्री स्वामी समर्थाच्या नंतरचे चौथे उत्तराधिकारी म्हणून अक्कलकोट रेल्वे स्टेशन रस्त्यावरील शिवपुरी आश्रमाचे सत्यधर्मप्रणेता परमसद्गुरू श्री गजानन महाराज १९३३ मध्ये पीठारूढ झाले.

श्री स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय. आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज आहे. अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतन चिंतन करावे. त्यांची आराधना करावी. त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर, हे मंत्रस्वरूप मानून अंत:करणाने ग्रहण करावे. अशी गुरुसेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंती मोक्षप्राप्ती होते.

वाटेल त्याच्या हातचे अन्न ग्रहण करू नये. निरंतर केवळ विषय चिंतन करणा-या स्त्री अगर पुरुषाच्या हातचा विडाही खाल तर तुम्हीही तसेच व्हाल. दुष्ट मनुष्याच्या हाताचे अन्न खाल तर तुम्हीही दुष्ट व्हाल. एक ईश्वरच सर्वत्र भरलेला आहे अशी भावना करा, जेणेकरून तुमचे मन निरंतर पवित्र राहील. परावलंबी नसावे, स्वत: उद्योग करावा व खावे. गांजा केव्हाही ओढू नये, त्याने अपाय होतो. आपल्या कर्तव्यकर्मानुसार वागावे, त्यानेच सर्वत्र विजय प्राप्त होतो. ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही स्वत: कोणतीही ज्ञानपिपासा दाखवल्याशिवाय गुरू आपण होऊन ज्ञानोपदेश देणार नाहीत. साधना करताना ज्या काही सिद्धी प्राप्त होतात, त्यांचा चमत्कार दाखविण्याच्या कामी उपयोग करणे गैर आहे. परमार्थ ज्ञानाचा उपयोग स्वचरितार्थाचे साधन म्हणून करणे हे अयोग्य आहे.

ईश्वरीय ज्ञानाचा उपदेश करणा-या सर्व धर्म मतांचे व सर्व पंथांचे अंतिम ध्येय एकच असल्यामुळे सर्व धर्म मते व पंथ वंदनीय आहेत. या जगात प्राप्त होणारी सुख-दु:खे, परमात्माच्या इच्छेने घडतात, असे मानून त्यांचा स्वीकार करावा. मूर्तीपूजा ही त्याविषयी रहस्य जाणून करावी, केवळ मूर्तीपूजाच करीत राहणे, हेच मनुष्यप्राण्याचे कर्तव्य नाही. परमात्माप्राप्ती हे खरे ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे. - योगेश मधुकर सावंत

भारतीय संस्कृती : वेदांची उत्पत्ती

$
0
0
ANCIENT VEDAS

भारतीय संस्कृती ही वेदमान्य संस्कृती आहे. म्हणूनच प्रतीके जाणून घेण्याआधी ‘वेदांची उत्पत्ती’ समजून घेणे इष्ट ठरेल.

ANCIENT VEDASश्री वेदपुरुषाय नम:।

वेद हे अपौरुषेय आहेत. म्हणजेच ते कोणा एखाद्या व्यक्तीने लिहिलेले किंवा रचलेले नाहीत. तर भगवंताच्या निद्रिस्त अवस्थेत निर्माण झालेला ज्ञानसागर म्हणजे ‘वेद’. वेद भगवंतांच्या हृदयात वास करतो. भगवंत निद्रिस्त असताना, वेद नादरूपाने बाहेर पडला व प्रज्ञावान ऋषींना नादरूपाने वेदाचे ज्ञान झाले. हा नाद ऐकण्यासाठी ऋषींनी अंत:कर्ण सूक्ष्म केले. हा नाद ऐकून ऋषी भारावून गेले व त्यांनी ब्रह्मजन निर्माण करून या नादरूपाची कीर्ती कथन केली. नादाची अनुभूती आलेल्या ऋषींनी या नादाला आकार दिला व वेद दृश्यरूप झाले. हे सर्व नादाकार केवळ जिव्हेवर वागवून या प्रज्ञावान ऋषींनी इतरांना दीक्षा दिली. त्यामुळे वेदमंत्र दृढ झाले.

हे वेदमंत्र जसेच्या तसे (काना, मात्रा, ऱ्हस्व-दीर्घ, इकार, उकार, अनुस्वार व विसर्ग इ. सहित) म्हटले जातात. कानांनी श्रवण करूनच त्यांच्या उच्चारांचे ज्ञान होते. म्हणूनच वेदाला ‘श्रुति’ असेही म्हणतात. कालांतराने वेदांचे अक्षरीकरण झाले व त्यानंतर ते लिपीबद्ध झाले. उच्चारांचे शास्त्र हे त्यानंतर तयार झाले. अशा रीतीने हा वेदसागर, ज्ञानसागर आपल्यापर्यंत येऊन त्याचे दर्शन आपल्याला झाले.

जन्मत: वेद एकच असून त्याचे आकारमान खूप मोठे होते. वेद टिकवण्यासाठी मौखिक परंपरेनेच ते एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जाणे, हे त्या काळी शक्य होते. मनुष्याची आयुर्मर्यादा लक्षात घेतली तर एकाच जन्मामध्ये या एका वेदाचे अध्ययन आणि अध्यापन करणे अशक्य आहे, हे महर्षी व्यासांनी ओळखले व एका वेदाचे चार भाग केले. आपल्या शिष्यांपैकी चार बुद्धिमान शिष्य निवडले व एकेका शिष्याला एकेक वेद दिला. म्हणजे त्या वेदाचे अध्ययन व अध्यापनाची जबाबदारी त्या-त्या शिष्यावर सोपवली.

ऋग्वेद – पैल शिष्य

यजुर्वेद – वैशंपायन शिष्य

सामवेद – जैमिनी शिष्य

अथर्ववेद – सुमंतु शिष्य

या शिष्य संप्रदायाला ‘ब्रह्म संप्रदाय’ असे म्हणतात. ब्रह्मदेव, वसिष्ठ, शक्ती, पराशर आणि व्यास अशी ही शिष्य परंपरा आहे. ही शिष्य परंपरा पुढे सुरू राहिली. वरील चार वेदांच्या एकूण १ हजार १३१ शाखा होत्या. त्यापैकी आज केवळ १२ शाखा ग्रंथरूपाने उपलब्ध आहेत.

‘वेद’ हे केवळ ज्ञानाची चर्चा करणारे वाङ्मय नाही तर ज्ञानाचा विनियोग केव्हा करावा, कसा करावा याचे योग्य मार्गदर्शन करणारा महान ठेवा आहे. ७ नोव्हेंबर २००३ रोजी युनेस्कोने वेदांना ‘मौखिक’ म्हणजेच ‘अमूर्त अशी वाडवडिलोपार्जित मालमत्ता’, म्हणून घोषित केले आहे.

(संदर्भ : वेद – विकिपिडिया) समस्त भारतीयांना अभिमान वाटावा, अशीच ही गोष्ट आहे. म्हणून वेदांचे जतन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
परंतु, हे केवळ ज्ञानाचे वैभव अथवा ठेवा म्हणून जपून न ठेवता लोककल्याणासाठी त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा.

(संदर्भ : अधिक अभ्यासासाठी ‘वेद-पुराण-समालोचन’ हे पुस्तक वाचावे.)

सूर्यध्यानाचे महत्त्व

$
0
0
MEDITATION

सूर्य म्हणजे अलौकिक तेजाचे प्रतीक. आपणाला माहीत असणारा, दिसत असणारा विश्वातील सर्वात तेजस्वी तारा कोणता असेल, तर तो म्हणजे सूर्य. 

MEDITATIONसूर्य म्हणजे अलौकिक तेजाचे प्रतीक. आपणाला माहीत असणारा, दिसत असणारा विश्वातील सर्वात तेजस्वी तारा कोणता असेल, तर तो म्हणजे सूर्य. जणू प्रकाशाचा प्रचंड गोळा. अंधकार दूर करून मानवाला प्रकाशाकडे नेणारा परमेश्वर.

राजा दिलीप, राजा अज, राजा दशरथ, राजा प्रभू श्रीरामचंद्र इत्यादी अनेक मान्यवर महाराजे सूर्यवंशातील होते. त्यांची सूयरेपासना परंपरेने चालू असायची. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जायची. राजपुतान्यातील सर्वच रजपूत राजे सूयरेपासक होते. माझ्या असे वाचनात आले आहे की, मोगल बादशाह अकबरही सूयरेपासक होता. संतामधील समर्थ रामदास, संत एकनाथ, संत तुलसीदास इत्यादी महान संत सूर्यपूजक होते. हिंदू धर्मात सूर्यपूजेची सांगड ब-याच ठिकाणी पाहायला मिळते.

सूर्यध्यान आणि सूयरेपासना जगात ब-याच ठिकाणी केली जाते. अर्थात भारतीय संस्कृतीमधील हिंदू धर्मातील सूयरेपासना आणि इतर देशांतील सूयरेपासना यात फरक आहे. पारशी धर्मात अग्नी आणि सूर्याची उपासना करतात. ग्रीक देशातील प्राचीन पौराणिक ग्रंथात सूर्याची बरीच वर्णने आढळतात. बॉबिलॉन लोक कट्टर सूयरेपासक होते. सुमेरियन, फेल्डियन संस्कृतीत सूयरेपासनेला कमालीचे महत्त्व दिले जाते. पौराणिक काळात रोममध्ये सूर्याची वेगवेगळ्या नावाने उपासना केली जात असे. आजच्या युगात अनेक पाश्चिमात्य लोक समुद्रकिना-यावर जाऊन उघडय़ा अंगाने सूर्यकिरणे अंगावर घेऊन वाळूत झोपलेले आढळतात. थंड कटिबंधात राहणा-या या लोकांना सूर्यकिरणांचा उपयोग समजलेला आहे, म्हणूनच सूर्यस्नान  करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात वाढत आहे.

सूर्याची बारा नावे आहेत. त्यांचा अर्थ पाहिला तर सूर्याच्या बाबतीत तो अतिशय समर्पक असल्याचे दिसून येते. म्हणून सूर्याची बारा नावे आणि त्याचा मान्य अर्थ पुढे देत आहे.

मित्र – जगन्मित्र

 रवि – सर्वाना पूजनीय

 सूर्य – प्रवर्तक-संचालक

 भानू -तेज अथवा सौंदर्य देणारा

 खग -इंद्रियोद्दीपक

 पूषन् – पोषणकर्ता

 हिरण्यगर्भ – वीर्यबलवर्धक

 मरीचि – सर्व रोगनाशक

 आदित्य – सर्वाकर्षक

 सवितृ – सवरेत्पादक

 अर्क – आदरणीय

 भास्कर – प्रकाशमान

सूर्यध्यान करताना सूर्याच्या वरील नावांचा उपयोग मंत्रामध्ये करून त्यांचा उच्चार करत ध्यान केले असता ते अधिक फलदायी ठरते. सूर्यध्यानामध्ये सूर्यनमस्कार करणे हीसुद्धा एक उत्तम उपासना आहे.

सामर्थ्य, बुद्धिविकास, उत्साह आणि दीर्घायुष्यप्राप्तीसाठी सूर्यनमस्कार हा एक चांगला मार्ग आहे. म्हणूनच सूर्यनमस्कारास सर्वागसुंदर व्यायाम असे म्हटले जाते. सूर्यकिरण चिकित्सा आणि गर्भसंस्कार यासाठीही सूर्यध्यान अत्यंत उपयोगी मानले जाते.

संमोहनसाधकांच्या दृष्टिकोनातून तर सूर्याचे महत्त्व अनमोल आहे. संमोहनशक्तीचा विकास होणे, नजरेत तेज येणे, शरीराच्या अवतीभवती तेजोवलय विकसित करणे यासाठी त्याचा बहुमोल फायदा होऊ शकतो. मला आणि माझ्या शिष्यांना व्यक्तिश: तो बराच झाला आहे.

सज्जनगडची आंग्लाई देवी?

$
0
0
SANJANGAD ANGALAI DEVI

सातारा जिल्ह्यातील गडावर रामदास स्वामींचे कायम वास्तव्य असल्याने त्या गडाला ‘सज्जनगड’ असे संबोधले जाऊ लागले. या गडावरील मशिदीच्या समोरच्या बाजूस असलेल्या ‘श्रीदेवी आंग्लाई’ मंदिराविषयी.

SANJANGAD ANGALAI DEVIसातारा जिल्ह्यातील ‘सज्जनगड’ हा साता-यापासून १० कि. मी. अंतरावर असून या ठिकाणी जाण्यास बससेवा आहे. शिलाहारकालीन या सज्जनगडावर प्राचीन काळी आश्वलायन ऋषींचे वास्तव्य घडले, त्यामुळे दुर्गाला ‘आश्वलायनगड’ असे संबोधण्यात आले. सध्या या गडास ‘अस्वलगड’ व ‘परळीगड’ अशी ओळख आहे. बहामनी सत्तेच्या उतरत्या कालखंडात गडाचा ताबा विजापूरच्या आदिलशहाकडे आला, त्यावेळी याचे नाव ‘नवरसतारा’ होते. २ एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून हा गड जिंकला. रामदास स्वामींच्या या गडावरील कायमच्या वास्तव्याने यास ‘सज्जनगड’ असे संबोधण्यात येऊ लागले. जून १७०० मध्ये गडाचा ताबा औरंगजेबाकडे आल्यावर त्याने परत ‘नवरसतारा’ अर्थात ‘नौरसतारा’ असे नाव ठेवले.

सध्या गडावरील रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांची संख्या जास्त आहे. सज्जनगडाच्या दुर्गअवशेषांत प्रवेशद्वार, रामघळ, शिवाजी महाराज राजद्वार, पर्शियन शिलालेख, आदिलशाही शिलालेख, घोडाळे तळे, मशीद, वास्तू, श्रीदेवी आंग्लाई मंदिर, कबरी, बुरूज, तटबंदी, राम मंदिर, समर्थ रामदास स्वामी समाधी व महत्त्वाच्या वस्तू इत्यादींचा समावेश आहे.

गडावरील मशिदीच्या समोरच्या बाजूस आंग्लाई देवीचे मंदिर आहे. समर्थाना अंगापूर डोहात दोन मूर्ती सापडल्या. यांपैकी सूर्यनारायणाच्या मूर्तीची त्यांनी चाफळ येथे श्रीराम मूर्ती म्हणून स्थापना केली व श्री आंग्लाई देवीच्या मूर्तीचीही स्थापना केली. शिवकाल व पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा जपणारी आंग्लाई देवीचं स्थान हे अनेक घडामोडींचे साक्षीदार आहे.

ऐतिहासिक संदर्भानुसार गडावर समर्थ वास्तव्यास आल्यानंतर शिवरायांनी २००० होन खर्चून एक मठ बांधून घेतला. इब्राहिम आदिलशहाने या गडाचे नाव ‘नवरसतारा’ ठेवण्यामागील कारण सांगताना साकी मुस्तैदखान लिहितो की, ‘‘तो प्रत्येक नवीन गोष्टीला ‘नवरस’ हे नाव देत असे. उदाहरणार्थ नवरसनामा, नवरसपूर गाव आणि नवरस नाणे. त्यास अनुसरून किल्ल्याचे नाव ‘नवरसतारा’ ठेवण्यात आले.’’

ऐतिहासिक संदर्भात ७ मे १७०० मध्ये औरंगजेबाने गडाखालील मोर्चाची पाहणी केली. बाणदारांना बाण किल्ल्यात फेकण्यास सांगितले. दोन दारूचे बाण किल्ल्याच्या दिशेने सोडण्यात आले. ३१ मे फतेहुल्लेखानाने लिहून पाठवले की, ‘‘मी पगाराचे वाटप केले. उद्या मी हल्ला करणार आहे. त्यासाठी शिडय़ा तयार केल्या आहेत. मला धनुष्य व बाणांचे भाते देण्यात यावेत.’’ गडावरील औरंगजेबाचा वाढता हल्ला लक्षात घेऊन परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी व उद्धव गोसावी यांनी गडावरील पूजनीय मूर्ती घेऊन गड सोडला व त्या वासोटा किल्ल्यावर ठेवल्या.

१३ जून १७०० रोजी गडावर विजय मिळवल्यानंतर औरंगजेब डोक्याला शिरपेच बांधून किल्ला पाहण्यास गेला व गडावरील सर्व नवी मंदिरे जमीनदोस्त करण्याचा त्याने हुकूम अमलात आणला गेला. परशुराम त्र्यंबक प्रतिनिधींनी मुघलांच्या ताब्यातून पुनश्च गड जिंकल्यावर वासोटय़ावर नेऊन ठेवलेल्या देवमूर्ती पुन्हा सज्जनगडावर आणल्या व त्यांची प्रतिष्ठापना केली. यानंतर येथील मंदिरांची पुनर्बाधणी व डागडुजी करण्यात आली.

होळी म्हणजे षड्रिपूंचा त्याग!

$
0
0
SANT TUKDOJI MAHARAJ

फाल्गुन पौर्णिमेला येणारा शिमगा म्हणजे होळी हा सण करण्यामागे जे गुह्य लपले आहे, ते समाजाने अंगीकारले तर कधीही स्वत:ची होळी करायची वेळ येणार नाही. मनुष्यदेहातील षड्रिपूंना मुक्त करणे, हा त्यामागचा खरा उद्देश आहे.

SANT TUKDOJI MAHARAJराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी होळीबाबतही समाजाचे प्रबोधन केले आहे.

। होळीचा आला शिमगा सण।
त्यात मोठी मारहाण।
। लोकइभ्रतमान सोडोन। पळती मार्गी वेडेसे।

होळीचा सण अर्थात शिमगा हा सण वाईटाचा नाश करत चांगल्याची कास धरायला लावणारा सण आहे. पण आज लोकांनी याला वेगळे स्वरूप दिले आहे. लोक यादिवशी एकमेकांना रंगाच्या माध्यमातून मारहाण करतात. विविध राज्यात विविध पद्धतीने होळी सण साजरा केला जातो. काही वेळेस लोक एकमेकांना शिव्या देत चिखलाने मारहाण करतात. या पद्धतीने आजवर कधीच होळी साजरी केली गेली नव्हती. खरं तर वाईटाचा नाश करणारी होळी पेटवल्यानंतर त्याची राख अंगाला लावायची असते. पण लोकांनी याला वेगळे स्वरूप दिले आणि रंगांची उधळण करत वेगळा सण निर्माण केला. जर आपण आपल्या रंगात रंगू शकत नाही तर लोकांना कसं रंगवणार, असा प्रश्न महाराज विचारतात.

। हा वाढला विचित्रपणा। ऐसा नोहे शिमगा जाणा।
। त्यातहि आहे तात्विकपणा। घेण्यासारिखा समाजा।

होळी साजरी करण्याची कलियुगातील पद्धत पाहून महाराज म्हणतात, हा सर्व विचित्रपणा आहे. या पद्धतीने होळी साजरी होतच नव्हती. पण आज होळी साजरी करण्याची शैली पाहून समाजात विचित्रपणा वाढला आहे, असे महाराज सांगतात. रंगांची उधळण आणि एकमेकांना शिवीगाळ करून कधीच शिमगा साजरा झाला नव्हता. शिमगा सणातील तात्त्विकपणा समाजाला घेण्यासारखा आहे, असे महाराज याठिकाणी ठामपणे सांगतात.

। याचदिवशी प्रल्हादाची छळणा।
केली होती होळीने जाणा।
। परि दु:ख न झाले प्रल्हाद प्राणा। हरिभक्त म्हणोनि।

महाराज म्हणतात, लोकहो, यादिवशी भक्त प्रल्हादाची छळवणूक करण्यात आली होती. होलिकाने भक्त प्रल्हादाला संपवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तीच त्या होळीत राख झाली. मात्र प्रल्हादाला इजा झाली नाही, कारण तो हरिभक्त होता. वाईटाचा नाश होतो; पण सत्याचा नाश होत नाही. हरिभक्ती करणा-याला भगवंत तारून नेतो; पण सणावारांच्या नावाखाली सोंगढोंग करणा-याला परमेश्वर कधीच प्राप्त होत नाही, अशी ग्वाही महाराज याठिकाणी देतात.

। शेवटी छळणारेची जळले। हे गावासी कौतुक झाले।
। म्हणोनि जन ओरडले। उपहास त्याचा करोनि।

प्रल्हादाला ठार करण्यासाठी आलेली होलिका स्वत: दहन झाल्यावर लोकांनी प्रल्हादाचे कौतुक केले. वाईटाचा निषेध करण्यासाठी हा सण उपहासात्मक पद्धतीने केला जातो.

। म्हणती कोणी वर्षातून। शिव्यासाठीच एक दिन।
। परि सज्जनासि याचे काय कारण। ये उत्तेजन दुर्जना।

होळी या सणाचे महात्म्य साधूसंतांनी विविध पद्धतीने वर्णिले आहे. पण दुर्जनांच्या मतिप्रमाणे विचार केला असता, तुकडोजी महाराज म्हणतात, होळीचा हा वर्षातील हा एक दिवस एकमेकांना शिवीगाळ करण्यासाठी राखून ठेवला आहे, परंतु वास्तविक पाहता हे सत्य नाही. सज्जनांनी यातून जो बोध घेतला आहे, या बोधातून दुर्जन काय शिकणार, असा प्रश्न तुकडोजी महाराज लोकांना विचारतात. जर सज्जनांनी या सणांचा अवलंब केला तर या सणातून दुर्जनांना प्रोत्साहन दिल्यासारखे होईल, असे ही महाराज निदर्शनास आणून देतात.

। पुढे याचा विपर्यास झाला। शिविगाळ देती परस्पराला।
। पोथ्याहि सांगती ‘अभद्र बोला’। मूळ त्याचे न जाणता।

महाराज म्हणतात, सणासुदीच्या नावाखाली ढोंग केली जातात. कोणत्याही सणाचा बोध घेतला तर त्याचा आयुष्य जगण्यासाठी उपयोग होतो. मात्र दुर्जनांना हा सण का साजरा करायचा असे विचारल्यास ते पुराणाचे ग्रंथ पोथ्याचे दाखले देतात आणि सांगतात की, हाच दिवस अभद्र बोलण्यासाठी राखून ठेवला आहे. आता आपण ठरवायचे आहे की, आपण सज्जन आहोत की, दुर्जन?

। त्याच दिवशी शंकराने।
काम जाळीला तिस-या नयने।
। म्हणोनि कामांस धिक्कारले भुतसेनेने। हलकल्लोळ करोनि।

याच दिवशी भगवान शंकरांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता, अशी कथा सांगितली जाते. भगवान शंकरांनी त्यांचा तिसरा डोळा उघडून काम (वासना) जाळले होते. मनुष्यदेहात काम नसता तर मनुष्य भगवान झाला असता. यासाठी काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार या षड्रिपूंपासून दूर राहा, असाही संदेश या होळीतून मिळतो. म्हणून भूत योनीत काम हा प्रकारच नाही. भूतसेनेने कामाला वज्र्य केले आहे.

। त्याच दिवशी सज्जनांनी।
वार्षिक यज्ञाची केली आखणी।
। संपूर्ण गाव साफ करोनी। द्यावे पेटवोनि कैचण ते।

या सगळ्या कथांचा सारांश काढून सज्जनांनी मात्र यातील एकच चांगला गुण घेतला. महाराज म्हणतात, सज्जनांनी या दिवशी संपूर्ण गाव साफ, स्वच्छ केला आणि वर्षातून एकदा ग्रामस्वच्छतेचा वसा घेतला. वाईटाचा नाश करत त्यांनी चांगला गुण अंगीकारला, असे महाराज सांगतात.

स्मरताक्षणी मी आहे

$
0
0
swami samarth

देव संतांच्या शब्दात किती ताकद असते पाहा..! त्यांनी उच्चारलेल्या शब्दांची, वाक्यांची प्रचिती येतेच हा अनुभव आहे. मागील भागात ‘हम गया नही जिंदा है’ या स्वामी महाराजांच्या वाक्याचा अर्थ शोधत होतो. बाबारे! 

swami samarthदेव संतांच्या शब्दात किती ताकद असते पाहा..! त्यांनी उच्चारलेल्या शब्दांची, वाक्यांची प्रचिती येतेच हा अनुभव आहे. मागील भागात ‘हम गया नही जिंदा है’ या स्वामी महाराजांच्या वाक्याचा अर्थ शोधत होतो. बाबारे! मी पाहतो आहे. याचं भान तुला असलचं पाहिजे. असा सज्जड दम देणारे स्वामी समर्थ महाराज आपण पाहिले. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र ते रूप भरून उरलेले आहे. महाराजांची शक्ती कल्पनातीत आहे. त्याचा अंतपार वेदानाही लागलेला नाही. म्हणून माणसांचा देह धारण करून अवतरलेले महाराज हे फक्त लौकिक देह विसर्जित करण्यासाठी समाधिस्त झाले. हेच खरे आहे. आजही अनेकांना सहाय्यभूत झालेले महाराज अनेकांकडून ऐकायला मिळतात. याची प्रचिती आम्ही घेतली. दोन वर्षापूर्वी एक चमत्कारिक घटना घडली.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भर उन्हाळय़ात संध्याकाळी चारच्या दरम्यान अवकाळीचे वातावरण निर्माण झाले. अक्कलकोटच्या वटवृक्ष स्वामी मंदिरात भक्तांची खूप मोठी गर्दी दर्शनासाठी झाली होती. अचानक पाऊस, विजांचा कडकडाट सुरू झाला. मंदिरात लोक मिळेल तिथे आडोशाला उभे राहिले होते. गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. तेवढय़ात विजेचा प्रचंड लोळ वटवृक्षातून खाली आला. त्याचा आवाज अक्कलकोट शहरापासून दहा किलोमीटरच्या पंचक्रोशीत घुमला. आसपासचे सगळे टी.व्ही. इलेक्ट्रिक वस्तू जळून गेल्या, परंतु वटवृक्षाच्या फांदीतून आलेला विजेचा लोळ खाली आला आणि पुन्हा आल्या त्या मार्गाने परत गेला.

कुणालाही इजा झाली नाही. कानठाळय़ासुद्धा बसल्या नाहीत. महिला, लहान मुले, पुरुष मंडळी घाबरून मुकी झाली होती. परंतु कोणालाही त्याची झळ बसली नाही. हाय लागली नाही की वटवृक्षाची पाने सुद्धा जळाली नाहीत. प्रसंगानंतर दुरुस्तीच्या दुकानात खूप गर्दी झाली. या घटनेचा प्रत्येक जण अर्थ वेगवेगळा काढतील. परंतु डोळस, श्रद्धेय माणूस मात्र म्हणेल ही स्वामीलीला आहे. ‘हम गया नही जिंदा है’ या वाक्याचीच प्रचिती आहे.

श्री महाराजांनी चैत्र वद्य १३ मंगळवार शके १८०० सन १८७८ दुपारी चार वाजता समाधी योग साधला. तत्पूर्वी महाराजांनी श्री चोळप्पांच्या घरी ब्रह्मानंद गंहेची निर्मिती स्वत:साठी करवून घेतली. तेथे त्यांनी अष्टवसू, दशदिक्याळांची स्थापना करवून घेतली. समाधीच्या वरती उजवीकडे गणपती, मध्ये मल्हारी मरतड आणि डाव्या बाजूला आम्रकोटी महादेवाची स्थापना करवून घेतली. त्याचे पौरोहित्य योगीराज श्री चिदंबर दीक्षित यांनी केल्याचा उल्लेखही आहे. महाराज म्हणाले हे देव आमचे पाहुणे आहेत. ‘आम्ही जे जेऊ त्यातील त्यांना आधी देऊ, मग आम्ही खाऊ’ इत्यादी वर्णन येथे उल्लेखीत करण्याचे कारण म्हणजे महाराजांचा समाधीयोग झाला हे निश्चित होते. परंतु त्यानंतर ते म्हणतात, ‘हम गया नहीं जिंदा है’ हे प्रकट बोधवाक्य सर्वश्रृत आहे.

असे असून सुद्धा श्री स्वामी समर्थ कोठे आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनात येणार हे स्वत: महाराजांनीच जाणले होते. त्यामुळे त्याचे उत्तर त्यांनीच देऊन ठेवले आहे.

अनन्याश्चिंतयन्तो मां ये जन: पर्युपासते।।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेत्रं वहाम्यहम ।।

या गीतेतील श्लोकाचे उच्चारण स्वत: महाराज अनेकवेळा करत. म्हणून महाराजांना स्मर्तुग्रामी म्हटले जाते. स्मरण करा. अनन्य भावभक्तीने त्यांचे स्मरण करा त्याक्षणी मी तुमच्या पाठीशी आहे. असे प्रकटभाष्य त्यांनी केलेले आहे. मग प्रश्न मनात राहण्याचे कारणच नाही. महाराज ‘हम गया नहीं जिंदा है’ असे का सांगतात, तर मनामध्ये अन्य कोणताच किंतू, विचार न ठेवता जो स्मरण करतो. महाराजांची आठवण काढतो. त्याला महाराज आजही सहाय्य करतात. हा हजारोंचा अनुभव आहे. पण तरीही काहीजण, महाराज अमूक ठिकाणीच आहेत. किंवा अमूक ठिकाणी नाहीत. अशी बाष्फळ बडबड करताना दिसतात. कारण देव सर्वत्र भरुन उरला आहे.

देव सर्वत्र भरला।
अवघा ठाव रिता नाही उरला।।

असे तुकोबाराय सांगतात. मग आम्ही काय करायचे तर सर्वत्र भरलेले स्वामी महाराज हे एक मनाची उर्जाश्रोत समजून नामस्मरणाची उपासना करायची. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण हाच मोठा भक्तिमार्ग आहे. त्यातूनच ‘हम गया नहीं’ या वाक्याची प्रचिती येते. हा अनुभव आहे. कारण महाराज पुन्हा आपल्या पाठीशी सत्कर्माच्या वेळी आहेत की नाहीत? हे वेगळे पाहण्याची गरजच राहात नाही. कारण श्रींचे दुसरे आश्वासन आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

।। गोडी नामस्मरणाची।।

मला लहानपणापासून वाचनाची पुष्कळ आवड. मी अनेक पुस्तके वाचली. त्यात माझे आध्यात्मिक पुस्तकाचे वाचनही बरेच झाले आणि आध्यात्मिक वाचनातून मला सारखे नामस्मरणाला पर्याय नाही हे जाणवत होते व मलाही नामस्मरण करावे असे वाटत होते. पण मन चित्त था-यावर ठेऊन नामस्मरण होतही नव्हते व वेळही मिळत नव्हता, म्हणजे तो काढला ही जात नव्हता व असेच पाच वर्षापूर्वी मी दत्तजयंतीच्या दरम्यान गावी मालवणला होतो व माझा मेहुणा शांताराम कांदळगांवकर दत्तजयंती दिवशी मला सकाळीच म्हणाला, चल जरा काम आहे.

आपण सावंतवाडीला जाऊ या. मीही कंटाळलो होतो. चल म्हणालो व आम्ही दोघे त्यांच्या मोटार सायकलने निघालो व वाटेत कुडाळ मार्गे जाताना राऊळ महाराजांचा मठ लागला. मी ही राऊळ महाराजांबद्दल व त्यांच्या मठाबद्दल स्वामींच्या पुस्तकात वाचले होते. व मला त्या मठात जायचेही होते, मग आम्ही परत येताना त्या मठात जाण्याचे ठरवले व परतीच्या प्रवासात त्या मठात आलो व नेमकी आम्हाला आरती मिळाली. व आम्ही आरतीला थांबलो. समोर राऊळ महाराजांची सुंदर मूर्ती होती, पण आरती चालू असेपर्यंत राऊळ महाराजांच्या मूर्तीत मला सारखे स्वामी समर्थच दिसत होते.

माझ्या मनात थोडी कालवाकालव झाली, कारण आम्ही स्वामीभक्त आणि दिवस दत्तजयंतीचा आणि राऊळ महाराजांच्या मठात मला समजत नव्हेत, माझ्या मनाचा भ्रम की चमत्कार, पण आरती संपल्यावर दर्शन रांगेतून पुढे गेल्यावर राऊळ महाराजांचीच मूर्ती दिसली. आम्ही दर्शन व प्रसाद घेतला व आजूबाजूच्या मंदिरातही दर्शन घेतले व मी माझ्या सवयीप्रमाणे तेथील दुकानात राऊळ महाराजांची अधिक माहिती मिळावी म्हणून काही पुस्तक मिळते का ते पाहू लागलो व एक पुस्तक घेतले व त्या पुस्तकाबरोबर दुकानदाराने मला राऊळ महाराजांचा एक फोटोही दिला. त्या फोटो मागे एक संदेश लिहिला होता,

।। जीवनात आल्यावर कमीत कमी दिवसातून एक वेळ। परमेश्वराचे नाव घ्यावे की, जेणेकरून जीवनाचे सार्थक होईल।।

आम्ही दोघेही घरी आलो, पण मी एक निर्णय घेतला व तो सतत गेली पाच वर्षे सातत्याने पाळत आहे. मी श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण चालू केले व खरंच नामस्मरणानी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होतो हे मला पटले. नामस्मरणामुळे मला एक विलक्षण ईश्वरीय शक्ती आपल्याबरोबर सतत आहे. यांचा चांगलाच अनुभव आहे.

।। श्री स्वामी समर्थ।।

स्वामींच्या नामाची पालखी
भक्तानी खांद्यावर घेतली
वाट चालुया जीवनाची
गोडी लागली नामस्मरणाची
सोबत आहे श्री स्वामी समर्थाची।। - मयूर ढोलम

‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे’

या स्वामींच्या वाक्याचा परिचय मला माझी आई रुग्णालयामध्ये असताना आला. हे वाक्य लिहिताना माझ्या अंगामध्ये आता पण शहारे येत आहेत.माझी आई नानावटी रुग्णालयामध्ये उच्चरक्तदाबाच्या त्रासाने आजारी असल्या कारणाने भरती केली होती. डॉक्टरांचे चार दिवस औषध उपचार चाले होते. डॉक्टरांनी चार दिवसांनी म्हणजेच शनिवारी सांगितले की रविवारचा दिवस असू दे आता तब्येत बरी आहे. सोमवारी तुम्ही घरी घेऊन जा. त्याच दिवशी माझा दोन नंबर भाऊ व भावजय आईला रुग्णालयामध्ये बघायला आली आणि त्याच दिवशी तो आईबरोबर काही तरी त्याचे बोलणे झाले (त्याच्या वैयक्तिक त्रासाबद्दल) आणि तो आईसमोर रडायला लागला. आईने त्याच्या बोलण्याचा धसका घेतला आणि ३ ते ४ चार तासांनंतर आईचे संतुलन बिघडले आणि आई ३० ते ३५ र्वष पाठीमागच्या विषयी बोलू लागली.

ती कोणाला ओळखत पण नव्हती एक सारखी तेच तेच विषयी बोलत होती. नजरेला नजर लावत नव्हती ताबडतोब डॉक्टर, नर्स यांनी आईला आय सीयूमध्ये ठेवले आई कोणाचे ऐकत नव्हती आणि रुग्णालयाच्या खॉटेवर झोपत या बसत नव्हती. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले तरी झोपत नव्हती. डॉक्टर आपल्या परीने प्रयत्न करीत होते. शेवटी डॉक्टरांनी त्यांच्या कर्मचा-यांना आईचे हात-पाय खाटेला बांधून ठेवायला सांगितले. तेव्हा माझ्या डोळय़ातून पाण्याच्या धाराच येऊ लागल्या. मनातून पुरेपूर खचलो होतो. पण घरामध्ये मी मोठा असल्याकारणाने मी माझ्या मुलांना, बायकोला, भावंडांना, आणि बाबांना पण दाखवू दिले नाही की मला किती त्रास होतोय. आईला रुग्णालयामध्ये टाईमा टाईमावर चहा-नाष्टा जेवण येत होते. जे येईल ते आई दोन मिनिटांमध्ये खाऊन टाकत होती.

एरव्ही आई थोडे खाणारी ते आयसीयूमध्ये चार दिवस काही पण दिले तरी खात होती. त्याच दरम्यान माझी मावशी व तिची सुनबाई आईला बघायला आली. आईचा त्रास पाहून त्या दोघीही रडायला लागल्या. मलाही राहावल नाही. मावशीच्या सुनेने मला वॉर्डच्या बाहेर घेऊन सांगितले की भाऊ रडू नका, काही तरी मार्ग निघेल. पण ते चार दिवस आई झोपत पण नव्हती. आईचा त्रास मला सहन होत नव्हता. त्या वेळेला मला वहिनीने समर्थाचा मंत्र जप करायला सांगितला. त्या वेळेपासून मी स्वामींचा मंत्र जप आईच्या कानामध्ये करून आई जवळ असताना करू लागलो. खरंच माझ्या अंगामध्ये आताही शहारे येत आहेत.

त्याच रात्री म्हणजे गुरुवारी सकाळी ४ वाजता माझा तीन नंबर भाऊ आईजवळ थांबला होता. रात्रभर जागे राहून त्याचा ही डोळा जागला तेव्हा अचानक स्वामींचा चमत्कार झाला आणि त्याला विचारू लागली मी इथे कशी काय आली. मला बांधून का ठेवले आहे. त्याला म्हणाली, अंकुशला बोलव. मला त्याने लगेच बोलावून घेतले. त्याच वेळेला डॉक्टर पण आले त्यांनी आईला विचारले की तुमचे नाव काय. आईने आपले नाव सीताबाई असे सांगितले. हा समोर उभा कोण, असे विचारले तर तिने सांगितले हा माझा मोठा मुलगा, ही माझी सून, ही मुलगी आम्हा सर्वाना तिने ओळखले तेव्हा माझा जीवात जीव आला. त्या वेळेला मी स्वामींचे आभार मानले. त्या वेळेला कळत नकळत शब्द निघाले ‘स्वामी तिन्हीं जगाचा आईविना भिकारी’ हे शब्द त्या दिवशी आठवले. त्या दिवसापासून मी स्वामींच्या विलेपार्ले येथील मठामध्ये वेळ काढून जाऊ लागलो. त्याच वर्षी अक्कलकोटला माझे मित्र जात होते. मला त्यांनी विचारलं की तू येणार का, मी कसलाही विचार न करता हो म्हणालो आणि स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन आलो.स्वामींची अशीच सेवा माझ्या हातून अखंड घडत राहू दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना! - अंकुश गुरव

अक्कलकोटमधील खास स्थळे

श्री स्वामी समर्थानी अक्कलकोटसारख्या आडवळणाच्या खेडेगावी, जेथे आठ आण्याची खडीसाखर मिळणे देखील कठीण होते अशा ठिकाणी येऊन वास्तव्य का केले असा विचार ब-याच भक्तांच्या मनात येतो. परंतु अक्कलकोट व त्याच्या आजूबाजूचा परिसर व तेथील परिस्थिती पाहिली असता या गोष्टीचा उलगडा होऊ शकतो. दक्षिणेस ३०-४० मैलावर गाणगापूर हे भीमा-अमरजा संगमावरील पुराण प्रसिद्ध तीर्थ असल्याचा उल्लेख स्वामींनीच अनेक वेळा कलेला आहे. दक्षिणेस ४०-५० मैलांवर गुलबर्गा हे मोठे शहर आहे. तेथे एक मुसलमान सुफी पंथाचे सुप्रसिद्ध व दक्षिणेतील प्रमुख आचार्य बंदे नवाज अली होऊन गेले. त्यानांच हिंदू केशव चैतन्य अर्थात बंदे नवाज अलींची समाधी म्हणून मानतात. यास ७०० वष्रे पूर्ण झाली आहेत. येथील दर्गाही ब-याच मैलावरून दिसतो. येथेच श्रीशरण बसवेश्वर नावाचे लिंगाईत पंथाचे साधू शेकडो वर्षापूर्वी होऊन गेले त्यांच्याही प्रेक्षणीय मठ येथे आहेत.

४० मैलावर ईशान्येस पंढरपूर येथे सुप्रसिद्ध असे पांडुरंगाचे देवालय फार पुरातन कालापासून आहे. श्रीनाथ शंकराचार्यानी या क्षेत्रास महायोगपीठ म्हटले आहे. पंढरपुराजवळ मंगळवेढेवृद्धा शेकडो वर्षापासून संताची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अक्कलकोटास येण्यापूर्वी श्री समर्थाचे या गावी १२ र्वष वास्तव्य होते.

उत्तरेस वाशी या गावी भक्त अंबरीश राजासाठी श्री भगवान विष्णूंनी चिरंतन वास्तव्य केले आहे. श्री भगवंत व श्री लक्ष्मी यांच्या उत्कृष्ट शालीग्राम शीलेच्या मूर्ती आहे. सांगोला तालुक्यात दरबाबाचा डोंगर असून त्यावर श्री शुक्राचार्याचे पवित्र स्थान आहे. त्याला शुक्राचार्याचा डोंगरही म्हणतात.
करमाळे तालुक्यातील कंदर गावी श्री कण्व ऋषींची समाधी आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावर मोहोळ या गावाजवळ उवळ येथे श्री नागनाथ सिद्धांचे मूळ स्थान आहे. भीमा नदीच्या काठी असलेल्या आश्रमात पांडव असल्याचाही उल्लेख आहे. उत्तरेस ४० मैलांवर तुळजाभवानीचे पुरातन स्थान आहे.

सोलापूरच्या सीमेवर बाळे या गावी खंडोबाचे पवित्र स्थान आहे. श्री माणिक प्रभू व उपासनी महाराज वगैरे दत्त सांप्रदायीचा खंडोबा देवताशी संबंध आहे. खुद्द सोलापुरात सिद्धेश्वर नावाचे साधू होऊन गेले. म्हणून या गावी श्री केशव मंदिर आहे. तेथे ध्रुवाने तपश्चर्या केली होती. तसेच अगस्ती  ऋषींनी श्रीची पूजा केल्याचा उल्लेख आहे. बऱ्हापूर गावी पीर अल्लाउद्दीनचा दर्गा आहे. हिंदू लोक मुसलमान दोघेही जण येथे पूजा-अर्चा करतात. जेऊर या गावी साक्षात काशी विश्वेश्वर प्रकट झाले होते. हे हेमाडपंथी देवालय बरेच जुने आहे. बोरी आणि हरणी नदीच्या संगमावर कुरनूर या गावी संगमेश्वराचे पुरातन देवालय आहे.

अक्कलकोट गावतच डबरे गल्ली म्हणून वस्ती आहे. तेथे श्री नागनाथ सिद्धांचा मठ आहे. अनेक सिद्ध पुरुष येथे होऊन गेले आहेत. याच गल्लीत हक्याच्या मारुती म्हणून रामदासपंथी जुना प्रसिद्ध मठ आहे. येथेच बाळप्पा महाराजांनी श्री समर्थाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या केली.

बाजार पेठेला लागूनच गल्लीत शिवयोग्यांच्या तपाने बारा ज्योर्तिलींगे प्रकट झाली आहेत. या स्थानाला मोगल बादशाहाकडून इनाम मिळालेले आहे. गावातील मार्केट रस्त्यावरच एकमुखी दत्ताचे स्थान आहे. ही मूर्ती मूळ पुरुषाला २०० वर्षापूर्वी श्रीकाशी क्षेत्रात प्राप्त झाली आहे. मूर्ती सुबक व आकर्षक आहे. दक्षिणेस गावच्या शिवेवर ख्वाजा दाऊद नरूद्दिन या दोन सुफी पंथाच्या अवलियांच्या कबरी व दर्गे आहेत. गावात श्री सिद्धिविनायकाचे पुरातन मंदिर आहे. अशा प्रकारचे देवालय क्वचितच पाहावयास मिळते. अक्कलकोटच्या दाही दिशांना व गावातही पवित्र देवतांचे, अवधुतांचे, योग्यांचे वास्तव्य आहे. याचकरिता हे पवित्र स्थान श्री स्वामी समर्थानी आपल्या अंतिम वास्तव्यकरिता पसंत केले होते.

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थाचे पाच मुख्य मठ आहेत. ही समर्थाची लीलाभूमी असल्याचे गावात ठिकठिकाणी श्री समर्थाचे अवतारकालीन झालेल्या पादुका आहेत. अर्थात ही समर्थाची उपपीठे आहेत. समाधी मठ पेठेतील स्वामी समर्थाचा समाधीमठ हा मठ श्री समर्थाच्या अवतार काली गेला. त्यावेळी येथे श्री. विंचुरकर हे संस्थानाचे व्यवस्थापक होते. त्यांना कुष्ठरोग होता. श्री समर्थाना याबद्दल विचारता समर्थानी श्री. विंचुरकरांना हातातील हि-याची अंगठी काढून फेकून दे म्हणून सांगितले. अंगठी फेकण्यापेक्षा त्यांनी समर्थापुढे ठेवली, ती चोळप्पाने उचलली व विकून आलेल्या रक्कमेत हा मठ श्री समर्थाच्या समाधी गुहेसहीत बांधला. या मठात गर्भगारात असलेल्या श्री गणपती, देवी, तिनमूर्ती आणि शिवलिंग या सर्वाची स्थापना फार मोठय़ा समारंभाने शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली होती. त्यावेळी समर्थ जिव्हाळय़ाने या सोहळय़ाला उपस्थित होते.

गोवंडीमध्ये संत तुकाराम महाराज बीज सांगता समारोह

$
0
0
IMG20160322_17171181

मुंबईत विविध देवदेवतांची अनेक मंदिरे आहेत. पण संपूर्ण मुंबईत गोवंडीमध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे एकमेव मंदिर आहे. या मंदिराची एक वेगळीच कथा आहे.

IMG20160322_17171181मुंबईत विविध देवदेवतांची अनेक मंदिरे आहेत. पण संपूर्ण मुंबईत गोवंडीमध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे एकमेव मंदिर आहे. या मंदिराची एक वेगळीच कथा आहे. मुंबईत तुकाराम बीज दिवशी गोवंडीमध्ये प्रतिदेहू अवतरल्याचा भास होतो. या मंदिराची स्थापना १९७२ मध्ये झाली; पण मंदिरांचा जीर्णोद्धार १९८६ मध्ये झाला. ह.भ.प. रघुनाथ महाराज केळकर यांना मामासाहेब दांडेकर यांनी स्वप्नात दृष्टांत दिला. १९७२ मध्ये केळकर गुरुजी गोदीमध्ये कार्यरत होते. त्यांनी श्रावणबागेत मामासाहेब दांडेकरांचे कीर्तन ऐकले.

यानंतर ज्या-ज्या ठिकाणी त्यांचे कीर्तन असायचे केळकर गुरुजी तिथे हजर असायचे. १९६८ला मामासाहेब दांडेकरांचे वैकुंठगमन झाले. एकेदिवशी शंकर मंदिरात केळकर गुरुजी ज्ञानेश्वरीचा पाठ करत असताना त्यांना मामासाहेबांनी आदेश केला. ‘अरे, घरात एकटय़ापुरतं कुठवर पारायण करशील, सप्ताहात पारायण कर.’ यानंतर १९७२ ला केळकर गुरुजींनी सप्ताहाची सुरुवात केली. अवघ्या १० रुपयांत पहिला सप्ताह पार पडला. पण आज मंदिराकडे १० लाखांपेक्षा जास्तीची शिल्लक आहे.

१९७२ पासून १९८०पर्यंत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा स्थापित करून सप्ताह व्हायचा. १९८६मध्ये मूर्ती आणि पादुकांची स्थापना करण्यात आली. दरवर्षी या सप्ताहाचा फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ होतो आणि फाल्गुन वद्य द्वितीया (बीज) दिवशी सांगता होते. मंडळांच्या पारदर्शक कारभारामुळे मंडळाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. या मंडळाचे वैशिष्टय़ म्हणजे या मंडळाची कोणतीही कार्यकारिणी नाही. येथे प्रत्येक जण कार्यकर्ता म्हणून काम करतो. मंडळाकडून व्यासपीठ चालक म्हणून कोणत्याही सुचवलेल्या नावाचा विचार केला जात नाही. सप्ताह १८ दिवस असतो. यात सकाळी काकडा, नंतर ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी भजन आणि रात्री कीर्तन असा दिनक्रम असतो. कीर्तनकेसरी नामदेव आप्पा शामगांवकर यांनी मंडळ स्थापनेपासून आजवर कीर्तनसेवा केली आहे. या मंडळाकडून दरवर्षी विविध कीर्तनकारांचे प्रबोधन मुंबईकरांना ऐकायला मिळते. समाजाला आवडणारा वक्ता आम्ही सादर करू शकतो हे आमचे भाग्यच आहे, असे मत सूर्यकांत वामन यांनी व्यक्त केले. महाराजांची सेवा आमच्या हातून घडते याचे समाधान वाटते, असे लक्ष्मण टोके म्हणाले.

या सप्ताहात कीर्तनसाथीसाठी मृदंगाचार्य सुधाकर महाराज शेळके यांच्या मुकुंदराज संस्थान आंबेजोगाई यांचे दरवर्षी सहकार्य लाभते. या सप्ताहात नवचैतन्याची ऊर्जा मिळते. मंडळ नि:स्वार्थी असल्याने सेवा करण्याचा आनंद मिळतो, असे मत गायक मनोज महाराज शिंदे आणि मृदंगमणी उत्तरेश्वर महाराज कोळेकर यांनी व्यक्त केले. या सप्ताहात तुकाराम कोळेकर, जोतीराम गडदे, श्रीहरी मुसळे या गायकांचाही सहभाग असतो. सप्ताहात ह.भ.प. दत्तात्रेय महाराज भोर (संगमनेर) यांचे वैकुंठगमनाचे कीर्तन होणार आहे.


संत तुकाराम महाराज अवतार आणि कार्य

$
0
0
GARUD AND TUKOBARAYA-1

२५ मार्चला तुकाराम बीज. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि महाराजांचे विविध युगात असलेले अवतार आणि कार्य व तुकाराम बीज दिवशी झालेले चौथे स्वर्गारोहण याविषयी थोडक्यात आढावा घेणारा लेख.

GARUD AND TUKOBARAYA-1जगद्गुरू संत तुकाराम महाराज आज जगाच्या कानाकोप-यात प्रत्येकाला माहीत असतील; परंतु महाराजांच्या विविध अवतारकार्यामुळेच ते तुकाराम झाले हे काहीच लोकांना माहीत असेल. तुकाराम कोणाचे अवतार, त्यांनी मनुष्यदेहाचे सार्थक कसे केले असे नानाविध प्रश्न आपल्या मनात असतीलच.

तुकारामांचे अवतार

पुराण कथेनुसार तुकाराम महाराजांचा पृथ्वीतलावरील अवतार म्हणजे सत्ययुगातील अंबऋषी. अंबऋषी या अवताराबद्दल सांगायचे म्हणाल तर अंबऋषीस्वरूप तुकोबाराय प्रथमत: दुर्वासऋषींचे शिष्य होते. गुरू-शिष्यांमध्ये थोडय़ा प्रमाणात कलह झाला. दोघांनीही शक्तिप्रदर्शन केले. दुर्वासऋषींनी अंबऋषींवर सुदर्शन चक्र सोडले. यातून पळ काढत अंबऋषी ब्रह्मलोकांत पोहोचले; पण सुदर्शन चक्राने त्यांचा पाठलाग सोडला नाही. शेवटी ते वैकुंठात गेले. भगवान विष्णूंची शरणागती पत्करली. त्यांनी अंबऋषींना दुर्वासांना शरण जा, असे सांगितले. यानंतर दुर्वासऋषींनी सुदर्शन चक्र रोखले, मात्र तुला प्रत्येक अवतारकार्यात गर्भवास सोसावा लागेल, असा शापही दिला.

। अंबऋषी कारणे गर्भवास सोसीसी।
महाराजांना गर्भवास सोसावा लागला या गर्भवासात महाराजांनी देवाकडे एक मागणी केली होती तो अभंग

तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हासी।

देवांने यावर प्रश्न विचारला की, महाराज सुख कशात आहे, याचे उत्तर देणारा हा अभंग

। सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती।
। रखुमाईच्या पती सोयरिया।
। गोड तुझे रूप गोड तुझे नाम।
। देई मज प्रेम सर्वकाळ।
। तुका म्हणे काही न मागो आणिक।
। तुझे पायी सुख सर्व आहे।

महाराजांचे चार युगांप्रमाणे अवतार, पहिल्या अवतारात म्हणजेच कृतयुगात तुकोबाराय प्रल्हादस्वरूप होते. या अवतारात त्यांचे आराध्य दैवत श्री भगवान विष्णू होते. दुस-या अवतारात त्रेतायुगात तुकोबाराय अंगदस्वरूप होते. तर तिस-या अवतारात द्वापारयुगात तुकाराम महाराज उद्धव स्वरूप होते. कलियुगात चौथ्या अवतारात ते नामदेवराव होते. तर पाचवा अवतार हा तुकाराम नावाने जगात प्रसिद्ध झाला आहे. याची साक्ष देणारा अभंग

। जे जे झाले अवतार। तुका त्यांचे बरोबर।
सत्ययुग : अंबऋषी, गुरू : दुर्वासऋषी आणि आराध्य : विष्णू
कृतयुग : प्रल्हाद, गुरू आणि आराध्य : भगवान विष्णू
त्रेतायुग : अंगद, गुरू आणि आराध्य : राम
द्वापारयुग : उद्धव, गुरू आणि आराध्य : भगवान कृष्ण
कलियुग : नामदेव, गुरू : येसोबा खेचर, आराध्य : भगवान परमात्मा पांडुरंग
कलियुग : तुकाराम, गुरू : बाबाजी चैतन्य आणि
आराध्य : भगवान परमात्मा पांडुरंग

इंद्रायणीच्या उदकातून महाराजांच्या वह्या तरल्या

इंद्रायणीच्या उदकात महाराजांचे अभंग तेरा दिवस तरले, यावर महाराजांनी देवाची केलेली स्तुती आणि क्षमायाचना. महाराजांवर आजवर भरपूर संकटं आली होती. महाराजांनी त्याला तोंडही दिले होते. मात्र, त्यांच्या कवित्वावर शंका घेत काही ब्राह्मणांनी त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले. यावेळी महाराजांनी पंढरीरायास साकडे घातले. तेरा दिवस अन्न-पाणी सोडले. महाराजांनी देवाला सांगितले, हे भगवान आता ही तुझी परीक्षा आहे, असा आशय सांगणारा अभंग.

। थोर अन्याय केला। तुझा अंत म्या पाहिला।
। जनाचिया बोला। साठी चित्त क्षोभिवले।
। भागविलासी केला सीण। अधम मी यातीहीन।
। झाकूनि लोचन। तेरा दिवस राहिलो।
। अवघे घालूनिया कोडे। तहानभुकेचे साकडे।
। योगक्षेम पुढे। करणे लागले।
। उदकी राखिले कागद। चुकविला जनवाद।
। तुका म्हणे ब्रीद। साच केले आपुले।

महाराज म्हणतात, भगवंता माझ्या वह्या तू इंद्रायणीतून काढून तुझे ब्रीद सत्य केलेस आणि लोकांना खोटे पाडलेस.
तुकाराम महाराजांचे उदकावर तरल्यानंतर रामेश्वर भट्ट यांनी याचे वर्णन केलेला अभंग..

। जळी दगडासहित वह्या। तारियल्या जैशा लाह्या।
। म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा। तुका विष्णू नाही दुजा।

 तुकाराम महाराजांवर सद्गुरुकृपा

तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी महाराजांना बीजमंत्र दिला. त्यांच्या कृपाशीर्वादाने महाराजांना ज्ञान प्राप्त झाले.
। माझिये मनीचा जाणोनिया भाव। तो करी उपाव गुरूरावो।
। आवडीचा मंत्र सांगितला सोपा। जेणे नोहे गुंफा कोठे काही।

महाराजांचा जिजाबाईस उपदेश

महाराजांची दुसरी पत्नी जिजाबाई ऊर्फ अवली. जिजाबाईची श्रद्धा लहानपणापासून भगवान कृष्णावर होती. भगवान पांडुरंगाबद्दल त्यांच्या मनात अतिशय ईर्षा होती. महाराजांना कवित्व सुचल्यानंतर महाराज पांडुरंगाचे गुण गाऊ लागले. वारीला जाऊ लागले आणि भजन-कीर्तनात रंगू लागले. महाराजांच्या या स्वभावाचा अवली एका अभंगात तिरस्कार करते..

। तुकोबाची कांता सांगे लोकापाशी।
। जातो पंढरीसी स्वामी माझा।
। फुटकाच वीणा त्याला दोन तारा।
। घाली येरझारा पंढरीसी।

महाराजांच्या पत्नी म्हणतात, अहो माझ्या दादल्याला त्या पंढरीच्या भुताचे वेड लागले आहे. आषाढी, कार्तिकी एकादशीला माझा पती संसार वा-यावर सोडून पंढरपुरी जातो. त्याचा वीणा तुटला आहे याचेही त्याला भान नाही. फक्त पंढरपुराला येरझारा तो घालत आहे.

। माझ्या चौघी बहिणी नांदती सुखात।
। ऐसी कैसी माझी कर्मरेषा।

जिजाई म्हणतात, माझ्या चौघी बहिणी अगदी सुखाने नांदत आहेत. पण माझ्याच पदरात तुकोबासारखा देववेडा दादला का दिला. माझी कर्मरेषाच वाईट आहे. आमच्या घरात खायला अन्न नाही, मुलं बाळं उपाशी आहेत; पण माझ्या नव-याला याचं काहीही नाही.

। माझे मायबापे बरे नाही केले।
। पदरी बांधिले भिका-याच्या।

जिजाई या चरणात त्यांच्या आई-वडिलांना बोल लावतात. त्या म्हणतात, माझ्या आई-वडिलांना माझ्यासोबत हे योग्य केले नाही. त्यांनी उगाचच मला तुकोबासारख्या भिका-याची पत्नी बनवलं आहे.

। तुका म्हणे कांते ऐसे ना बोलावे।
। शरणसी जावे विठ्ठलासी।

यावर महाराज म्हणतात, जिजाई असं वाईट बोलू नकोस. यापेक्षा तू भगवान विठ्ठलाला शरण जा.

तुकाराम महाराजांचे संसाराविषयी मत

तुकाराम महाराजांच्या लेखी संसार हा शून्यात जमा असला तरी महाराज उपदेश करताना सांगतात की, लोकहो प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रपंच नसला तर परमार्थ होत नाही आणि परमार्थ नसला तर प्रपंच नीट करता येत नाही, त्यामुळे महाराज एका ठिकाणी सांगतात,

। प्रपंच करोनी परमार्थ साधावा।
। वाचे आळवावा पांडुरंग।

महाराज म्हणतात, ज्या व्यक्तीच्या लेखी संसाराला नगण्य किंमत आहे आणि जो हरिभक्तीचा आसुसलेला आहे. त्याच्या संसारात कधीच व्यथा येणार नाहीत.

। संसाराच्या नावे घालुनिया शून्य। वाढता हा पुण्य धर्म।
। हरिभजनें हे धवळिले जग। चुकविला लाग कळिकाळाचा।
। तुका म्हणे सुख समाधि हरिकथा। नेणे भवव्यथा गाईल तो।

तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, संसार म्हणजे एक प्रकारचे व्यसनच आहे. व्यसनाधीन लोकांना हरिची व्याप्ती कळत नसते. जे संसार करत बसतात, हरिला भजत नाहीत त्याचे ब्रह्मांडात अखंड वास्तव्य राहात नाही. जे संसारात विलीन असतात त्यांना नाम कळतही नाही आणिपचतही नाही, असा आशय सांगणारा अभंग

। संसाराच्या अंगी अवघीच व्यसने। आम्ही या कीर्तने शुद्ध झालो।
। आता हे सोवळे झाले त्रिभुवन। विषम धोऊन सांडियेले।
। ब्रह्मपुरी वास करणे अखंड। न देखिजे तोंड विटाळाचे।
। तुका म्हणे आम्हा एकांताचा वास। ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा।

 तुकाराम महाराजांचा परिवार आणि शिष्यगण

तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव तुकाराम वोल्होबा आंबिले (मोरे). तुकोबा मूळचे देहू गावचे स्थायिक होते. कुटुंबात आई कणकाई, वडील वोल्होबा मोरे, थोरला भाऊ सावजी आणि धाकला भाऊ कान्होबा असा परिवार होता. महाराजांची पहिली पत्नी रखमाबाई आणि दुसरी जिजाबाई ऊर्फ अवली. महाराज आणि रखमाबाई यांचा पहिला पुत्र संतू. यानंतर अवली हिची मुले पहिली मुलगी गंगा, दुसरा व तिसरा मुलगा भोळ्या आणि विठू,चौथी मुलगी भागीरथी.

महाराजांचे आराध्य दैवत विठोबा. महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य. महाराजांचे शिष्य नाहुजी आणि बहेनाबाई शिऊरकर. स्वर्गारोहणानंतरचे महाराजांचे शिष्य निळोबाराय व कान्होबाराय. तुकाराम महाराज हे नामदेवांचे अवतारकार्य पूर्ण करण्यास आले होते याची साक्ष देणारा अभंग

। प्रमाणाची संख्या
सांगे शत कोटी।
। उरले ते शेवटी लावी तुका।

याबरोबरच महाराज कणकाईच्या पोटीच का जन्माला आले याची ग्वाही देणारा अभंग

। अभंग राहिले चार कोटी।
। म्हणून तुका कणकाईच्या पोटी।

 महाराजांचे स्वर्गारोहण

काही कथांमध्ये महाराजांचे चार वेळा स्वर्गारोहण झाल्याचे सांगितले जाते. याप्रमाणे महाराजांचे प्रथम स्वर्गारोहण झाल्यावर ते संताजी जगदाळे या वारक-यास टाळ दिंडी देण्यासाठी पुन्हा भूतलावर आले होते. यानंतर दुस-या स्वर्गारोहणात बारा अभंग लिहण्यासाठी पुन्हा भूतलावर आले. तिसरे स्वर्गारोहण झाले तेव्हा शिष्य निळोबाराय आणि कान्होबाराय यांना उपदेश करण्यासाठी पुन्हा देहूत अवतरले. कान्होबारायांनी देवाबरोबर भांडण करत असताना महाराजांना परत आणा नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही अशा शब्दात धमकीच दिली होती.

। धिंद धिंद तुझ्या करीन चिंधडय़ा।
। दे माझ्या भावा आणोनिया।

यानंतर महाराजांचे चौथ्यांदा प्रयाण झाले. चौथ्या प्रयाणानंतर ते भागीरथीसाठी पुन्हा देहूगावी आले होते. महाराजांचे चौथे स्वर्गारोहण हे शेवटचे स्वर्गारोहण होते. चौथ्या प्रयाणाच्या वेळी महाराज लोकांना सांगत जात होते. बाबांनो मी चाललोय, कृपा असू द्या तुमची. माझी विनंती सगळ्या लोकांना सांगा.. शेवटच्या कीर्तनाला म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीयेला महाराजांचे स्वर्गारोहण झाले. दुपारी १२ वाजता महाराज वैकुंठाला गेले. ही वार्ता भागीरथीला कळाली यानंतर तिने तुकाराम नामाचा जप केला म्हणून महाराज चौथ्यांदा पृथ्वीवर आले होते.

। आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी।
सकळां सांगावी विनंती माझी।

महाराज वारक-यांना संबोधतात की, आता तुम्ही पंढरीरायाला बोलवा

। तुम्ही सनकादिक संत। म्हणविता कृपावंत।
। एवढा करा उपकार। सांगा देवा नमस्कार।
। भाकावी करूणा। विनवा पंढरीचा राणा।

महाराजांच्या नावाने यमाचाही थरकाप उडतो. त्यामुळे आजच्या दिवशी त्याचा गजर केला पाहिजे.

। तुकाराम तुकाराम । नाम घेता कापे यम।

तुकाराम. तुकाराम.. बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम..

 महाराजांना वैराग्यप्राप्ती कशी झाली..?

तुकाराम महाराजांना साधुसंतानी विचारले, महाराज तुम्हाला वैराग्यप्राप्ती कशी झाली. यावर महाराज म्हणतात, अहो मला वैराग्यप्राप्ती झाली नाही, माझ्या विठूरायाने ती घडवून आणली. काय माझे होते जे मी गमावले, ज्यामुळे मला वैराग्य प्राप्त होईल. दुष्काळात माझी एक पत्नी अन्न अन्न करून मेली. होते नव्हते ते द्रव्य गेले, मग माझ्याकडे देवभक्तीशिवाय पर्यायच राहिला नाही. देवाला ही दुष्काळात नैवेद्य मिळत नव्हता म्हणून वाटलं भक्ती करावी. आरंभी एकादशीला कीर्तन करत होतो. पण अभ्यासात चित्त नव्हते. मी संसाराधीन होतो. संतांची पदं पाठ करून मी कीर्तन करायचो. मग सद्गुरूंनी कृपा केली. त्यांच्या वचनाने मला वैराग्य प्राप्त झाले, अशी ग्वाही महाराज एका अभंगात देतात.

। दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान। स्त्री एकी अन्न अन्न करता मेली।
। देवाचे देऊळ होते जे भंगले। चित्तासी ते आले करावेसे।
। आरंभी कीर्तन करी एकादशी। नव्हते अभ्यासी चित्त आधी।
। काही पाठ केली संतांची उत्तरे। विश्वास आदर करोनिया।
। मानियेला स्वप्नी गुरूचा उपदेश। धरिला विश्वास दृढ मनी।

महाराज म्हणतात, या संसारात मी खूप त्रासलो होतो. धनामागे पळण्याची आस मेली होती; त्यामुळे मी धन याचकांना दिले. प्रिय व्यक्तींचा सहवास सोडला आणि मी करंटा झालो. लोकांपासून दूर राहण्यासाठी मी रानावनांत एकांत शोधला.

तुकाराम महाराजांना काव्य स्फुरण

तुकाराम महाराज मुळात विठ्ठल भक्त असल्यामुळे त्यांना अभंगाचा सहवास लहानपणीच मिळाला होता. वारक-यांच्या मुखातून उच्चारलेल्या अभंगाचा महाराज विचार करायचे. अभंगात काय वज्र्य करायचे आहे आणि कसे संसार सागरातून तरून जायचे आहे याचा विचार ते करायचे. दरम्यान त्यांनी एकांत स्वीकारला. एकांतात स्वत:चा शोध लागल्यानंतर भगवान परमात्मा पांडुरंग आणि संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांनी तुकारामांना स्वप्नात दृष्टांत दिला. समाजाला दिशा देण्याचे काम तुझ्या लेखणीतून होणार आहे, असे श्री विठ्ठल आणि नामदेवांनी सांगितले. त्याची साक्ष देणारा हा अभंग.

। नामदेवे केले स्वप्नामाजी जागे।
सवे पांडुरंगे येऊनियां।
। सांगितले काम करावे कवित्व।
वाउगें निमित्य बोलो नको।
। माप टाकी सळे धरिली विठ्ठले। थापटोनी केले सावधान।

पतिव्रता महान शक्ती

$
0
0
woman

श्री गुरुलीलांमृत ग्रथांच्या दुस-या अध्यायात पतिव्रता अनुसया मातेच्या तपसाधनेची कथा आलेली आहे. दत्त प्रभूंच्या जन्माची सुरसकथा आलेली आहे.

womanश्री गुरुलीलांमृत ग्रथांच्या दुस-या अध्यायात पतिव्रता अनुसया मातेच्या तपसाधनेची कथा आलेली आहे. दत्त प्रभूंच्या जन्माची सुरसकथा आलेली आहे. पतिव्रता या शब्दाची खरी व्याख्या तेथे दिलेली आहे. पतिव्रता कशी ओळखावी? याबाबत शास्त्रात सहा लक्षणे सांगितलेली आहेत. पतिव्रता ही महान शक्ती आहे.

कोणत्याही कार्यात मंत्र्यांप्रमाणे सूत्रे हाती घेऊन कार्य पाडणारी, पतिसेवेत नम्रपणे दासीसारखी राहणारी, जेवणाच्या वेळी आईची भूमिका करणारी. लहान मुलांना जशी आईने प्रेमाने जेवू घालते तशी वागणारी, धर्मामध्ये अनुकूल असणारी, शयनांत रंभेप्रमाणे राहणारी आणि नवऱ्यांचे अपराध माता पृथ्वीप्रमाणे सहन करणारीच पतिव्रता असू शकते. अशी सहा लक्षणे सांगितलेली आहेत. पुराणात पाच पतिव्रतांची वाखाणणी होते.

अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा,
मंदोदरी तथा।
पंचकन्या स्मरण नित्यं
महापातक नाश्यानम्।।

महर्षी गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, पांडव पत्नी द्रौपदी, रामचंद्र प्रभूंची भार्या माता सीता, सेनापती वालीची पत्नी तारा, लंकाधीपती रावणाची पत्नी मंदोदरी, या पांच पतीव्रता कन्यांची नावे घेतल्यास आपली सगळी पापे नष्ट होतात, असा उल्लेख आलेला आहे. या पांचही कन्यांचा रामप्रभू आणि कृष्णभगवान यांच्या सान्निध्याचा उल्लेख असल्याने साक्षात देवच त्यांच्या स्वरूपातून प्रकटले होते. हे झाले पुराणकथेतील. सध्या चालू असलेल्या कलियुगात धर्मनाश कसा होईल? याविषयी श्रीमत भागवतात वर्णन आलेले आहे.

त्याप्रमाणे सध्याची परिस्थिती आहे की नाही आपणच पडताळून पाहा. कलियुगामध्ये कलीच्या प्रभावाने कुलवंत स्त्रिया परचक्र परधर्मीयांचे अनुकरण करतील. केस कापतील, सौभाग्याचे अलंकार त्यागतील, सदाचार संपन्न स्त्रिया भर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी नाचतील. स्त्रिया खरस्वातंत्र्यासाठी संघर्ष करतील. पुरुष स्वधर्म विसरून, आळशी बनून विषयभोगात दंग होतील. परधर्माचे अनुकरण करण्यात स्वत:ला धन्य मानतील. देव आणि धर्म याविषयी अनास्था पसरविरण्याचे काम करतील. चोरी, लबाडी, भ्रष्ट आचार, खोटेपणा वाढीस लागून लोप होईल. उभ्याने अन्न भक्षण करतील.

आपण वस्तुस्थिती पाहू. सध्या अपुरे कपडे किंवा देहप्रदर्शनाची फॅशन चालू आहे. जागोजागी ब्यूटिपार्लर उघडलेले आहेत. कुंकू, गंध लावणे, बांगडय़ा घालणे, जोडवी, मंगळसूत्र, कर्णफुले धारण न करण्याकडेच अधिक कल आहे. लग्नकार्यात अपुऱ्या कपडय़ांत किंवा भडक कपडय़ांत रस्त्यावर पुरुषांपेक्षा स्त्रियाच नर्तन करताना दिसतात. त्यावर बघ्यांची आणि फोटो काढणाऱ्यांची गर्दी जास्त होते. बिभत्स नृत्य बराचवेळ मुद्दाम चालू ठेवले जाते. स्त्री ही कुळाची लक्ष्मी समजली जाते.

त्यामुळे पूर्वी लक्ष्मी येण्याच्या वेळी घरातील सगळय़ा स्त्रिया तिन्हीसांजेच्या आत घरात असायच्या. आज दुर्दैवाने नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा शाळा, कॉलेज, शिक्षणाच्या किंवा अन्य कारणाने स्त्री बाहेरच असते. हे झाले स्त्रियांच्या बाबतीत. पुरुषांचेही तसेच आहे. कष्ट, सचोटी, एकाग्रता, अहोरात्र धडपड, प्रामाणिकपणा हे गुण मागे पडत चालले असल्याने विनासायास, वाममार्गाने अकाली पैसा हातात पडत असल्यामुळे पुरुष व्यसन करू लागला. पुरुष धर्माचा विसर पडू लागल्याने भोगवादाकडे तो जास्त झुकू लागला आहे.

अनितीने वागण्यातच प्रतिष्ठा पावू लागला आहे. या मार्गाचा अवलंब करणे हे आता प्रतिष्ठेचे लक्षण झाले. आपल्या धर्मसंस्कृतीने कुंकूमतिलक धारण करण्यासाठी पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांनाही सांगितले आहे. विना कुंकवाच्या स्त्रीला वैधव्य प्राप्त झालेले आहे, असे समजतात. आता तर सर्रास स्त्रिया कुंकू, गंध, टिकली यापैकी काहीही न लावणे पसंद करू लागल्या आहेत. ही परकीय संस्कृती आहे.

हा बिंदू शरीराचे नियंत्रण करीत असतो. तो बिंदू सतत झाकलेला असला तर माणसाचे रागीटपण, चंचलता, बुद्धिमत्ता वाढते. त्यामुळे गंध लावताना बोटाने त्यावर सतत दाब दिला जातो. इतरवेळी गंधामुळे चेहऱ्यावरील प्रसन्नताही वाढते. सात्त्विक भाव स्पष्ट दिसतात. अस्थिरता कमी होऊन मन:शांती लाभते.

हे सगळं कशासाठी तर श्री गुरुलीलामृत गं्रथाच्या दुस-या अध्यायात पूर्णपणे पतिव्रता तेजाचे वर्णन आल्यामुळे आजच्या काळात त्याचा काय उपयोग? हे समजण्यासाठी आपण वस्तुस्थिती जाणून घेत आहोत. कारण भारतीय संस्कृतीने घराचे घरपण या संज्ञेत स्त्री-पुरुष हे मांगल्याचे प्रतीक मानलेले आहे. त्यांना लक्ष्मी नारायणाची उपमा दिली आहे. इतकं हे पवित्र नातं आहे.

श्री स्वामी समर्थ उपदेश

$
0
0
swami samarth

एक पंजाबी गृहस्थ श्री स्वामी समर्थाकडे येऊन म्हणाले, ‘आप बहुत चमत्कार करते हो, यह सुनकर मै आया हूं!’ त्यावर श्री स्वामी उत्तरले, ‘चमत्कार गारूडी के खेल मे नहीं देखें?’ चमत्कार हा श्री स्वामींच्या लीलांचा एक भाग होता. 

swami samarthएक पंजाबी गृहस्थ श्री स्वामी समर्थाकडे येऊन म्हणाले, ‘आप बहुत चमत्कार करते हो, यह सुनकर मै आया हूं!’ त्यावर श्री स्वामी उत्तरले, ‘चमत्कार गारूडी के खेल मे नहीं देखें?’ चमत्कार हा श्री स्वामींच्या लीलांचा एक भाग होता. त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या. परंतु केवळ चमत्कारांच्या वर्णनाने एक भाग होता. त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या. परंतु केवळ चमत्कारांच्या वर्णनाने श्री स्वामी समर्थाच्या जीवनचरित्रास न्याय मिळू शकत नाही. चमत्कार सांगू नयेत असे नाही, मुळात चमत्कार नसतात.

कार्यकारण भावावाचून या निसर्गात कोणतीच गोष्ट घडत नाहीत. जेव्हा एखाद्या गोष्टीमागचा कार्यकारण भाव आपल्याला माहीत नसतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याला चमत्कार वाटते. श्री स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष होते. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. पण तो केवळ त्यांच्या साधनेचा एक पैलू होतो, हे वाचकांनी, अभ्यासकांनी व भक्तांनी लक्षात ठेवले पाहिजे. खरे पाहता श्री स्वामींच्या जीवनामध्ये जे जे चमत्कार घडले, त्यावरून त्यांचे मूल्यमापन करू नये.

श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते. कोणीही कोणत्याही धर्मपंथांच्या मार्गाने गेलात तरीही, समाजापुढे एक ‘आदर्श’ राहिला पाहिजे. ‘सर्व देव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति।’ याचा दाखला श्री स्वामी देत असत. मी कोठून आलो हे सांगताना एकाप्रसंगी ‘माझी जात चांभार, बाप महार आणि महारीण’ असे समर्थानी सांगितल.े जातीभेदांच्या संकुचित कल्पनांना तडा देण्यासाठी त्यांनी भक्तांना दिलेली ही शिकवण होय.

भोंदू लबाड माणसे ही समाजाला लागलेली कीड असून तिचा बंदोबस्त वेळीच करावयास हवा, असं स्वामींचे मत होतं. समाजातील निष्क्रियतेवर ते नेहमीच आघात करीत. ‘आळशी माणसाचे तोंडही पाहू नये’असे स्वामी नेहमी म्हणत. ‘बैलासारखे कष्ट करा’ असा त्यांचा सततचा आग्रह होता. स्वामींचा कर्मवादावर भर होता. कोणी मनात विवंचना करीत बसल्यास, ‘काय रे, तुजजवळ बैल नाहीत काय?’ असा प्रश्न महाराज करीत. ‘मेहनत करून खावे. शेत करून खावे.’ असे ते सांगत. हा कर्मयोग श्री स्वामींनी सातत्याने सांगितला.

संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा. त्यांना शरण जा. गर्वाचा त्याग करा. भजन, पूजन व नामस्मरण करा. जे मिळेल त्यातच तृप्तता माना. सर्वाच्या ठायी आत्मा आहे. परमात्मा आहे. तेव्हा कोणत्याही प्राणीमात्राला काया-वाचा-मने पीडा देऊ नका. असा स्वामींचा आग्रह असे. आपल्या आयुष्यातील सर्व बऱ्या-वाईट घटना ह्या श्री स्वामींच्याच इच्छेने होतात, असे स्वामींचे भक्त मानतात. त्यामुळे या घटनांच्या फलस्वरूप जे काही भोगावे लागते, त्या सुख-दु:खापासून ते अलिप्त असतात. आपल्या रसाळ वाणीने श्री स्वामी जेव्हा उपदेश करीत तेव्हा ते सांगत की, माझे भक्त मला सर्वस्व अर्पण करून केवळ माझ्याच ठायी मन एकाग्र करून, काया-वाचा-मने माझी उपासना करतात. हे भक्त संसारापासून मुक्त असतात. मातेला तिचे लेकरू जसे प्रिय असते, तसेच मला ते प्रिय असतात.

स्वामींचा भक्त हा कोणाचाही द्वेष न करणारा असतो. सुख-दु:ख एकसारखे मानणारा, क्षमाशील, जगमित्र, तसेच दयाशील असतो. श्री स्वामींकडून काहीही मिळावे असा त्यांचा उद्देश कधीच नसतो. जे प्रेम श्रीस्वामी भक्तांला देऊ इच्छितात ते त्यांनी प्राप्त केलेले आहे. सद्गुरूंकडून काही मिळाले नाही तरीदेखील, ‘देवाचे देणे’ असा भाव या भक्तांच्या ठिकाणी सतत वास करतो. असा हा निरलस भक्तिभाव श्री स्वामींना भुरळ घालतो व ते मोठय़ा ममतेने आपल्या भक्तांना सांगतात, ‘व्यसनाधीनता समाजाला रसातळात नेते. सत्य, धर्म, व न्यायाचा मार्ग प्रत्येकाने नेहमी अनुसराला पाहिजे.’ परोपकार करण्यासाठी धर्मशाळा बांधा, विहिरी, देवळे, तलाव बांधा असे श्री स्वामी समर्थ सांगत.

त्या काळातील लोक अंध:श्रद्धेच्या फार आहारी जात. या पार्श्वभूमीवर श्री समर्थाचे विचार फारच प्रगत होते. सद्गुरू ज्याच्या पाठीशी असतो व जो भक्त सदगुरूंची आज्ञा शिरसावंज्ञ मानून जीवन जगतो त्याला काहीही कमी पडत नाही. अशा सच्च्या भक्ताच्या जगण्याचे सारे स्वरूपच पालटून जाते. म्हणतात ना, सत्याची कास धरणाऱ्याचा, सत्याच्या आधारे निर्णय घेणाऱ्याच्या पाठीशी नेहमीच देव असतो. सद्गुरूंचे स्मरण करून चांगल्या कामाची सुरुवात करावी. सद्गुरूंवर विश्वास ठेवला की यश निश्चितच येते. समर्थाच्या सेवकाला यश हे येणारच. पण त्याने हात जोडून स्वस्थ न बसता आपले सामर्थ्य पणास लावले पाहिजे. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताचे सामर्थ्य कमी पडू देत नाहीत.

मनाची शक्ती ही फार मोठी शक्ती आहे. मनाचे मांगल्य, पावित्र्य कायम ठेवण्यासाठी समर्थानी नामस्मरणाचा आग्रह धरला. नामस्मरणाच्या उपासनेद्वारे अनेक जणांना त्यांनी भक्तिमार्गाला लावले. स्वामी समर्थानी जीवनासंबंधी जो वास्तव दृष्टिकोन आपणांस दिला, त्याचे चिंतन करावे. त्यांच्या जीवनात सर्वत्र अलिप्तता दिसते. याबरोबरच करुणा, संयम, दाक्षिण्य, ऋजुभाव, नि:स्पृहपणा, सत्याची आवड, इ. अनंत सद्गुण जरी आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने उतरला, तर आपले जीवन खरोखरी धन्य होईल.

 श्री स्वामी समर्थाचा उपदेश

»  सर्व धर्माचे सार हेच की, परोपकारार्थ
अनिवार्य श्रम करावेत.

»  प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये.

»  विनाकारण दुस-यास पीडा देऊ नये.

»  मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा
मानू नये.

»  पक्षापक्ष भेद टाकून सत्य, न्याय, धर्म या
मार्गाने असावे.

»  परमेश्वर भजनी रत असावे.

»  कोणतेही र्दुव्‍यसन नसावे.

»  योग्यायोग्य विचार असावा.

»  अतिथी, अभ्यागतांस अन्न-पाणी द्यावे.

»  न्यायाने, कष्टाने मिळविलेल्या पैशाने स्वहीत करावे, तसेच दुस-याचे हीत देखील करावे.

»  परोपकारार्थ पाणपोई, विहीर, तलाव बांधावेत.

»  प्रवाशांस उपयोगी पडतील अशा धर्मशाळा बांधाव्यात.

»  दया-क्षमा-शांतीयुक्त चित्त असावे.

»  ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे.

»  आपले भोग हे चुकत नाहीत. ते भोगावेच लागतात. त्यातून दु:ख विशाद वाटय़ाला येतो. म्हणून नेमून

दिलेले तुमचे काम करताना, ते हसत हसत करा.

श्री स्वामी समर्थ अष्टोत्तरशत नामावली

१. ॐ दिगंबराय नम:।

२. ॐ वैराग्यांबराय नम:।

३. ॐ ज्ञानांबराय नम:।

४. ॐ स्वानंदांबराय नम:।

५. ॐ अतिदिव्यतेजांबराय नम:।

६. ॐ काव्यशक्तिप्रदायिने नम:

७. ॐ अमृतमंत्रदायिने नम:।

८. ॐ दिव्यज्ञानदत्ताय नम:।

९. ॐ दिव्यचक्षुदायिने नम:।

१०. ॐ चित्ताकर्षणाय नम:।

११. ॐ चित्तप्रशांताय नम:।

१२. ॐ दिव्यानुसंधानप्रदायिने नम:।

१३. ॐ सद्गुणविवर्धनाय नम:।

१४. ॐ अष्टसिद्धिदायकाय नम:।

१५. ॐ भक्तिवैराग्यदत्ताय नम:।

१६. ॐ भुक्ती-मुक्ती-शक्ती प्रदायिने नम:।

१७. ॐ आत्मविज्ञानप्रेरकाय नम:।

१८. ॐ अमृतानंददत्ताय नम:

१९. ॐ गर्वदहनाय नम:।

२०. ॐ षड्रिपुहरिताय नम:।

२१. ॐ भक्तसंरक्षकाय नम:।

२२. ॐ अनंतकोटीब्रह्मांडप्रमुखाय नम:।

२३. ॐ चैतन्यतेजसे नम:।

२४. ॐ श्रीसमर्थपतये नम:।

२५. ॐ अजानुबाहवे नम:।

२६. ॐ आदगुरवनम:।

२७. ॐ श्रीपादश्रीवल्लभाय नम:।

२८. ॐ नृसिंहभानुसरस्वत्यै नम:।

२९. ॐ अवधृतदत्तात्रेयाय नम:

३०. ॐ चंचलेश्वराय नम:।

३१. ॐ कुरवपुरवासिने नम:।

३२. ॐ गंधर्वपुरवासिने नम:।

३३. ॐ गिरनारवासिने नम:।

३४. ॐ श्री शैल्यनिवासिने नम:।

३५. ॐ ओंकारवासिने नम:।

३६. ॐ आत्मसूर्याय नम:।

३७. ॐ प्रखरदेज:प्रवर्तिने नम:।

३८. ॐ अमोघतेजानंदाय नम:।

३९. ॐ देदीप्यतेजोधराय नम:।

४०. ॐ परमसिद्धयोगेश्वराय नम:।

४१. ॐ कृष्णानंद-अतिप्रियाय नम:।

४२. ॐ योगिराजराजेश्वराय नम:।

४३. ॐ अकारणकारुण्यमूर्तये नम:।

४४. ॐ चिरंजीवचैतन्याय नम:।

४५. ॐ स्वानंकंदस्वामीने नम:।

४६. ॐ स्मतृगामिने नम:।

४७. ॐ नित्यचिदानंदाय नम:।

४८. ॐ भक्तचिंतामणीश्वराय नम:।

४९. ॐ अचिंत्यनिरंजनाय नम:।

५०. ॐ दयानिधये नम:।

५१. ॐ भक्तहृदयनरेशाय नम:।

५२. ॐ शरणागतकवचाय नम:।

५३. ॐ वेदत्स्फूर्तिदायिने नम:।

५४. ॐ महामंत्रराजाय नम:।

५५. ॐ अनाहतनादप्रदानाय नम:।

५६. ॐ सुकोमलपादांबुजाय नम:।

५७. ॐ चित्-शक्त्यात्मने नम:।

५८. ॐ अतिस्थिराय नम:।

५९. ॐ माध्यन्हभिक्षाप्रियाय नम:

६०. ॐ प्रेमभिक्षांकिताय नम:।

६१. ॐ योगक्षेमवाहिने नम:।

६२. ॐ भक्तकल्पवृक्षाय नम:।

६३. ॐ अनंतशक्तिसूत्रधाराय नम:।

६४. ॐ परब्रह्माय नम:।

६५. ॐ अतितृप्तपरमतृप्ताय नम:।

६६. ॐ स्वावलंबनसूत्रदात्रे नम:।

६७. ॐ बाल्यभावप्रियाय नम:।

६८. ॐ भक्तिनिधानाय नम:।

६९. ॐ असमर्थसामर्थ्यदायिने नम:।

७०. ॐ योगसिद्धिदायकाय नम:।

७१. ॐ औदुंबरप्रियाय नम:।

७२. ॐ वज्रसुकोमलतनुधारकाय नम:।

७३. ॐ त्रिमूर्तीध्वजधारकाय नम:।

७४. ॐ चिदाकाशव्याप्ताय नम:।

७५. ॐ केशचंदनकस्तुरीसुगंधप्रियाय नम:।

७६. ॐ साधकसंजीवनै नम:।

७७. ॐ कुंडलिनीस्फूर्तिदात्रे नम:।

७८. ॐ अलक्ष्यरक्षकाय नम:।

७९. ॐ आनंदवर्धनाय नम:।

८०. ॐ सुखनिधानाय नम:।

८१. ॐ उपमातीते नम:।

८२. ॐ भक्तिसंगीतप्रियाय नम:।

८३. ॐ अकारणसिद्धिकृपाकारकाय नम:।

८४. ॐ भवभयभंजनाय नम:।

८५. ॐ स्मितहास्यानंदाय नम:

८६. ॐ संकल्पसिद्धाय नम:।

८७. ॐ संकल्पसिद्धिदात्रे नम:

८८. ॐ सर्वबंधमोक्षदायकाय नम:।

८९. ॐ ज्ञानातीतज्ञानभास्कराय नम:।

९०. ॐ श्रीकीर्तिनाममंत्राभ्याम् नम:।

९१. ॐ अभयवरदायिने नम:।

९२. ॐ गुरुलीलामृतधाराय नम:।

९३. ॐ गुरुलीलामृतधारकाय नम:।

९४. ॐ वज्रसुकोमलहृदयधारिणे नम:।

९५. ॐ सविकल्पातीतनिर्विकल्पसहजसमाधिभ्यांम् नम:।

९६. ॐ निर्विकल्पातीतसहजसमाधिभ्यांम् नम:।

९७. ॐ त्रिकालातीतत्रिकालज्ञानिने नम:।

९८. ॐ भावातीतभावसमाधिभ्याम् नम:।

९९. ॐ ब्रह्मातीत-अणुरेणुव्यापकाय नम:।

१००. ॐ त्रिगुणातीतसगुणसाकारसुलक्षणाय नम:।

१०१. ॐ बंधनातीतभक्तिकिरणबंधाय नम:।

१०२. ॐ देहातीतसदेहदर्शनदायकाय नम:।

१०३. ॐ चिंतानातीतप्रेमचिंतनप्रकर्षणाय नम:।

१०४. ॐ मौनातीत-उन्मनीभावप्रियाय नम:।

१०५. ॐ बुद्ध्यातीतसद्बुद्धीप्रेरकाय नम:।

१०६. ॐ मत्प्रिय-पितामहसद्गुरूभ्याम् नम:।

१०७. ॐ पवित्रमतात्यासाहेबचरणारविंदाभ्याम् नम:।

१०८. ॐ अक्कलकोटस्वामी समर्थाय नम:।।

।। रुद्राक्षाची उत्पत्ती।।

$
0
0
rudraksha

भगवान शिवांच्या तपस्येमुळे त्यांच्या अश्रूतून जे वृक्ष तयार झाले, त्यांना पुढे ‘रुद्राक्ष’ हे नाव प्राप्त झाले. रुद्र + अक्ष = रुद्राक्ष म्हणजे ‘शिवाचा नेत्र’ असा त्याचा अर्थ होतो.

rudrakshaभगवान शिवांच्या तपस्येमुळे त्यांच्या अश्रूतून जे वृक्ष तयार झाले, त्यांना पुढे ‘रुद्राक्ष’ हे नाव प्राप्त झाले. रुद्र + अक्ष = रुद्राक्ष म्हणजे ‘शिवाचा नेत्र’ असा त्याचा अर्थ होतो. या तृतीय नेत्राला जगताच्या आध्यात्मिक तेजोबलाचे प्रतीक मानतात.

जाबालोपनिषदानुसार उत्पत्तीबाबत: त्रिपुरासुराला ठार मारण्यासाठी कालाग्नी रुद्राने प्रथम ध्यानार्थ डोळे मिटून घेतले, तेव्हा त्यातून जे अश्रुबिंदू जमिनीवर पडले, त्याचे रुद्राक्षमणी बनले.

या फळावर ५ किंवा ५ पेक्षा कमी व जास्त मुखे क्वचितच आढळतात. त्यातील गुणधर्म भिन्न असल्यामुळे ते मौल्यवान ठरतात. ‘रुद्राक्ष’ या नावाने एक दुसरी जात ही (टय़ुबरक्युलेट्स) म्हणून ओळखली जाते. त्याचाही उपयोग काही जण माळा बनवण्यासाठी करतात.

रुद्राक्षाच्या वृक्षाला साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर या दरम्यान थंडीच्या दिवसात मोहर येतो. त्यानंतर मे ते जूनच्या दरम्यान पिकलेली फळे तयार होतात. जेव्हा ही फळे सुकतात तेव्हा ती स्वत: तुटून पडतात किंवा काढावी लागतात.

फळावर एक प्रकारचे सालीचे आवरण असते व आतमध्ये रुद्राक्ष असतो. तो साफ करून त्याची चमकदार माळ बनवतात. मात्र फळाच्या आतील गर सुलभपणे काढण्यासाठी ते फळ २७ दिवसांपर्यंत गाईच्या शेणात ठेवावे लागते. फळावर साधारणपणे १ ते २१ पर्यंतच्या रेषा आढळतात यास अध्यात्मिक भाषेत ‘मुख’ असे म्हणतात.

या प्रजातीचे वृक्ष भारतातील कोकण, अंदमान-निकोबार बेटे, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक इ. ठिकाणी आढळतात. तर काही प्रजातीचे वृक्ष ब्रह्मदेश, थायलंड, जावा, मलेशिया, सिलोन, नेपाळ, इंडोनेशिया, पॅसिफिक बेटे, अयोध्या, मथुरा, काशी व सह्याद्री पर्वतावर आढळतात.

rudharaवनस्पती शास्त्राच्या दृष्टीने वर्णन

‘रुद्राक्षाच्या (Elaeocarpaceae) एलिओकार्पेसी’ या वृक्षजातीच्या कुळामध्ये ‘(Elaeocarpus) एलिओकार्पस’ या वृक्षजातीमध्ये समावेश होतो. याच्या अनेक प्रजातीमध्ये बरेचसे साम्य आढळते. मात्र एलिओकार्पस जातीतील ‘(Elaeocarpus Gaintrus) एलिओकार्पस गॅनिट्रस’ या प्रजातीचा वृक्ष म्हणजे ‘रुद्राक्षाचे झाड’ होय.

रुद्राक्षाला तेलगू, कन्नड व तामीळ भाषेत ‘रुद्राज कोटी’ असे म्हणतात. मराठी भाषेत याला ‘रुद्राक्ष’ म्हणतात, हिंदी भाषेमध्ये रुद्राक्ष आणि रुद्राकी, बंगाली भाषेत रुद्राख्या, आसामी भाषेत ‘लुद्रोक’ व ‘उद्रोक’ असे म्हणतात. याचे लॅटिन नाव ‘Elaeocarpus Gaintrus Roxb’ असे आहे. इंग्रजी भाषेत व ‘Utrasaum Bead Tree’ असे म्हणतात. संस्कृत भाषेत पर्यायी नावे रुद्राक्ष, शिवाक्ष, शर्वाक्ष, भूतनाशन, पावन, निलकंठाक्ष, हराक्ष, शिवप्रिय अशी आहेत.

वनस्पती परिचय

रुद्राक्षाचे झाड मध्यम आकाराचे असून ४० ते ५० फूट उंच असते. एलिओकार्पस या प्रजातीच्या २०० जाती असून भारतात फक्त २६ जाती आहेत. त्यापैकी रुद्राक्ष ही एक जात आहे. याची साल गडद करडी, त्यावर बारीक छिद्रे व अरुंद आडव्या चिरा असतात. याची पाने एका आड एक मध्यम आकाराची (२.४ – ४.५ सेंमी. लांब) आयत -कुंतसम भाल्यासारखी व दातेरी असतात.

उपपर्णे फार लहान व लवकर गळणारी असून फांद्यांच्या टोकास पानाची गर्दी असते. थंडीच्या दिवसात खोडावर जुन्या पानांच्या बगलेत अनेक लोंबत्या मंजिऱ्यांवर लहान पांढरी फुले येतात. संदले व प्रदले सुटी व प्रत्येकी ५ असून फुलात प्रपिंडयुक्त बिंब असते.

केसरदले सुमारे ४० असून गटागटाने पाकळ्यांसमोर व पुष्पस्थलीवर असतात. किंजपुट लवदार, उध्र्वस्थ काहीसा अंडाकृती व ५ कप्प्यांचा असतो. रुद्राक्षाचे फळ अश्मगर्भी, आठळीयुक्त, गोलसर (१.३ ते २.५ सेंटीमीटर व्यासाचे) असते.

सूर्यमंत्र-गायत्री

$
0
0
gayatri mantra

हिंदू धर्मातील आणि सकल वेदांतील सर्वश्रेष्ठ महामंत्र असे वर्णन असलेल्या ‘गायत्री मंत्र’च्या उत्पत्तीविषयी… 

gayatri mantraॐ भूभुव: स्व:तत्सवितुवरेण्यं
भगरे देवस्य धीमहि।
धियो योन: प्रचोदयात।। ॐ।।

हिंदू धर्मातील आणि सकल वेदांतील सर्वश्रेष्ठ महामंत्र म्हणून ज्याचे वर्णन केले जाते, तो वरील गायत्री मंत्र हा सूर्यमंत्र आहे.

गायत्री या महामंत्राचा शाब्दिक अर्थ थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल :

ओम – परब्रह्म; भू: – पृथ्वी, भूलोक, सृष्टी; भुव: – परलोक, अंतरिक्ष; स्व:(सुव:) -चैतन्य, आनंद, स्वर्ग; तत् – ते, त्या; सवितु: – सूर्याचे (उगवत्या तेजस्वी सूर्याचे); देवस्य – देवाचे, परमात्म्याचे; वरेण्यं-श्रेष्ठ, आदरणीय, स्वीकारण्यास योग्य; भर्ग-तेज, अज्ञानाचा आणि अंध:काराचा नाश करणारे तेजोमंडल; देवस्य – देव, परमेश्वर; धीमहि – ध्यान करतो, चित्त एकाग्र करतो; धिय: – सद्बुद्धीला; य: – जो; न: – आमच्या सर्वाच्या;
प्रचोदयात – स्फूर्ती देऊन प्रगत करतो, प्रेरणा देतो.

अर्थ : अखिल विश्वाला प्रेरणा देणा-या भगवान सवित्याच्या (सूर्यनारायणाच्या) सर्वश्रेष्ठ अवर्णनीय तेजाचे आम्ही ध्यान करतो. तो सूर्यदेव आमच्या बुद्धीला उत्तम प्रेरणा आणि स्फूर्ती देवो!

गायत्री या शब्दातील ‘गय’ म्हणजे प्राण आणि ज्या प्राणांचे जी रक्षण करते ती ‘गायत्री’.

गायत्री मंत्र म्हणून विश्वविख्यात असलेली छंदमय रचना महान तपस्वी विश्वामित्र ऋषींना स्फुरली. सुरुवातीला विश्वामित्र हे तपस्वी नसून एक राजा होते. त्यांचे मूळ नाव विश्वत्थ. एकदा ते कोशल देशात मृगयेसाठी गेले असताना त्यांना वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात आतिथ्य स्वीकारण्याचा प्रसंग आला.

वशिष्ठ ऋषींकडे असलेले दिव्य तेज, बुद्धिसामर्थ्य, प्रसन्नता, शांतता व आश्रमातील विपुल गोधन आणि आश्रमातील शिस्त, पवित्रता पाहून राजा विश्वत्थ प्रभावित झाले. ध्यान आणि तपश्चर्या करून हे सर्व आपण मिळवायचेच, असा मनाशी निश्चय करून त्यांनी राज्याचा त्याग केला. ऋषी बनले.

एकदा ते सकाळी सूर्योदयापूर्वी ध्यानाला बसले. त्या प्रसन्न पहाटेच्या वेळी त्यांचे ध्यान-चिंतनात मग्न झाले होते. सूर्य उगवत होता. अचानकपणे त्यांचे डोळे उघडले गेले. सूर्यदर्शन झाले आणि त्या दिव्य क्षणी त्यांच्या मुखातून आकस्मिकपणे एक छंदोबद्ध सुक्त अवतरले -

तत्सवितुवरेण्यं भगरे देवस्य धीमहि। धियो योन:प्रचोदयात।।
पुढे या सुक्ताच्या सुरुवातीला

‘ओम भू भुव: स्व:’ जोडले गेले, हाच तो महान गायत्री मंत्र.

दापोलीतल्या लाडघर गावातला शिमगा

$
0
0
shimga

लाडघर गावातील श्रानेवाडीत साजरा होणा-या शिमगोत्सवाला संपूर्ण गाव तसंच मुंबईतील गावची मंडळी आवर्जून होळीला लाडघरला येतात. लाडघरमध्ये साजरा होणा-या शिमगोत्सवाविषयी.

shimgaया वर्षी कोकणातील होळी अनुभवायला मिळाली, अन् अनेक वर्षाची इच्छा पूर्ण झाली. दापोली जिल्ह्यातील लाडघर गावची होळी अनुभवली. लाडघर गावातील श्रानेवाडीत होलिकोत्सव म्हणजेच शिमगा साजरा केला जातो.

संपूर्ण गाव तसंच मुंबईतील गावची मंडळी आवर्जून होळीला लाडघरला येतात. श्रानेवाडीत चंडिका देवीच्या मंदिरासमोर होळी उभारली जाते. गावातील पुरुष मंडळी माड नाचवतात. माड उचलून पाच फे-या मारतात. पाच फे-या मारून झाल्यावर तोच माड चंडिका देवीच्या मंदिराला पाच दिवसासाठी बांधून ठेवला जातो, त्यानंतर ब्राह्मणाकडून पूजा करून होळी पेटवली जाते.

लाडघरमध्ये अशी प्रथा आहे की, होळी पेटल्यावर या वर्षी लग्न झालेले पुरुष डोक्यावर टोपी घालून धावत होळीभोवती पाच फे-या मारतात. गावची प्रमुख होळी पेटल्यानंतर प्रत्येक वाडीतील होळी पेटवली जाते. हे सगळं खरंच बघण्यासारखं आहे. दुस-या दिवसापासून देवीची पालखी नाचवणं सुरू होतं.

सुरुवातीला पालखीदेखील पुरुष मंडळी खांद्यावर नाचवत होळी आणि चंडिका देवीच्या मंदिराभोवती पाच फे-या मारतात. प्रत्येक जण थोडया थोडया वेळासाठी पालखी खांद्यावर घेऊन नाचतात. पालखी नाचवणं सुरू असताना ढोल-ताशे तसंच मंदिरातील घंटानाद सुरूच असतो, संपूर्ण वातावरण दुमदुमून जातं.

होळीच्या दुस-या दिवसापासून चंडिका देवीच्या मंदिरात देवीला ओटी भरण्यासाठी गर्दी सुरू होते. प्रत्येक घरातील महिला देवीची ओटी भरते, त्यामध्ये काही नवसाच्या ओटयाही भरल्या जातात. अनेकांनी देवीला नवस बोललेले असतात, ते पूर्ण केले जातात. होळीनंतर पाच दिवसाने कोकणात रंगपंचमी असते.

होळी ते रंगपंचमी पाच दिवस दररोज पालखी नाचवली जाते, तसेच ओटी भरली जाते. गावातील प्रत्येक वाडीचा ओटी भरण्याचा दिवस ठरलेला असतो. त्याप्रमाणे वाडीतील महिला जोडीने येऊन त्या दिवशी येऊन ओटी भरतात. कोकणातील होळी महोत्सव हा पाच दिवस चालतो.

रोज रात्री क्रिकेटचे तसेच कबड्डीचे सामने खेळले जातात. या वर्षी लाडघरला कबड्डीचे सामने खेळले गेले. प्रो कबड्डीप्रमाणे ८ संघ विकत घेऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सामने सुरू आहेत.

अंतिम सामना जिंकणा-या संघाला रुपये ११ हजारांचं बक्षीस आहे. संपूर्ण गाव कबड्डीचे सामने बघण्यासाठी गर्दी करतात. महिलांची उपस्थिती मोठया प्रमाणात बघायला मिळाली. कबड्डीबरोबरच श्रानेवाडीत तरुण मुलांनी बसवलेली नाटकं बघावयास मिळाली. उत्तम अभिनय, उत्तम विषय असलेली नाटकं यावर्षी सादर करण्यात आली होती.

काही मुलं वाडीत रात्रभर क्रिकेट खेळतात. काही ठिकाणी रात्रभर भजनाचा कार्यक्रमही असतो. हे पाच दिवस मजा, मस्ती, धमाल आणि देवीचा जयघोष यांनी भारावलेला असतो. एक वेगळेच प्रसन्न वातावरण सगळीकडे पसरलेले असते. मलाही खरंच खूप खूप मजा आली. प्रत्येकानेच एकदा तरी कोकणातील होळी उत्सव म्हणजेच शिमगा अनुभवला पाहिजे.

भारतीय संस्कृती-वेदाचा स्थूल परिचय

$
0
0
vyas swami

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशीच आपली ही भारतीय संस्कृती आणि ‘वेद’ हा तिचा सौभाग्यलंकार म्हणूनच वेदांचा स्थूलमानाने परिचय करून घेण्याचा प्रयत्न करू या.

vyas swamiश्री वेदपुरुषाय नम:।

ज्ञान, कर्म, उपासना व विज्ञान हे वेदांचे मुख्य विषय आहेत. आजच्या विज्ञान युगाचा मुख्य स्रेत ‘वेद’ हाच आहे. धर्मशास्त्राचा आधारही ‘वेद’च आहेत. विश्वातील प्राचीन वाङ्मयही ‘वेद’ हेच आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चार वेद असून त्या प्रत्येक वेदाचे ‘संहिता’, ‘ब्राह्मणक’, ‘आरण्यक’ व ‘उपनिषद’ असे चार भाग आहेत.

यातील संहितेमध्ये ‘मंत्रभाग’ आहे. ब्राह्मणकामध्ये कर्मकांडाचे गद्यरूपात विवेचन आहे. आरण्यकात कर्मकांडामागील उद्देशाचे विवेचन आहे आणि उपनिषदांमध्ये जीव, जगत् व जगदीश यांचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट केलेला आहे.

ज्ञानसागराचे वैभव म्हणून ऋग्वेदाचा गौरव केला जातो. चारही वेदांमध्ये विस्ताराने हा मोठा आहे. या वेदात १० मंडले, १ हजार २८ सुक्ते व १० हजार ५५२ ऋचा किंवा मंत्र आहेत. या ऋचांमध्ये १ लाख ५३ हजार ८२६ पदे (सोप्या भाषेत शब्द) व ४ लाख ३२ हजार अक्षरे आहेत. या वेदात ‘ब्रह्मणस्पतिसुक्त’, ‘पवमानसुक्त’, ‘पुरुषसुक्त’, ‘विष्णूसुक्त’, ‘श्रीसुक्त’, ‘सौरसुक्त’ परिचित २० सुक्ते आहेत.

याशिवाय पर्जन्यसुक्त, गोसुक्त, मंडूकसुक्त, कृषिसुक्त, शांतिपाठ, रात्रीसुक्त, उषासुक्त इ. महान सुक्तांचा समावेश आहे. अखिल विश्वाला मोहिनी घालणारा ‘गायत्री मंत्र’ हे या वेदाचे भूषण आहे. याशिवाय ऋग्वेदात कालगती, भूगोल, मापन, नवग्रह, सामाजिक नीती, समाजव्यवस्था, औषधी वनस्पती, प्राणिमात्र, पाणी व अग्नी यांची विविध रूपे इ. विषयांची चर्चा केलेली आहे. याशिवाय ‘अक्षै: मा दीव्य:। (जुगार खेळू नका)’, ‘कृषिम इत कृषस्व। (अर्थात, शेती करा.)’ अशी चांगली शिकवणही केलेली आहे.

यजुर्वेदाचे रूप अवाढव्य आहे. या वेदाचा बराचसा भाग गद्यमय आहे. या वेदात ७ कांडे, ४४ प्रश्न, ६५१ अनुवाक, १२ हजार २९० पदे आणि २ लाख ५३ हजार ८६८ अक्षरे आहेत. सर्वसामान्य लोकांना ऐकून परिचित असलेला रुद्र, उदकशांती इ. भाग या वेदात आहे. यज्ञ हा यजुर्वेदाचा गाभा आहे. लहान यज्ञांपासून राजसूय, अश्वमेध, पुत्रकामेष्टी इ. मोठया यज्ञांपर्यंतचे सर्व मंत्र या वेदात आहेत. या वेदामुळे विविध लोकांचे उद्योग-व्यवसाय, चालीरिती, समाजनीती, पशुधन इ. गोष्टींची माहिती आपल्याला मिळते.

ऋग्वेद आणि यजुर्वेद यातील विशेष मंत्राचा मनोज्ञ संग्रह म्हणजे ‘सामवेद’ गान पद्धतीचा वेद, म्हणून याचा गौरव केला जातो. यज्ञामध्ये विविध देवतांना आळवण्यासाठी गानपद्धतीने मंत्र म्हणण्याची पद्धत होती.

वेदांतील ऋचांच्या गायनानेच ‘गायन’ कलेला प्रतिष्ठा मिळाली असावी. भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत आपल्या विभूती सांगताना ‘वेदानां सामवेदोस्मि’ (वेदांमध्ये सामवेद मी) असे म्हटले आहे. (अध्या. १०वा विभूती योग-श्लोक क्र. २२) या एकाच उक्तीवरून या वेदाचे महत्त्व आपल्या लक्षात येते.

अर्थवेदात २० कांडे, ७३० सुक्ते, ५९८७ मंत्र आहेत. गृहस्थधर्म, ब्रह्मचर्य, राष्ट्र, विषनाश, पापनाश, इ. अनेक विषयांचा समावेश या वेदात आहे. प्रापंचिक जीवनात सामान्य माणसाला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते, अशा अनेक समस्यांची चर्चा या वेदात केलेली आहे. म्हणून या वेदाचा उल्लेख ‘प्रपंचवेद’ असाही केला जातो. गणेशभक्तांचे आवडते व लोकप्रिय ‘श्री गणपती अथर्वशीर्ष’ याच वेदात आहे.

वेदांच्या या परिचयाने आपल्या एक गोष्ट निश्चित लक्षात येईल की, सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन सुखमय, शांततामय, क्लेशरहित जावे व त्याला समृद्ध व संपन्न जीवन जगता यावे अशी, फक्त इच्छा व्यक्त न करता वेदांमध्ये उत्तम मार्गदर्शन केलेले आहे. सर्वाना समृद्ध, संपन्न, सुखी जीवनासाठी शुभेच्छा!


अनुभव

$
0
0
Swami Samarth Maharaj

पहाटे सकाळी ३.१५ ते ४ ला उठून श्री स्वामी समर्थ शांत बसायचे. कारण ती वेळ ब्राह्म मुहूर्ताची होती.

Swami Samarth Maharajपहाटे सकाळी ३.१५ ते ४ ला उठून श्री स्वामी समर्थ शांत बसायचे. कारण ती वेळ ब्राह्म मुहूर्ताची होती. ब्राह्म म्हणजे तरी काय? सूर्य उगवण्याच्या अगोदर अडीच तासाच्या कालावधीला ‘ब्राह्म मुहूर्त’ असे म्हणतात. या वेळेत हवेत ऑक्सिजन असतो.

म्हणजे आपण या वेळेत प्राणवायू घेतो आणि प्राणवायू सोडतो. या वेळेत हवेत ओझोन नावाचा वायू असतो की जो शरीरासाठी, चांगल्या आरोग्यासाठी पूरक असतो. या वेळेत मंत्र सजीव असतात. त्या त्या मंत्राच्या देवता निर्गुण रूपांत अवकाशांत फिरत असतात. या वेळेत केलेले चिंतन कायम स्मरणात राहते.

जगात काम करणारे सर्वच पदस्थ हे ब्राह्म मुहूर्तावर उठून विचार-विनिमय-चिंतन-अभ्यासाला बसलात तर तो जास्तीत जास्त मार्कस् मिळवून स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकसित करतो.

श्री स्वामी समर्थ ब्राह्म मुहूर्तावर उठून शांत बसून सकाळी पहाटे चार ते सव्वा चार या वेळेत पुढील दहा तासांत अक्कलकोटला आश्रमांत कोण-कोण येणार आहेत याची इत्यंभूत माहिती द्यायचे. नंतर डोगरावर एकांतात निघून जायचे. नंतर दिवसभराच्या कालावधीत श्री स्वामींनी वर्णन केलेली भक्तमंडळी यायची.

ब्राह्म मुहूर्त आणि ब्रह्म मुहूर्त यांत काय फरक आहे? जे साधक या वेळेस उठून साधना करतात त्यांच्या घरासमोर ब्राह्मी वनस्पती उगवते, वाढते. त्याच वेळेस साधना केल्यामुळे ब्रह्मज्ञानाची जाणीव व ज्ञान होते. ब्राह्म मुहूर्ताच्या वेळेस कोकिळा-कोकीळ, मोर, भारद्वाज पक्षी, मुंगूस, कावळयाचा कानाला मधुर वाटेल असा आवाज, पांढरा उंदीर यांचे दर्शन होते.

वैज्ञानिक म्हणतात की, ब्राह्म मुहूर्ताच्या वेळेस ओझोन वायू-प्राणवायू विपुल प्रमाणांत असतो. ऋणयनांचे अधिक्य व धनात्मक ऊर्जा असते, जी स्वास्थ्यासाठी, शारीरिक आरोग्यासाठी हितकर असते. ऋषी, मुनींचे संकल्प असतात. त्याचबरोबर नि:संकल्प नारायणाच्या ध्यान समाधीचे तरंगही वातावरणांत असतात.

प्रात: काल की वायू को, सेवन करत सुजन।
तांते मुख छबी बढत है, बुद्धी होत बलवान।।

अशा प्रात: काळी मंत्र जप करून आपण मंत्राच्या ऋषींची कृपा विशेष रूपांत मिळवू शकतो. या वेळेत प्राणायम, कमाल भाती केल्यास मन:शक्ती, प्राणशक्ती, भावशक्ती, क्रियाशक्ती, अनुमान शक्ती, क्षमा शक्ती, शौर्य शक्ती व शारीरिक आरोग्य विकसित होते.

श्री. दत्तगुरू गुरुचरित्रांतील अध्याय ३६ वा श्लोक १४४ मध्ये सांगतात, ‘ब्राह्म मुहूर्ती उठोनी। श्री गुरुस्मरण करोनी..!’


‘आम्ही उभे आहोत, फक्त दर्शन द्या।

आम्ही बसलो आहोत बोला काय बोलायचे ते।।’

हे श्री स्वामी समर्थाचे वाक्य आहे. याचा अर्थ काय तर श्री स्वामी समर्थ उभे आहेत, किंवा जेथे समर्थाची उभी मूर्ती आहे तेथे फक्त दर्शन घेऊन भक्त गण निघून जातील. तेथे येणा-या भक्तांची सुविधा, काहीही दिसणार नाहीत.

पण जेथे समर्थाची बसलेली मूर्ती आहे तेथे या, बसा, प्रसाद घ्या, महाप्रसाद घ्या, नंतर चहा घ्या. स्वामींकडे काय मागायचे आहे ते मागा! इत्यादी.. यावरुन बोध काय तर, श्री स्वामी समर्थ बसले आहेत असा फोटो घरांत असावा. हा फक्त ज्ञानाचा भाग आहे.

३० मे २००३ रोजी माझ्या पनवेलच्या राहत्या घरी श्री स्वामी समर्थाची बसलेली मूर्ती अभछत्रासाठी दान, भेट म्हणून आली. पुढील व्यवस्था होईपर्यंत ती आमच्या पनवेलच्या घरी ठेवण्यात आली. साडेतीन वर्षांनी ही मूर्ती लोणावळा अभछत्रामध्ये स्थानपन्न झाली. ही पूर्वी मालाड मध्ये राहणारे आणि सध्या पुणे येथे स्थायिक झालेले श्री. हजारे यांनी अभछत्राला भेट, दान म्हणून दिली.

त्या अगोदर एक उभी अशी (आठ फूट उंचीची) दत्त मूर्ती संस्थेला भेट म्हणून आली होती. सदर दत्त मूर्ती कोथरूड येथील नाफडे यांनी संस्थेला भेट म्हणून दिली होती. ही मूर्ती सुद्धा आमच्या पनवेल येथील घरी चार वर्षे ठेवण्यात आली होती. येथे श्री स्वामी समर्थाच्या ‘मूळ पुरुष दत्त नगर’ ह्या वाक्याची प्रचिती येते.

सर्वानी अवश्य लोणावळा येथे जाऊन दत्त मूर्ती तसेच श्री स्वामींच्या बसलेल्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. या दोन्ही मूर्तीसमोर दोन हजार दोनशे बावीस वेळा संस्कृत रुद्र म्हणण्याचा उपक्रम राबविला तर सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठून सुर्चिभूत होऊन १०० वर्षांपूर्वी साकार झालेल्या श्री विष्णू आण्णा थोरात यांनी लिहिलेल्या पोथीची एक हजार एकशे अकरा पारायणे करण्यात आली.

आम्हीच राम झालो, आम्हीच कृष्ण झालो होतो. हे श्री स्वामी समर्थाचे एक वाक्य! खूप संतांनी आपापल्या भक्तांना किंबहुना सर्वानाच विविध देवता स्वरूपांत दर्शन दिले! पण स्वामींनी मात्र इतर देवता स्वरूपांत दर्शन तर दिलेच, आणि आदिमाया स्वरूपांत अवतार साकार करून दाखविला.


आम्हीच राम झालो, आम्हीच कृष्ण होऊन गेलो हे स्वामींचे वाक्य वाचले आणि श्री कृष्णाच्या द्वारकेपर्यंत आपण पायी प्रवास करावा अशी प्रेरणा झाली. दुधात साखर टाकावी, त्याप्रमाणे माझ्या आईचा जन्म गोकुळ अष्टमीतला..! आणि द्वारकेची पदयात्रा ठरली.

१९९० मध्ये मुंबई-द्वारका हा पायी प्रवास २९ दिवसांत १२५० किमी, श्री स्वामींनी माझ्याकडून करवून घेतला. दरवर्षी एखादी छोटी पदयात्रा आणि पांच वर्षांतून एखादी मोठी पदयात्रा असा माझा जीवन प्रवास सुरू झाला. आणि हे सारे नोकरी, संसार संभाळून! श्री स्वामींच्या वाक्यांत केवढी ताकत आहे, याची प्रचिती येते. आणि या सा-या पदयात्रा करुन त्या श्री स्वामींना किंबहुना ज्या संस्थेत आम्ही काम करतो त्या संस्थेला अर्पण करायच्या!

मी गुरुपुष्यामृत आणि रामनवमी या दिवशी एका सरकारी बँकेत नोकरीला लागलो. आणि वयाच्या साठाव्या वर्षी आनंदाने निवृत्त झालो. माझ्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षांपासून घरांत सूर्योदय ते सूर्यास्त असा सतत नामस्मरणाचा कार्यक्रम सुरू झाला.

तर २५ डिसेंबर दर वर्षी सूर्योदय ते सूर्यास्त श्री स्वामी समर्थ असा सतत नामस्मरणाचा कार्यक्रम सुरू झाला. ही श्री स्वामी समर्थ शक्तीची फार मोठी प्रचिती! हा आणि असा अनुभव सर्वाना यावा अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना..!


१९९७ सालच्या डिसेंबर महिन्यातील गुरुपौर्णिमेचा शुभ दिवस होता. सकाळीच देवपूजा आटोपली. सद्गुरू श्री साटम महाराजांच्या तसबिरीसमोर ध्यान केले आणि वंदन करून उठलो. गुरुपौर्णिमा असल्याने समर्थ श्री साटम महाराजांच्या २०८, गणेशबाग, डॉ. आंबेडकर मार्ग, माटुंगा (पूर्व), मुंबई-१९ येथे असलेल्या दत्तमंदिरात जाऊन श्री समर्थ दर्शन करावे असे मनाने ठरवले.

परंतु तातडीच्या कार्यबाहुल्यामुळे आज काही जाणे शक्य होणार नाही, असे दुसरे मन सांगू लागले. कारण नोकरीच्या जागी प्रमोशन देऊन माझी अन्यत्र बदली दाखवण्यात आली होती व मी नवीन जागी जाण्यास अनुत्सुक होतो. त्यामुळे झालेली बदली मी रद्द होऊन आहे त्याच ठिकाणी माझी नेमणूक व्हावी, म्हणून मी प्रयत्नात होतो.

मात्र याच दरम्यान प्रयत्न मार्गी लागावेत म्हणून मी डॉक्टरी रजेवर असल्याने माझे मासिक वेतन रोखण्यात आले होते. त्यामुळे आपसूकच मी आर्थिक विवंचनेतही होतो. भिडस्त स्वभाव असल्याने प्रापंचिक गरजा भागवताना कुचंबणा होत होती. परंतु माझा स्वत:चा काही खर्च नसल्याने जेमतेम भागत होते. अगदीच निकडीच्या वेळी श्री समर्थ कृपेचा प्रसाद कामी येत होता.

आज तरी प्रयत्नांना यश येऊन माझ्या बदलीचे मनाजोगते काम व्हावे, म्हणून मी श्री समर्थाना प्रार्थना केली व माझ्या वरिष्ठांसमोर गाऱ्हाणे मांडण्यासाठी जात असून माटुंगा येथील मंदिरात कदाचित हजर राहाता येणार नाही तेव्हा क्षमा असावी म्हणून कळकळीने हात जोडले व घराबाहेर पडलो. यावेळी माझ्या खिशात अवघे पंधरा रुपये होते.

मला दादरला शिवसेना भवनच्या शेजारी असलेल्या माझ्या वरिष्ठांच्या कार्यालयात दुपारी एक वाजेपर्यंत पोहोचायचे होते. मात्र कार्यालयाची इमारत नेमकी कुठे आहे? ते मला माहीत नव्हते. सेनाभवनच्या येथील एका दुकानदाराला पत्ता विचारला असता त्याने जवळच्या रस्त्याने पुढे जा म्हणून सांगितले. त्या रस्त्याचे नाव होते डी. एल. वैद्य मार्ग. त्या रस्त्याला लागूनच मोठा उत्सव सुरू होता. रस्त्यावरून येणा-या-जाणा-या लोकांना वा भाविकांना कार्यकर्ते सेवाभावी वृत्तीने आणि आग्रहाने तीर्थप्रसाद देत होते. मी सुद्धा नम्रभावाने हात पुढे केला.

हळदीच्या कांडीसारखा तो पीवळाधम्मक प्रसाद मी भक्षण केला. व सहज म्हणून नजर फिरवली तर तो तेथे ‘श्री मद् बाळकृष्णजी महाराज सुरतकर यांनी स्थापन केलेला, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ’ होता.

आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तेथे गुरुपूजन सुरू होते. तेथेच माझ्या मनातील विचार बदलले. बदलीच्या कामाच्यानिमित्ताने या रस्त्यावर आलो काय आणि श्री स्वामी समर्थाच्या प्रसादाचा लाभ होतो काय, मनाला अप्रुप वाटले. ‘इच्छित मनोरथा सर्व कार्येषु सर्वदा’चा प्रत्यय आला.

गुरुपौर्णिमा असूनही श्री समर्थ साटम महाराजांचे दर्शन होईल की, नाही अशी शंका मनात असताना जणू वाळवंटात मृग नक्षत्राचा वर्षांव व्हावा तसे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाचे ध्यानीमनी नसताना दर्शन झाले. माझे डोळे डबडबून आले. निघालो होतो कुठे? पोचलो होतो कुठे?

श्री सर्मथ साटम महाराजांचे गुरू प. पू. अब्दुल रहमान बाबा यांना अक्कलकोट निवासी भक्तवत्सल स्वामी समर्थाचा अनुग्रह झाला होता. भक्तवत्सल स्वामी समर्थ खडयांमध्ये कोहिनूर हिरा, ताऱ्यांमध्ये सूर्य, फुलांमध्ये कमळ तसे भक्तांमध्ये शोभून दिसत होते. ‘श्री अक्कलकोट निवासी श्री दत्तस्वरुपाय नम:’ (हा मंत्र दाणोलीश्वरांनी त्यांचा शिष्य
बाळकृष्ण अर्थात सखाराम मेस्त्री यांना सांगितला होता व त्यावेळी, अब्दुल रहमान बाबाने माका सांगला, जो ह्यो मंत्र नियमित म्हणात त्याचा सर्व कल्याण होईल, म्हणान तुका सांगलंय. तुझा कल्याण तुका करुचा असात तर ह्यो मंत्र जप ’
- सदर ओळी या दाणोलीश्वर अर्थात सद्गुरू श्री साटम महाराज अवतार-कार्य-लीला या ग्रंथातून घेतल्या आहेत.)

मी सुद्धा ‘श्री अक्कलकोट निवासी श्री दत्तस्वरुपाय नम:’ चा मनात जागर करीत थेट दादरच्या टिळक ब्रीजवरून खोदादाद सर्कलला पोचलो. तेथे एक केळेवाला पाटीत विकायला केळी घेऊन बसला होता. खिशातील उरलेल्या अकरा रुपयाची एक डझन केळी घेऊन मी गणेशबाग येथील श्री समर्थ साटम महाराजांचे दत्तमंदिरात येऊन पोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते- मी सद्गदित अंत:करणाने श्री समर्थाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या पादुकांसमोर नतमस्तक झालो.

लवकरच माझी बदली रद्द होऊन मी होतो त्याच जागी पदोन्नतीवर रुजू झालो. आज मी न चुकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री अक्कलकोट स्वामी समर्थाच्या दादर येथील मठात प्रथम जातो आणि त्यानंतर गणेशबाग, माटुंगा येथील श्री समर्थ साटम महाराजांचे दत्तमंदिरात जाऊन गुरुरायाला वंदन करतो. - भगवान पवार, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग

स्वामी समर्थ शिष्यगण

$
0
0
Sri Swami Samarth

शिष्य-प्रशिष्यांच्या या मांदियाळीतून श्री स्वामी समर्थाच्या जीवनचरित्राचे एक आगळेच व मनोहारी दर्शन घडते. वटवृक्ष ज्याप्रमाणे विविध शाखा-प्रशाखांनी बहरून अवघे आसमंत कवेत घेतो, जमिनीची भेट अस्मानाशी करून देतो; तद्वतच श्री स्वामीकृपेने पुनित झालेला हा समस्त स्वामीभक्तांचा परिवार आहे. मठांची नावे, शिष्यांची नावे वेगवेगळी असतीलही; पण सर्वाचे कार्य एकच आहे. स्वामीसेवा, श्री स्वामी समर्थाचे अक्कलकोटमधील वास्तव्यात अक्षरश: लाखो भक्त त्यांच्या दर्शनासाठी येऊन गेले होते. श्री स्वामी समर्थानी स्वत:च अनेक भक्तांना मठ बांधून राहण्याचे म्हणजेच संप्रदायाच्या विस्ताराचे मार्गदर्शन केले होते. आज हा संप्रदाय दाही दिशांना विस्तारला आहे, ही किती आनंदाची बाब आहे.

Sri Swami Samarthश्री. अण्णा महाराज

सातारा जिल्ह्यातील वाई येथील धोंडोपंत व राधिका या सदाचारसंपन्न दांपत्याच्या पोटी श्री सद्गुरू अण्णा महाराजांचा जन्म झाला. प. पू. अण्णांच्या वडिलांना श्री स्वामी समर्थाचा अनुग्रह झाला होता. त्यामुळे लहानपणापासूनच अण्णा महाराजांना श्री स्वामींच्या सेवेचा वारसा मिळाला होता. त्यांना वयाच्या अकराव्या वर्षी गुरुदीक्षा देण्यात आली.

सांगली येथील श्री. विष्णू गणेश पटवर्धन तथा श्री. निर्मलानंद हे त्यांचे गुरू होत. श्री. अण्णा महाराजांनी पंढरपूर येथे श्री स्वामी समर्थ उपासना धाम स्थापना केले आहे. त्यांच्या पत्नी शालिनी यांना पाचलेगावकर महाराजांचे शिष्यत्व मिळाले होते.

अण्णा महाराजांनी व्यापक भ्रमंती केली व विविध लोकांच्या दु:खावर मायेची फुंकर घातली. प्रापंचितांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले. महाराष्ट्राबरोबरच गोवा, मध्य प्रदेश येथेही श्री अण्णा महाहाराजांचा शिष्यवर्ग मोठया प्रमाणावर आहे.

व्यक्ती-व्यक्तीला जोडून श्रद्धावान, शिस्तबद्ध समाजाची निर्मिती व त्याद्वारे राष्ट्रोद्धार ही संकल्पना श्री. अण्णा महाराजांनी त्यांच्या प्रवचनांद्वारे रुजविली आहे. महिलांना देखील श्रीगुरुचरित्र वाचनाची अनुमती देऊन त्यांनी स्वामी सेवेचा अनोखा आदर्श निर्माण केलेला आहे. प्रपंचात राहूनदेखील परमार्थ करता येतो, देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहूनही चारी मुक्ती साधता येतात, ही त्यांची शिकवण किती मोठी आहे.

श्रीमती सुनंदाताई मुळे

सुनंदाताई मुळे हे आध्यात्मिक अनुष्ठान असलेले अहमदनगर शहरातील एक सात्त्विक व्यक्तिमत्त्व आहे. त्या त्यांच्या लहानपणापासून नाशिक येथिल प. पू. नायणदास श्रीपाद श्रीवल्लभ पिठले महाराज यांच्या सान्निध्यात होत्या.

श्री स्वामी समर्थाच्या लीला, आविष्कार व स्वामींचे बोल त्यांनी लहान वयापासून अनुभवले. स्वामींनी अनेकदा सुनंदाताईंच्या माध्यमातून भक्तांना पुढील वाटचालीची दिशा दाखविलेली आहे.

अहमदनगरमधील श्री. कृष्णराव तथा भाऊ रेखी या त्यांच्या गुरूंनी त्यांच्यावर कृपाछत्र धरले. साधनेने परिपक्व झाल्यावर श्री. नानासाहेब गद्रे यांच्यासमोर १९८१ मध्ये सुनंदाताई प्रकटल्या. नानासाहेबांच्या पदस्पर्शाने त्यांच्यातील ज्ञानगंगा पुलकीत होऊन तिला बहर आला.

त्यानंतर स्वामींकडून जे आदेश आले ते रज-तमगुणांना झाकून फक्त सत्त्वगुण प्रकट झाले. तेच स्वामींचे बोल सुनंदाताईंनी गतवर्ष ग्रंथबद्ध केले आहेत. हे स्वामींचे बोल या पुस्तकाचे वाचन, मनन तसेच चिंतन झाले तर ते स्वामीभक्तांनाच नव्हे, तर इतर सर्वाना निश्चितपणे मार्गदर्शक व हातास धरून बोधपर वाटेवर घेऊन जाणारे असे आहेत.

तीन तपे साधना केली, संसार पणाला लावला, म्हणूनच सुनंदाताई स्वामींचे बोल साकारू शकल्या. परमार्थक्षेत्रात त्यांचे नाव खूप मोठे आहे. कुंडालिनी जागृती, ध्यानधारणा या विषयांवर त्या सखोल विचार मांडतात. त्या भावावस्थेत जातात तेव्हा त्यांच्या वाणीला श्री स्वामींच्या वाणींचे तेज येते, याचा अनुभव अनेक स्वामीभक्तांनी घेतलेला आहे.

डॉ. जयंत करंदीकर हे गेले सहा वर्षे ओंकाराचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करीत आहेत. त्यांची सुनंदाताईंशी एकदा भेट झाली, तेव्हा ओंकारविषयक काही प्रश्न डॉक्टरांनी सुनंदाताईंना विचारले, तेव्हा महाराजांना विचारते आणि सांगते असे नम्रपणे म्हणून त्या भावावस्थेत गेल्या व त्यांनी डॉक्टरांच्या ओंकारविषयक अनेक शंकांचे निरसन केले, ते डॉक्टरांना त्यांच्या अभ्यासात अत्यंत उपयुक्त ठरले.

‘मैं गया नही जिंदा हूँ’

$
0
0
Shri Swami Samarth

पूर्ण ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष जगद्गुरू दत्तात्रेयांचा मानव देहातील अवतार आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवत्गीतेत सांगितल्याप्रमाणे

Shri Swami Samarthपूर्ण ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष जगद्गुरू दत्तात्रेयांचा मानव देहातील अवतार आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवत्गीतेत सांगितल्याप्रमाणे

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमध्र्मस्य तदातमनं सृजाम्यहम्।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दृष्कृताम।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।

ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येईल, अधर्मचारण वाढेल, साधू-संत, सज्जनांना पिडा होईल, दुर्जनांचे प्राबल्य वाढेल त्या त्या वेळी साधू-संत सज्जनांचे रक्षण करून धर्माची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याकरिता मी पुन:पुन्हा अवतार घेईल आणि अशीच स्थिती निर्माण झाली होती.

आपल्या देशात हिंदू साम्राज्य संपुष्टात येऊन मोगल सत्ता ७०० वर्षे आणि इंग्रज सत्ता १५० वर्षे राज्यकर्ते बनले. भारतीय जनता गुलामगिरीत वाढू लागली. जातीभेद, परकीय आक्रमणे, कर्मकांडाचे माजलेले स्तोम, धर्म मरतडांनी ‘परमेश्वर’ ह्या संकल्पनेबद्दल घातलेली भीती, परकीयांशी हातमिळवणी अशा सर्व विचित्र परिस्थितीत भारतीय संस्कृती, चार वेदांपासून अवनत देव, ऋषि-मुनी, साधू-संतांनी समाजासाठी दिलेला तत्त्वज्ञानाचा संग्रह म्हणजेच सनातन वैदिक हिंदू धर्म लोप पावत चालला होता.

समाज फक्त दुबळा, दैववादी, आळशी, पराक्रम हीन बनत गेल्याने मूळ शास्त्र, ग्रंथ, तत्त्वज्ञान, विद्या, कला, शौर्य, धर्य लोप पावत गेले. अशा दिवसेंदिवस खालावत चाललेल्या परिस्थितीतून आर्याना बाहेर काढण्यासाठी श्री दत्त महाराजांनी मानवी देहात गोदावरीचे काठी राजमहेंद्री जवळ पिठापूर येथे इ. स. १३७८ भाद्रपद कृष्ण ४ या शुभदिनी श्रीपाद श्रीवल्लभ आविष्कार धारण केला. नंतर विदर्भातील कारंजा भगवान श्री नृसिंह सरस्वती धारण केला.

‘श्री स्वामी समर्थ’ महाराज हा एक आगळा वेगळा परब्रम्हाचा अवतार आहे. लीला-चमत्कारातून समाजाला धैर्य, हिंमत देण्याचे काम स्वामी महाराजांनी केले. समाजाच्या कल्याणासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी हा अनंतकोटी ब्रह्मांड नायकाचा अवतार आहे.

राजाधिराज योगीराजांचा अवतार आहे. श्री स्वामी महाराजांनी असंख्य शिष्य तयार केले. त्यांच्या जन्मजन्मांतरीचे दोष क्षणात घालवून त्यांना सिद्ध केले. अनेकांचे तर प्रारब्ध बदलवले. अनेकांना भारतात निरनिराळ्या ठिकाणी किल्ले बांधून समाजाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करण्यास सांगितले.

परंतु थोडयाच दिवसात या किल्ल्यांचे मठात रूपांतर झाले. श्री स्वामी महाराजांना मठ स्थापन करावयाचे नव्हते तर त्यांच्या कार्याचे सैनिकांकरवी युद्ध पातळीवर कार्य करावयाचे अभिप्रेत होते. त्यातूनच ‘दिंडोरी प्रणित’ श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग निर्माण झाला. या कार्याचे बाजारोपण करण्यासाठी श्री स्वामी महाराजांनी सद्गुरू प. पु. पीठले महाराजांची निवड केली.

पतिव्रता हे व्रत आहे

धन्य धन्य पतिव्रता। त्रलोक्य धावल ऋषिआश्रमा।।
पुष्पे वर्षती अपूर्व महिमा। निगमागम गर्जती।।

भारतीय संस्कृतीमध्ये पतिव्रतेस अनन्य महत्त्व आहे. पतिव्रताही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे भारतीय देव, संत, परंपरा, देश अभिमान या सर्वच स्तरावर स्त्रियांविषयी अत्यंत आदरभाव आणि नम्रभाव व्यक्त होताना दिसतो.

पती हेच जीच्या जीवनाचे व्रत आहे, तिलाच पतिव्रता म्हणतात. म्हणूनच ग्रंथकारांनी दत्त महाराजांच्या जन्म कथेच्या आधारे पतिव्रता हे एक जन्मोजन्मीचे व्रत आहे. असे माता अनुसया आणि अत्रीमुनीच्या माध्यमातून पटवून दिलेले आहे.

तुका म्हणे पतिव्रता। तिची देवावरी सत्ता।।

इतकी ताकद पतिव्रतेच्या तपश्चर्येत आहे. अगदी अलीकडील काळात घडलेले एक उदाहरण पाहू.

सर्वसाधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वीची एक अद्भुत घटना आहे. वारकरी संप्रदायातील महान विभूती हरिभक्ती पारायण, महावैष्णव वैकुंटवासी श्री धुडामहाराज देगळूकर यांच्या संदर्भातील ही घटना पराकोटीची बुद्धिमत्ता लाभलेली धुडामहाराज अत्यंत मृदभाषी, लाघवी प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व, प्रचंड विद्याभ्यास, रसाळवाणी, महाराज कीर्तनात किंवा प्रवचनात बोलायला लागेल की, दोन दोन लाखांचा जनसमुदाय तासन्तास ऐकत असत असे. अगदी सुई पडली तरी आवाज यावा. इतकी निरव शांतता.

पंढरपुरातील चातुर्मासात जवळ जवळ दहा बारा लोक पीएच.डी.चे विद्यार्थी दररोज प्रवचनाला श्रवणासाठी बसत. एका एका शब्दावर, ओवीवर महिनाभर निरूपण चाललेले असे. इतकी विद्वत्ता. महाराजांनी आयुष्यभर विठ्ठल नामाशिवाय एकही श्वास वाया घालविला नाही. इतकी घोर तपश्चर्या.

अनेक ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. महाराजांचं एवढं वर्णन का लिहिलं? तर नवीन श्रोते किंवा महाराजांच्या विषयी जे अनभिज्ञ आहेत त्यांना महाराजांचा अधिकार कळवा म्हणून लिहिलं.

श्री धुंडा महाराजांची एक गंमत सांगतो मग अद्भुत घटना पाहू. मोठी माणसं खरंच कशी मोठीच असतात पाहा. म्हणूनच त्यांना संत उपाधीने गौरविण्यात आले. त्या काळात पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य वै. सोनोपंत दांडेकर आणि वै. धुंडा महाराज देगळूकर या दोन महान संत विभूती सर्वश्रृत होत्या.

पंढरपुरातील गाडगेबाबा धर्मशाळेच्या पायाभरणी समारंभास सोनोपंत दांडेकर महाराजांना बोलावले होते. परंतु महाराजांच्याकडे गेले. त्यांना सोनूमामांच्या आजारपणाविषयी सांगितले व कार्यक्रमास येण्याची विनंती केली.

धुडामहाराज म्हणाले, पायाभरणी समारंभ आहे नां. मग बरोबर पायाला धोंडा लागतो. कळसाला सोनं पाहिजे. भगवंतांची इच्छा. मी येतो. केवढीही विनयशीलता, मोठेपणा, दोघेही ऋषितुल्य माणसं. त्या श्री. धुंडा महाराजांच्या धर्माचारिणी कृष्णाबाई आईसाहेब पतिचरण तीर्थ घेतल्याशिवाय एकही दिवस राहिल्या नाहिल्या नाहीत.

महापतिव्रताच त्या पतिआज्ञा, पतिसेवा आणि पतिनाम साधना यामुळे त्यांचा चेहरा अतितेज:पुंज होता. भगवंतांच्या नामापेक्षाही जास्त पतिनाम साधना करत असत.

अशा महावैष्णव, कृष्णाबाई, ज्यावेळी वै. धुंडा महाराजांच्या पार्थिवाजवळ आल्या. नम्र झाल्या आणि पतिचरणावर त्यांनी डोकं टेकवून प्राण त्यागीता झाल्या. दोघांचीही अंतयांत्रा अगदी मोठऋ वैभवात झाली. इथे मरण असेल तर वैभवी मरण आहे. एकाच अंतयात्रा व एकाच सरणावर लाखो वारकऱ्यांनी अनुभवली. याला म्हणावे पतिव्रतेचे वैभवी देहत्यागाने. धन्य धन्य ते मरण आणि धन्य धन्य ती पतिव्रता.

सद्य:स्थितीत संस्कृतीचा इतका मोठा पगडा आपल्यावर आहे की त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती कल्पना पूर्णपणे मागे पडली असून ब्युटीपार्लर संस्कृती, हॉटेलडबा संस्कृती, अल्प कपडे संस्कृती, मोबाईल संस्कृती, फेसबुक संस्कृती, पती-पत्नीची नोकरी संस्कृती, घडयाळयाच्या काटयावर धावणारी संस्कृती, संण्डेस्पेशल संस्कृती, ताणतणाव संस्कृती, भोगवादी संस्कृती, चंगळवादी संस्कृती यामुळे पती आणि पतिव्रता हा शब्द अगदी गुळगुळीत झाला आहे.

आता तर तो टिंगलीचा विषय बनल्यामुळे घटस्फोट, विभक्तीकरण किंवा उदासीनता खूप मोठया प्रमाणात पसरली आहे. नैराश्य, आत्महत्या, संघर्ष नित्य जोपासला जाऊ लागला असून संवाद कमी झाला आहे आणि वादच मोठा होऊ लागला आहे. याचेच नाव कलियुग.

समर्थ रामदास : श्रवण

$
0
0
samarth ramdas

योग्यरीत्या श्रवण करणे (Listening) हे चांगल्या संवादासाठी आवश्यक असते. समर्थ रामदास तर उत्तम श्रवणाला त्यांनी कथेत केलेल्या नवविधाभक्तीपैकी सर्वात पहिल्या भक्तीचा दर्जा देतात.

samarth ramdasयोग्यरीत्या श्रवण करणे (Listening) हे चांगल्या संवादासाठी आवश्यक असते. समर्थ रामदास तर उत्तम श्रवणाला त्यांनी कथेत केलेल्या नवविधाभक्तीपैकी सर्वात पहिल्या भक्तीचा दर्जा देतात. ते दासबोधात एका ठिकाणी म्हणतात की,

श्रवणाचा विचार कळे। तरीच भाग्यश्री प्रकटे बळें।

श्रवणाचे महत्त्व सांगणारे (आध्यात्मिक व प्रापंचिकदृष्टया) दोन महत्त्वाचे समास (साधारण ८५ ओव्या) रामदासांनी सांगितल्या आहेत. श्रवणाच्या संदर्भात समर्थ रामदासांनी केलेला बोध असा -

नवविधा भक्ती सांगेन आता श्रवणी दुश्चिता राहो नको.
राहो नको कदा श्रवणावांचूनी सर्वकाळ मनी विचारणा.
विचारण करी श्रवणमनने ध्यासे समाधान पाविजेते.

तसेच इतरत्रही अनेक ठिकाणी समर्थ रामदासांनी ऐकण्याचे संवादातले योगदान सांगणा-या अनेक ओव्या सांगितल्या आहेत. समर्थ रामदासांच्या व्यवस्थापनाचा भर प्रतिपादित विषय शांतपणे ऐकून घेऊन तो विषय समजावून घेण्यासारखा होता, असे अनेक ओव्यांमधून आपल्याला दिसून येते.

स्टीफन कोवे हा आधुनिक मॅनेजमेंट गुरूही संवादात ऐकण्याला महत्त्व देतो. कोवे त्याच्या ‘सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव पीपल’मधील एक हॅबीटच (सवय) या योग्य श्रवणावर खर्ची घालतो (Habit 5…. Seek first to understand and then to be understood ) कोवेच्या मते, ‘बरेच लोक संवादामध्ये दुसरा काय म्हणतोय ते शांतपणे व सरळपणे ऐकूनच घेत नाहीत, तर त्या ऐकण्याच्या क्रियेवर स्वत:च्या मनात येणारे विचार लादतात आणि मुळातच समोरच्याचे म्हणणे नीट न कळल्याने संवाद अपूर्ण राहातो.’

समर्थ रामदास म्हणतात :

‘सकळांमध्ये विशेष श्रवण। श्रवणाहुनी थोर मनन।
मनने होय समाधान। बहुत जनांचे।।
धूर्तपणे सकळ जाणावे। अंतरी अंतर बाणावे।
समजल्याविण सिणावे। कासयासी।।

अर्थात, सगळ्या संवादाच्या प्रकारांमध्ये श्रवण हे विशेष आहे. त्यापेक्षा महत्त्वाचे साधन हे ऐकलेल्या विषयावर पुन:पुन्हा मनात विचार करणे (मनन) हे आहे. संवाद साधताना दुस-याच्या मनात नेमके काय आहे हे जाणून घेतले नाही, तर मग उगाचच नंतर मनाला त्रास का देत बसावा? म्हणजे श्रवण व मननाच्या साहाय्याने दुस-याचे म्हणणे नीटपणे समजावून घेतले पाहिजे असे समर्थाना म्हणायचे आहे. अशा प्रकारे दुस-याच्या मनीचे जाणून घेऊन संवाद साधण्यालाच कोवे ‘प्रिन्सिपल्स ऑफ एंपथेटिक कम्युनिकेशन’ असे आपल्या पाचव्या हॅबीटमध्ये म्हणतात.

समर्थ रामदासांच्या मते :

समर्थाच्या मते वेगवेगळ्या प्रकारचे संवाद समजून घेणे हे आवश्यक आहे. ते आपल्या महंताला सांगतात की, ‘वेगवेगळ्या माध्यमांतून, जसे की, प्रश्न-उत्तर, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष किंवा प्रवचन, तू लोकांशी संवाद साध.’ तसेच योग्य संवादाअभावी होणारी फजितीही करंटेपणाची लक्षणे म्हणून समर्थानी सांगितली आहे.

रुद्राक्ष परीक्षण

$
0
0
RUDRAKSHAW

सामान्यत: रुद्राक्ष पाण्यात ठेवल्यास तो पाण्याच्या तळाशी जातो, मात्र वजनाने हलका असलेला रुद्राक्ष पाण्यावर तरंगतो. 

RUDRAKSHAWसामान्यत: रुद्राक्ष पाण्यात ठेवल्यास तो पाण्याच्या तळाशी जातो, मात्र वजनाने हलका असलेला रुद्राक्ष पाण्यावर तरंगतो. (वस्तूचा तरंगण्याचा नियम अभ्यासता ही कसोटी सर्व रुद्राक्षांना लागू पडत नाही.)

दोन तांब्याच्या पत्रामध्ये रुद्राक्ष ठेवल्यास तो उजवीकडे फिरल्यास खरे मानतात. (हा नियम देखील काही प्रमाणात फसगत करू शकतो.)

सूर्यास्तावेळी भरलेल्या दुधाच्या ग्लासामध्ये रुद्राक्ष ठेवून सूर्योदयानंतर त्या ग्लासातील दूध ४८ तासांनंतर खराब झाले नाही तर रुद्राक्ष चांगला समजतात. (सर्व ऋतूंमध्ये हा नियम लागू पडत नाही.)

निकषावर खरा रुद्राक्ष घासला असता त्याची सोन्याप्रमाणे तेजस्वी रेषा उमटते.
डाऊजिंग (लोलक चिकित्सा) या शास्त्रानिहाय एकाग्रतेने आत्मपरीक्षण केल्यास रुद्राक्षाचा खरेपणा आपणांस अनुभवास येतो.

शक्यतो रुद्राक्ष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने घेणे योग्य अन्यथा लाकडावर कोरलेले किंवा रुद्राक्षाचे मुख कोरून नाग, शिवलिंग, त्रिशुल, ॐ ही चिन्हे असलेले रुद्राक्ष फसगत करू शकतात. (अपवाद वगळता.)

।। धारणा व नियम।।

शरीरातील उष्णतेमुळे रुद्राक्षातील बाष्प कमी होते, म्हणून रुद्राक्ष माळ ही ७ ते १५ दिवसांनी गाईचे तूप, शुद्ध चंदन तेल, गंगाजल इ. मध्ये सूर्यास्तानंतर ठेवून सकाळी सूर्योदयानंतर ती कोमट गरम पाण्याने स्वच्छ करून मऊ कपडयाने पुसावी. म्हणजे त्यातील तेजस्वी गुणधर्म वाढतात.

रुद्राक्ष माळ रात्री झोपण्याच्या वेळेस गळ्यात असू नये कारण कदाचित भयावह स्वप्ने पडू शकतात. (सवयीनंतर हा अनुभव येत नाही.) तसेच रात्री झोपेत माळेतील धातूच्या (सोने, चांदी, तांबे इ.) साखळीच्या गाठीवर सतत दाब पडून ती तुटण्याचा देखील संभव असतो.

स्त्रियांनी मासिक धर्म प्रसंगी ५ दिवस पूर्ण होईपर्यंत माळ धारण करू नये. तसेच स्त्री-पुरुष एकांत समयी रुद्राक्ष धारण करू नये. स्मशानस्थळी जाऊन आल्यानंतर रुद्राक्ष माळेचे गोमूत्राने शुद्धीकरण करून नंतर ती धारण करावी.
रुद्राक्षाची माळ पवित्र व दैव गुणधर्मानी युक्त असल्याने राजधातूमध्ये (सोने) धारण करावे. परंतु तांबे, चांदी, पंचधातू इ. मध्ये किंवा लाल व पंचरंगी दो-यात धारण केल्यास लाभदायक ठरते.

किडयांनी भक्षिलेले, तुकडा उडालेले, मुख अस्पष्ट झालेले रुद्राक्ष धारण करू नये.
लहान बालकाच्या वयोमर्यादेचा व समस्येचा योग्य विचार करून रुद्राक्ष वापरण्यास द्यावा. (९ महिन्यांच्या आतील बालकास शक्यतो देऊ नये.)

।। वैज्ञानिकदृष्टया मूल्यमापन।।

उत्तम दर्जाच्या रुद्राक्षात लाल रंगाच्या दो-यात गुंफून, त्याचे एक टोक आपल्या उजव्या हाताच्या तर्जनी व अंगठा यामध्ये पकडून पश्चिम दिशेला आपले तोंड करून उभे राहावे किंवा लाकडी खुर्चीवर बसावे.

क्र. १ आकृती निहाय : सात्त्विक वस्तूवर (उदा. श्रीयंत्र, गंधगोळी, इ.) धरलेला रुद्राक्ष त्या वस्तूभोवती सव्य प्रदक्षिणा (घडयाळाच्या काटयाच्या दिशेने) मार्गाने फिरू लागतो.

क्र. २ आकृती निहाय : मात्र याच्या उलट कांदा, लसूण अशा राजस किंवा तामस गुणी वस्तूवर रुद्राक्ष धरल्यास तो अपसव्य प्रदक्षिणा (घडयाळाच्या काटयाच्या विरुद्ध दिशेने) फिरू लागतो. वरील दोन्ही प्रयोगावरून ख-या रुद्राक्षामध्ये सात्त्विक, राजस, तामस असे मूल्यमापन करण्याची शक्ती असल्याचे सिद्ध होते.

Viewing all 1081 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>