Quantcast
Channel: श्रध्दा-संस्कृती – Prahaar.in
Viewing all 1081 articles
Browse latest View live

शिवाई देवी

$
0
0
shivai devi

समुद्रसपाटीपासून ३३४२ फूट उंचीवर वसलेल्या शिवनेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर गाठावे. शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला दुर्गमित्रांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक आहे.

shivai deviसमुद्रसपाटीपासून ३३४२ फूट उंचीवर वसलेल्या शिवनेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर गाठावे. शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला दुर्गमित्रांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक आहे. शिवनेरी किल्ल्याच्या दुर्गअवशेषांत प्रवेशद्वारे शरभ शिल्प, शिवाई मंदिर, अंबरखाना इमारत, गंगा-जमुना पाण्याची टाकी, शिवकुंज वास्तू, कमानी मशीद, शिवजन्म स्थान वास्तू, कडेलोट स्थान, बदामी तलाव, कोळी चौथरा इ.समावेश होतो.

शिवनेरी किल्ल्यांवरील विविध कालखंडात उभारण्यात आलेली सात प्रवेशद्वारे अभ्यासकांना संशोधनास आव्हान आहे. गडफेरी करण्यास ३ तास पुरेसे आहेत. जुन्नरपासून २ कि.मी. अंतरावर शिवनेरी आहे. शिवनेरीवर जाण्यासाठी दुर्गयात्रींना राजमार्ग व साखळीची वाट असे दोन पर्याय आहेत.

गडावरील शिवाई देवी मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन विभाग असून मंडपात दोन रांगांत पाच लाकडी खांब आहेत. गाभा ‘यातील शिवाई देवीची चतुर्भुज मूर्ती लक्षवेधक आहे. राजमाता जिजाऊंनी याच देवीला नवस केला होता. दासायन लेखातील रामदासी यांनी दिलेल्या संदर्भानुसार जिजाऊने मनोभावे या देवीची प्रार्थना केली आणि स्वराज्याच्या संकटकाळात व जडणघडणीच्या वाटचालीत रक्षण करण्याबाबत तिची डोळयांत पाणी आणून विनवणी केली.

देवीने प्रकट स्वरूपात जिजाऊंच्या अंगात संचार करून ’प्रत्यक्ष सांबसदाशिव तुझ्या पोटी अवतार घेणार असून तोच तुझे रक्षण करण्यास समर्थ आहे’ असा आशीर्वाद दिला. १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला. देवीच्या नावावरूनच ‘शिवाजी’ हे नाव ठेवण्यात आले.

शिवनेरीच्या प्रदीर्घ इतिहासाची आदिशक्ती शिवाई देवी ही कोरीव लेण्यात स्वयंभू आहे, असे मानतात. सन १९४७ साली कुसुर ग्रामवासीयांनी जी देवीची मूर्ती तयार करून बसवून घेतली ती चतुर्भुज सिहंवाहन, हाती गदा, तलवार, आयुधे असून दोन बाजूंना महिषासुराच्या मूर्ती आहेत. मूर्तीची उंची सुमारे ३.१५ फूट असून मूर्तीचे तेज मन प्रसन्न करते.

इ.स. १६५० मध्ये कोळ्यांनी मोगलांविरुद्ध बंड केले. मोगलांनी ते बंड मोडताना शिवनेरीवर सर्वोच्च ठिकाणी बंड करणा-या कोळयांची मुंडकी उडवली. ऑक्टोबर १६७० मध्ये मोरोपंत पेशव्यांनी शिवनेरी जिंकण्याचा प्रयत्न केला पण अपयश आले. एप्रिल १६७२ मध्येही शिवनेरी माळा लावून जिंकण्याचा प्रयत्न केला पण यश मिळाले नाही. इ.स.१७५६ मध्ये पेशव्यांनी शिवनेरी घेतला.

इ.स. १६३६ ते १७५६ या संपूर्ण कालखंडात शिवनेरी मोगलांच्या ताब्यात होता. शिवनेरी चावंड, हडसर जीवधन हरिश्चंद्र व त्या खालील प्रदेशांचा नवा तालुका करून त्याचे पहिले सुभेदार म्हणून उद्धव वीरेवर चितळेंना नेमण्यात आले.

इ.स. १७९३ मध्ये जुन्नरच्या गढीत २ र्वष अटकेत असताना दुस-या बाजीराव पेशव्यांनी गडदेवता शिवाई देवीला बहीण मानून भाऊबिजेला साडी-चोळी पाठविली. २० मे १८१८ रोजी मेजर एल्ड्रिजने शिवनेरी व दुस-या दिवशी जुन्नरची गढी जिंकली. इ.स. २००६ मध्ये शिवनेरी किल्ला पर्यटन क्षेत्र घोषित करून महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर केलेला आहे.

सध्या पुरातत्त्व विभागाने गडावर बरेच काम केलेले दिसते. शिवनेरीहून लेण्याद्री मानमोडी डोंगररांग नारायणगड ढाकोबा जीवधन हडसर हरिश्चंद्रगड परिसर दिसतो. जुन्नर नाणेघाट हा सातवाहनकालीन व्यापारी मार्ग होता. या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी चावंड हडसर जीवधन शिवनेरी या दुर्गाची निर्मिती झाली. शिवनेरी परिसरातील लेण्यांतील शिलालेख महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची साधने आहेत.

गायत्री मंत्राची फलप्राप्ती

गायत्री मंत्राच्या फलप्राप्तीसाठी सूर्यध्यान करून योग्य पद्धतीने साधना करावी लागते. दररोज दहा वेळा किंवा बारा वेळा किंवा एकशेआठ वेळा गायत्री मंत्राचा जप मनोभावे करावा, असे ग्रंथात सांगितले आहे.

गायत्री मंत्राच्या सव्वा लाख जपाला अनुष्ठान म्हणतात. हे अनुष्ठान केव्हाही करावे; पण पंचमी, एकादशी व पौर्णिमा या शुभतिथी मानल्या गेल्या आहेत. अनुष्ठानासाठी वद्यपक्षापेक्षा शुक्लपक्ष अधिक श्रेयस्कर मानला जातो. मात्र गायत्री मंत्राचा जप यथार्थ रीतीने व्हायला हवा.

मंत्राच्या उच्चारणाला खूप महत्त्व असे. मंत्रातील प्रत्येक अक्षराचा उच्चार कसा करायचा याचे शास्त्र आहे. ध्वनी किती बरोबर उमटतो, याला महत्त्व आहे. तो विशिष्ट लयीत आणि विशिष्ट सुरात उच्चारायला हवा. तरच त्यातून विलक्षण नादमाधुर्य स्र्वू लागेल. मंत्रातील सर्व शब्दांचा उच्चार स्पष्ट आणि शुद्ध हवा आणि त्याचा अर्थही नीट समजून घ्यायला हवा.

म्हणूनच कोणताही मंत्री योग्य जाणकार गुरूकडून शिकून घेतला पाहिजे. गायत्री मंत्राची उपासना करणा-या साधकाची सदसद्विवेकबुद्धी जागृत हवी. त्याने असत्याने कुटिल वागून चालणार नाही. गायत्री मंत्राची उपासना करणा-या व्यक्तीची एकंदर प्रवृत्ती वाईट असली तर उपासना निष्फळ ठरते. शिवाय योग्य गुरू वाचून गायत्री मंत्राची साधना करणे म्हणजे वादळात शिड फाटलेल्या नौकेतून पैलतीरी जाण्याचा आत्मघातकी प्रयत्न करण्यासारखे आहे.

गायत्री मंत्राच्या साधनेने उत्तम गुणसंपदा प्राप्त होते. साधकाची जीभ पातळ होते, त्यामुळे साधकाचे शब्दोच्चार स्पष्ट आणि बिनचूक होतात. मानसिक व शारीरिक बल वाढते. बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती विकसित होते. उत्तम आरोग्य लाभून प्रापंचिक आणि पारमार्थिक समृद्धी प्राप्त होते.

गायत्री मंत्राच्या उच्चतम साधनेने साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते. त्याच्यातील अनेक सिद्धींची जाणीव त्याला होऊन त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. मानसिक प्रसन्नता आणि शांती कैक पटीने अधिक अनुभवास येते.
सर्व ऋषिमुनींनी, साधुसंतांनी गायत्रीला गौरविलेले आहेच; तसेच आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ जाणकारांनी आणि विचारवंतांनीही गायत्री मंत्राचा गौरव केला आहे.

स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणतात, ‘‘गायत्रीच्या जपाने फार मोठी शक्ती प्राप्त होते. तिची प्रत्यक्ष साधना करूनच तिचा अनुभव घ्यायला हवा.’’ स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘गायत्री हा सद्बुद्धी देणारा मंत्र आहे. सद्बुद्धीने सन्मार्गाचा लाभ होतो आणि सन्मार्गाने जात असताना सत्कर्मेही आपोआप घडतात.’’

लोकमान्य टिळक म्हणतात, ‘श्रेष्ठ मार्गाने जाण्याची प्रेरणा देण्याचे प्रचंड सामर्थ्य गायत्री मंत्रात आहे. गायत्रीच्या साधनेमुळेच सदसद्विवेकबुद्धी प्राप्त होते.’ पंडित मदनमोहन मालवीय म्हणतात, ‘‘ईश्वराविषयी अनन्यनिष्ठा गायत्रीमुळेच निर्माण होते. एवढेच नव्हे, तर भौतिक ऐश्वर्यही गायत्रीमुळे प्राप्त होते.’’

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन गायत्रीचा महिमा सांगताना म्हणतात, ‘‘गायत्री मानवतेला मिळालेली महान देणगी अहे. यथार्थ ज्ञानाचा स्रेत मानवी अंतर्मनात गायत्रीने प्रवाहित होऊ शकेल. इतकेच नव्हे, तर शाश्वत ज्ञानाचे अक्षय्य तेवणारे असंख्य नंदादीप मानवच मानवतेच्या मंदिरात लावू शकेल.’’


गायत्री मंत्राची फलप्राप्ती

$
0
0
gayatri mantra

गायत्री मंत्राच्या फलप्राप्तीसाठी सूर्यध्यान करून योग्य पद्धतीने साधना करावी लागते. दररोज दहा वेळा किंवा बारा वेळा किंवा एकशेआठ वेळा गायत्री मंत्राचा जप मनोभावे करावा, असे ग्रंथात सांगितले आहे.

gayatri mantra

गायत्री मंत्राच्या फलप्राप्तीसाठी सूर्यध्यान करून योग्य पद्धतीने साधना करावी लागते. दररोज दहा वेळा किंवा बारा वेळा किंवा एकशेआठ वेळा गायत्री मंत्राचा जप मनोभावे करावा, असे ग्रंथात सांगितले आहे.

गायत्री मंत्राच्या सव्वा लाख जपाला अनुष्ठान म्हणतात. हे अनुष्ठान केव्हाही करावे; पण पंचमी, एकादशी व पौर्णिमा या शुभतिथी मानल्या गेल्या आहेत. अनुष्ठानासाठी वद्यपक्षापेक्षा शुक्लपक्ष अधिक श्रेयस्कर मानला जातो. मात्र गायत्री मंत्राचा जप यथार्थ रीतीने व्हायला हवा.

मंत्राच्या उच्चारणाला खूप महत्त्व असे. मंत्रातील प्रत्येक अक्षराचा उच्चार कसा करायचा याचे शास्त्र आहे. ध्वनी किती बरोबर उमटतो, याला महत्त्व आहे. तो विशिष्ट लयीत आणि विशिष्ट सुरात उच्चारायला हवा. तरच त्यातून विलक्षण नादमाधुर्य स्र्वू लागेल. मंत्रातील सर्व शब्दांचा उच्चार स्पष्ट आणि शुद्ध हवा आणि त्याचा अर्थही नीट समजून घ्यायला हवा.

म्हणूनच कोणताही मंत्री योग्य जाणकार गुरूकडून शिकून घेतला पाहिजे. गायत्री मंत्राची उपासना करणा-या साधकाची सदसद्विवेकबुद्धी जागृत हवी. त्याने असत्याने कुटिल वागून चालणार नाही. गायत्री मंत्राची उपासना करणा-या व्यक्तीची एकंदर प्रवृत्ती वाईट असली तर उपासना निष्फळ ठरते. शिवाय योग्य गुरू वाचून गायत्री मंत्राची साधना करणे म्हणजे वादळात शिड फाटलेल्या नौकेतून पैलतीरी जाण्याचा आत्मघातकी प्रयत्न करण्यासारखे आहे.

गायत्री मंत्राच्या साधनेने उत्तम गुणसंपदा प्राप्त होते. साधकाची जीभ पातळ होते, त्यामुळे साधकाचे शब्दोच्चार स्पष्ट आणि बिनचूक होतात. मानसिक व शारीरिक बल वाढते. बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती विकसित होते. उत्तम आरोग्य लाभून प्रापंचिक आणि पारमार्थिक समृद्धी प्राप्त होते.

गायत्री मंत्राच्या उच्चतम साधनेने साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते. त्याच्यातील अनेक सिद्धींची जाणीव त्याला होऊन त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. मानसिक प्रसन्नता आणि शांती कैक पटीने अधिक अनुभवास येते.
सर्व ऋषिमुनींनी, साधुसंतांनी गायत्रीला गौरविलेले आहेच; तसेच आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ जाणकारांनी आणि विचारवंतांनीही गायत्री मंत्राचा गौरव केला आहे.

स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणतात, ‘‘गायत्रीच्या जपाने फार मोठी शक्ती प्राप्त होते. तिची प्रत्यक्ष साधना करूनच तिचा अनुभव घ्यायला हवा.’’ स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘गायत्री हा सद्बुद्धी देणारा मंत्र आहे. सद्बुद्धीने सन्मार्गाचा लाभ होतो आणि सन्मार्गाने जात असताना सत्कर्मेही आपोआप घडतात.’’

लोकमान्य टिळक म्हणतात, ‘श्रेष्ठ मार्गाने जाण्याची प्रेरणा देण्याचे प्रचंड सामर्थ्य गायत्री मंत्रात आहे. गायत्रीच्या साधनेमुळेच सदसद्विवेकबुद्धी प्राप्त होते.’ पंडित मदनमोहन मालवीय म्हणतात, ‘‘ईश्वराविषयी अनन्यनिष्ठा गायत्रीमुळेच निर्माण होते. एवढेच नव्हे, तर भौतिक ऐश्वर्यही गायत्रीमुळे प्राप्त होते.’’

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन गायत्रीचा महिमा सांगताना म्हणतात, ‘‘गायत्री मानवतेला मिळालेली महान देणगी अहे. यथार्थ ज्ञानाचा स्रेत मानवी अंतर्मनात गायत्रीने प्रवाहित होऊ शकेल. इतकेच नव्हे, तर शाश्वत ज्ञानाचे अक्षय्य तेवणारे असंख्य नंदादीप मानवच मानवतेच्या मंदिरात लावू शकेल.’’

भारतीय संस्कृती गुढीपाडवा

$
0
0
Gudhi Padawa

चैत्र शुद्ध प्रतिपदा हा मराठी वर्षातील पहिला दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. गुढी उभारणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा खूप जुनी आहे. 

Gudhi Padawaचैत्र शुद्ध प्रतिपदा हा मराठी वर्षातील पहिला दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. गुढी उभारणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा खूप जुनी आहे. जुनी म्हणजे किती जुनी? असे सांगतात की ब्रह्यदेवाने ही सकल सृष्टी निर्माण केली ती याच दिवशी.

या सृष्टीत अर्थातच अनेक वस्तू निर्माण केल्या. त्या सृष्टीचा म्हणजे तिच्यातील प्रत्येक वस्तूच्या कार्यारंभाचा हा पहिला दिवस, म्हणूनच आपण तो गुढी उभारून साजरा करायचा. प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणावर म्हणजे असुरीवृत्तीवर विजय मिळवून अयोध्येला परत आले तो हाच दिवस.

सकल अयोध्यावासीयांनी या दिवशी गुढया, तोरणे लावून प्रभू श्रीरामांचे स्वागत केले. चैत्र महिन्यात सृष्टीचे अवलोकन केले, तर असे लक्षात येते की ‘शिशिर’ ऋतूत ‘पानगळ’ झाल्यामुळे वृक्ष निष्पर्ण झालेले असतात. सृष्टी शुष्क झालेली असते. पण चैत्रात हेच वृक्ष नवपालवीने फुलतात. वसंत ऋतूची चाहूल लागल्यामुळे कोकिळेचा सुस्वर कानी येऊ लागतो. निसर्गाचा या परिवर्तनाचे, नवचैतन्याचे स्वागत करण्यासाठीही आपण गुढी उभारायची.

गुढीपाडव्याच्या दिवशी लवकर उठून मंगलस्नान करावे. विघ्नहर्त्यां गजाननाचे, देवादिकांचे स्मरण व पूजन करावे. गुरू, घरातील वडीलधारी मंडळी यांना वंदन करावे आणि सूर्योदयाच्या वेळी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर गुढी उभारावी. आता गुढी कशी तयार करायची? शौर्याचे, पराक्रमाचे प्रतीक म्हणून उंच काठी घ्यावी. वैभवाचे प्रतीक म्हणून तिच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधावे.

आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुलिंबाची डहाळी बांधावी. शुभसूचक म्हणून आंब्याची पाने, पावित्र्य, मांगल्याचे प्रतीक म्हणून फुलांचा हार, गोडव्याचे प्रतीक म्हणून साखरगाठीची माळ बांधावी आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून काठीच्या वरच्या टोकाला चांदीचा, तांब्याचा किंवा पितळेचा गडू उपडा ठेवावा. अशी तयार झालेली विजयाची, पराक्रमाची गुढी धुवून-पुसून स्वच्छ केलेल्या जागी बांधून आनंद व्यक्त करावा.

गुढीला गंध, अक्षता, फुले, हळद-कुंकू वाहावे. गुढीची पूजा करावी. उदबत्ती, निरांजन ओवाळावे. दूध-साखर, पेढे असा गोड नैवेद्य दाखवावा. दुपारी जेवणाच्या वेळी गोडधोडाच्या स्वयंपाकेचा नैवेद्य गुढीला दाखवावा. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हळद-कुंकू, फुले व अक्षता वाहून गुढी उतरवावी.

गुढी म्हणजे विजयाची पताका. भोगवृत्तीवर योगवृत्तीने मिळवलेला विजय. वैभवावर विभूतीने मिळवलेला विजय आणि विकारांवर विचाराने मिळवलेला विजय. म्हणून माझ्यातील असुरी वृत्ती, चांचल्यवृत्ती नाहीशी होऊन माझे मन शांत, पवित्र, स्थिर व सात्त्विक राहावे अशी प्रार्थना प्रत्येकाने गुढीसमोर करायची. म्हणजे प्रत्येक कार्यात विजयश्री प्राप्त होते.

गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होते, म्हणून या दिवशी पंचांगाची पूजा करून ‘नव संवत्सर फल’ वाचतात. ‘तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग’ ही पंचागाची पाच अंगे असतात. या पाचांच्या संदर्भाने हे संवत्सर फल दिलेले असते. गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल, त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा म्हणजे वर्षाचा ‘अधिपती’ मानला जातो. या वर्षी शुक्रवार आहे.

शुक्रवारचा स्वामी ‘शुक्र’ म्हणून या वर्षीच्या ‘दुर्मुख’ या नावाच्या संवत्सराचा अधिपती ‘शुक्र’ हा आहे. ‘गुढीपाडवा’ हा साडेतीन मुहूर्तातला महत्त्वाचा एक मुहूर्त. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करतात. नवीन व्यवसायाचा, उपक्रमाचा प्रारंभ करतात. व वर्षभर नेटाने, जिद्दीने, श्रद्धेने काम करून विजय प्राप्त करतात.

या दिवसाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे आरोग्याचा केलेला विचार या दिवशी प्रात:कालीच कडुनिंबाच्या पानाबरोबर ओवा, मीठ, हिंग, जिरे, मिरी, साखर वाटून खावी. याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते. आरोग्य चांगले राहाते. येणा-या उन्हाळ्यात पित्ताचा नाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे असे अनेक औषधी गुण या कडुनिंबाच्या अंगी आहेत. वर्षारंभीच चिमूटभर कडू चव घेऊन संपूर्ण वर्ष गोड जावे हाच त्यामागील हेतू आहे.

अशा प्रकारे मांगल्याचे, पावित्र्याचे, समृद्धतेचे प्रतीक असलेली गुढी उभारून हा सण आनंदाने साजरा करावा. नवीन वर्षाचे अभीष्टचिंतन करावे. सहकार्याचा संकल्प करावा व नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वाना द्याव्यात.

कर्करोगातून पूर्णपणे बरा झालो

$
0
0
Shri Swami Samarth 2

माझी धर्मपत्नी सौ. माधुरी ही श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्त आहे. आजपर्यंत जवळजवळ अडीचशेपेक्षा अधिक पारायणे तिने शास्त्रोक्त पद्धतीने केली व त्यामुळेच मला जीवदान मिळाले.

Shri Swami Samarth 2मी स्वत: ताजमहाल पंचतारांकित हॉटेलमध्ये तेहतीस वर्षापासून नोकरी करीत आहे. माझी धर्मपत्नी सौ. माधुरी ही श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्त आहे. यात दुमत नाही. प्रपंच सांभाळून ती नित्य साप्ताहिक गुरुचरित्र वाचन गेल्या सात ते आठ वर्षापासून करीत आहे. आजपर्यंत जवळजवळ अडीचशेपेक्षा अधिक पारायणे तिने शास्त्रोक्त पद्धतीने केली व त्यामुळेच मला जीवदान मिळाले.

अचानक शारीरिक काही त्रासामुळे सन २०१३ मध्ये बॉम्बे हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी केली व कॅन्सरचे निदान झाले. कॅन्सर एका ठिकाणी नाही, तर तब्बल मोठया आतडयात, पोटातील काही भागात, कमरेच्या हाडात व यकृत (Liver) अशा चार ठिकाणी असल्याचे सीटी स्कॅनमधून निदर्शनास आले. ‘‘कॅन्सर’’ नावानेच मी स्वत: अस्वस्थ झालो होतो व तोही चार ठिकाणी, परंतु भोग हे भोगावेच लागतात व पत्नी सारखी सांगत होती की, स्वामी समर्थ महाराज पाठीशी आहेत, तुम्ही घाबरू नका.

योगायोगाने घराच्या बाजूलाच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र-राजाजी पथ, श्री दत्त मंदिर डोंबिवली (पूर्व) येथे पत्नीसमवेत दर्शनास गेलो व प्रश्न मांडला. सेवा केंद्रातून काही सेवा करण्यास सांगितले व ‘‘तुमच्या पत्नीने गुरुचरित्र पारायणे मजबूत केलेली असल्याने काळजी करू नका, वैद्यकीय जे उपचार आहेत ते सर्व करा व त्यासोबत काही आध्यात्मिक सेवा करा व श्री गुरुपीठ निर्मित सप्तरंगी काढा. आयुर्वेदिक औषध नित्य चालू ठेवा व संकल्पपूर्वक महाराजांना प्रार्थना करून सेवा सुरू करा’’ असे सांगितले.

माझे पहिले ऑपरेशन १९ डिसेंबर २०१२ रोजी झाले. त्यानंतर छोटी-मोठी अनेक ऑपरेशन्स व एकोणीस केमोथेरपी झाल्या. एका आजारातून दुसरा आजार व त्या जीवघेण्या यातना, अक्षरश: मृत्यू झाला तर बरे होईल, असे वाटायचे. परंतु आज मला विश्वास बसला, केवळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाआशीर्वादाने व माझ्या पत्नीने केलेली श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा यामुळे मी शंभर टक्के सहीसलामत बरा झालो व ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’’ हे त्रिवार सत्य आहे याची मला प्रचिती आली.

माझ्या पत्नीने सांगितले की, आता शेवटची केमोथेरपी प. पू. गुरुमाऊलींचे दर्शन घेतल्यानंतरच करायची, कारण योगायोगाने १२ मार्च २०१६ रोजी प. पू. गुरुमाऊलींचा सत्संग मेळावा दिवा-कोळीवाडा, ऐरोली येथे झाला. आम्ही दोघांनी श्रद्धापूर्वक लांबूनच प्रार्थना केली, ।। ही शेवटचीच केमोथेरपी असो, आता परत नको।।

शेवटच्या केमोथेरपीसाठी मी १९ मार्च २०१६ रोजी हॉस्पिटलमध्ये दखल झालो व खरोखरंच ही शेवटचीच केमोथेरपी ठरली व डॉक्टरांनी सांगितले, ‘‘वैद्यकीय चाचणीनुसार आपण पूर्णत: बरे झालात’’ व मला खरोखरंच पुन:श्च जीवदान मिळाले.

अभक्ष्य भक्षण करू नये

$
0
0
Shri Swami Samarth 1

मागील एका भागात आम्ही कलियुगातील वर्तमानाचे जरा जास्तच वर्णन केले. त्यामुळे सत्य सर्वांना रुचेल असे नाही.

Shri Swami Samarth 1बीज एक अनेक प्रसव छेदन। अभक्ष्य भक्षक उपासक जाण।।
निंद्यकर्मी दुराचारी जन। होतील। निश्चित कलीयुगी।।
श्रोतेजन हो..।

ही वरील ओवीतील भविष्यवाणी होऊन जवळजवळ एकशे सोळा वर्षे झालेले आहे. आज हे वर्तमान आहे. मागील एका भागात आम्ही कलियुगातील वर्तमानाचे जरा जास्तच वर्णन केले. त्यामुळे सत्य सर्वाना रुचेल असे नाही. मग अनेकांनी भ्रमणध्वनीवरून संवाद केला. खूपच समाधान झाले. ही भविष्यवाणी आधीच नमूद करून ठेवलेली आहे. आपण सगळे जण वर्तमानात त्याचा अनुभव घेत आहोत.

श्री स्वामी समर्थ महाराजांनी या अवतार कार्यात केवळ धर्मक्षणाचे काम केलेले आहे. सर्वत्र कलीचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे धर्माला ग्लानी येणार हेही निश्चित असल्यामुळेच दत्त महाराजांना स्वामी समर्थ रूपात येणे भाग पडले. खरं तर “धर्मो रक्षति रक्षिता:” असं शास्त्र वचन आहे. म्हणजे जो आपल्याला धर्माप्रमाणे वागतो. त्याचे रक्षण धर्म करतो. जो धर्माच्या सगळया नियमांचे पालन करतो.

त्या व्यक्ती प्रसन्न आणि सदाचरणी असतात. दुस-यांना त्या व्यक्ती मार्गदर्शन करतात. गुरुस्थानी असतात. आणि जे लोक धर्माच्या विरुद्ध वागतात. धर्माचे पालन करत नाहीत. त्या व्यक्ती सतत संकटात सापडतात. त्यांचे चंचल आणि संघर्षमय असते.

श्री गुरुलीलामृत ग्रंथातील तिस-या अध्यायातील प्रस्तूत ओवींचा प्रत्यय आपण घेत आहोत. महाराजांचं आगमन झाल्यावर महाराज प्रथम खंडोबा मंदिरात बसले. त्यानंतर तीन दिवसांपर्यंत साधना करीत वेशीत बसून राहिले. त्या तीन दिवसांत महाराजांच्या एकांतिक वागण्यामुळे अनेकांना त्यांची चेष्टा, मजा करण्याची रिकामी चिलीम (हुक्का) आणून दिली. ती ओढण्याचा आग्रह करून मजा करू लागले.

परंतु त्या ब्रह्मांडनायकाने रिकाम्या चिलमीतूनही धूर काढून दाखवला. ही एक गोष्ट त्यामध्ये आहे. त्यावेळी ते समर्थ होते म्हणून ते करू शकले. आज आपल्या प्रत्येकावर अर्थात धर्मपरायण असणा-या लोकांवर सतत संकटे येतात. आणि ती आपोआप निवारलीही जातात, हा अनुभव आहे.

आमच्यावर प्रत्येकवेळी परधर्माची भुरळ पडते. मागे एकदा मुंबईतील नामांकित शाळेमध्ये आम्ही विद्यार्थी परिसंवादासाठी गेलो होतो. जगात चांगले काय? आम्ही म्हणालो, पहिल्यांदा जगात सर्वात चांगले काय असेल तर स्वत:चे डोळे, नाक, कान, तोंड, हात, पाय, बुद्धी आणि सुदृढ शरीर त्यानंतर स्वत:ची आई, वडील, भाऊ, बहीण, नाती त्यानंतर हा निसर्ग, गुरुजन, आपली शाळा, समाज, गाव, राज्य, आणि देश.

अनेकांनी वेगवेगळी उत्तरे दिली. एक प्रयत्न करून पाहा. वरील क्रमवारीत बदल करण्याचा, स्वत:चे डोळे जर सतत फक्त चांगले पाहत असतील तर व जगातील कोणतीही वाईट गोष्ट तुम्हास दिसणारच नाही. इथे डोळे फक्त बाहेरचे पाहणारे नव्हे तर स्वत:च्या अंतरंगात पाहणारे सुद्धा आहेत. ज्ञानचक्षू आणि बाह्यचक्षू हे जर धर्मराजाप्रमाणे असतील तर धर्मच सगळीकडे दिसेल. दृष्ट माणूस शोधूनही दिसणार नाही.

जीवनाचा आनंद ख-या अर्थाने मिळत जाईल. आणि जर दुर्योधनाची दृष्टी असेल तर सतत वाईट विचार, आचार, उच्चार समोर येत राहतील. मन नकारात्मकतेकडेच अधिक झुकेल. सगळीकडे अर्धमच दिसेल. निंदा, द्वेष, मत्सर यांचा प्रभाव वाढून दूराचारी प्रवृत्ती बळावेल. हे सांगितल्यावर, उदाहरणे दिल्यावर मुलांना ते पटेल.

आम्ही पुढे म्हणालो, मित्रांनो! आपण जसे अन्न घेतो. तशी आपली बुद्धी बनते. आपण माणसासारखं वागलो आणि माणसाला जो आहार त्याच्या शरीर रचनेनुसार घ्यावा असे धर्म सांगतो; तसा आहार घेतला तर माणूस सुखी, समाधानी शांत, प्रसन्न राहतो.

जनावरांची किंवा हिंस्त्र पशूंच्या तोंडाची रचना पाहा. तीक्ष्ण सुळे, दात असल्यामुळे त्यांना मासांहार चालतो. माणसाच्या दातांची, शरीराची, पोटाची रचना पाहा. माणसाने मांसाहार करूच नये, अशी आहे. मांसाहार योग्य नसला तरीही अभक्ष्य म्हणून बरीच मंडळी करतात. ती माणसे सतत रागीट शीघ्रकोपी, सतत असमाधानी, हव्यास असणारी, अडचणीत सापडणारी, मित आहार घेणारी माणसे धर्माप्रमाणे आचरण करतात.

शांतताप्रिय, विद्याभ्यासी, प्रेमळ, नम्र, स्नेहभाव जपणारी, भूत, भविष्य वर्तमानाचा वेध घेणारी असतात. ख-या अर्थाने भक्तिप्रेम जपणारी, दीर्घायुषी, संकटात उगमगून न जाता सहजपणे मार्ग काढणारी धर्मवृद्धीसाठी झटणारी असतात. हे संकल संत चरित्रावरून आपल्याला दिसेल. महाराजांचे चरित्रही हाच संदेश देणारे आहे.

पुराण पुरुषाच्या पाऊलखुणा

$
0
0
Shri Swami Samarth

‘मूळ पुरुष-वडाचे झाड-दत्तनगर-मूळ’ अशा गूढ शब्दांत माहिती सांगणा-या श्री स्वामी समर्थाचे सर्व चरित्रच गूढ आणि अतक्र्य घटनांनी ओतप्रोत भरलेले आहे.

Shri Swami Samarth‘मूळ पुरुष-वडाचे झाड-दत्तनगर-मूळ’ अशा गूढ शब्दांत माहिती सांगणा-या श्री स्वामी समर्थाचे सर्व चरित्रच गूढ आणि अतक्र्य घटनांनी ओतप्रोत भरलेले आहे. ते कोण, कोठले, त्यांचे कुळ, आई-वडील यांचा काहीच थांगपत्ता लागत नाही. जवळच्या भक्तांनी त्या काळी हा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

स्वामी समर्थाचा मुक्काम एकदा चिंतोपंत टोळांच्या घरी होता. त्यावेळी सहज गप्पागोष्टींच्या ओघात चिंतोपंतांनी धाडस करून महाराजांना ‘आपण पूर्वाश्रमी गृहस्थ होतात काय’, असे विचारले. तसेच त्यांच्या जातीविषयी विचारले.

त्यानंतर एकदा कर्वे नावाच्या गृहस्थांनी त्यांच्या मूळविषयी खुलासेवार सांगण्याची विनंती केल्यावर समर्थ यतिराज त्यांना म्हणाले, ‘आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नृसिंहभान, काश्यप गोत्र, आमची मीन राशी. पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस.’

स्वामी समर्थाची जी पत्रिका नाना रेखी यांनी तयार केली होती व जिला स्वामी समर्थानी मान्यता दिली होती, त्या पत्रिकेवर नृसिंहभान असे टोपणनाव आढळते. श्री रेखींच्या पत्रिकेनुसार समर्थाची रास मेष असून त्यांचे जन्मलग्न मीन होते. जेव्हा समर्थ आमची राशी मीन असे म्हणाले, तेव्हा त्यांना कदाचित जन्मलग्न अभिप्रेत असावे.

या पत्रिकेत देखील यजुर्वेदी ब्राह्मण व काश्यप गोत्र हा उल्लेख आहे. ही पत्रिका पाहिल्यावर श्री समर्थाच्या मुखातून ‘नौबत बजाव’ असे शब्द बाहेर पडले. व दक्षिणा म्हणून श्री समर्थानी नानाजींच्या उजव्या हातावर आत्मलिंगाचा प्रसाद दिला. त्याचवेळी त्यांच्या हातावर निळ्या रंगाचे लहानसे विष्णुपद उमटले. नाना रेखींच्या मृत्यूपर्यंत हे विष्णुपद त्यांच्या हातावर होते असे म्हणतात.

श्री स्वामी साक्षात दत्तावतार वर्णिले आहेत. ते श्री दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी व श्री नृसिंहसरस्वती असे आहेत. त्या पुढील अवतार श्री स्वामी समर्थाचा आहे. श्री स्वामींचे सर्व भक्त त्यांस दत्ताचा अवतार मानून भक्ती करतात. गाणगापूर हे श्री नृसिंहसरस्वतींचे स्थान. श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेक-यांस अक्कलकोटास जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरास दृष्टांत झालेले आहेत.

‘मुलगा झाल्यास गाणगापुरास येऊन त्याची मुंज करीन’ असा नवस घाटावरील एका ब्राह्मणाने श्री नृसिंहसरस्वतींना केला होता. नवस फेडण्यास ते ब्राह्मण कुटुंब जेव्हा गाणगापुरास निघाले तेव्हा अक्कलकोट येथे त्या ब्राह्मणाकडील रक्कम संपली. तेव्हा त्या ब्राह्मणाने श्री स्वामी समर्थाना विनंती केली की, ‘आपणच श्री दत्त अवतार आहात. मला इथेच नवस फेडू द्या व आपणही तो मान्य करावा..’ श्री स्वामींनी त्यास अनुमती दिली.

ब्राह्मणाने आनंदाने नवस फेडला. समर्थाच्या कृपेने त्याच्या खर्चाची सोय होऊन मुलाची मुंजदेखील झाली. श्री दत्तांनी ब्राह्मणास दृष्टांत दिला व नवसाची सांगता झाल्याचे सांगितले. महाराजांजवळ तीन प्रकारचे लोक होते. काही लोक निष्काम साधक असत. काही सकाम सेवा करणारे, तर काही लोक केवळ मौज पाहणारे होते.

श्री स्वामी समर्थापुढे हजेरी देण्याकरिता लोकांची झुंबड उडे. दररोज नाना प्रकारची सोंगे घेऊन लोक येत. जो व्यक्ती जसा भाव ठेवी, तसेच महाराज त्याला वागवीत. महाराजांच्या वागण्याचे वर्णन करणारा श्लोकच पाहू या.

मौने मौनी गुणिषु गुणवान पंडिते पंडितो वा।
दोने दीन: सुखिनि सुखवान भोगिनि प्राप्तभोग:।।
मूखे मूखो युवतिषु युवा वाग्मिनि प्रौढवाग्मी।
धन्य: कोऽपि त्रिभुवनजयी योऽ वधूतेऽवधूत:।।

असे श्रीस्वामी समर्थाचे वर्तन असे.

श्री स्वामी समर्थाना झोप लागलेली कुणाच्याही पाहण्यात नाही. मात्र ते डोक्यावर पांघरूण घेऊन निजत असत. पहाटे दोन वाजल्यापासून पांघरूणातूनच अभंगांची कडवी, श्लोक म्हणू लागत. त्यामुळे महाराज आता जागे झाले आहेत. असे लोकांना वाटे. मग कुणाला काही वेदांत, भक्तियोग, हठयोग, राजयोग इत्यादी जे काही प्रश्न विचारायचे असत. ते तेव्हा विचारीत व महाराज सर्वाच्या प्रश्नांना रसाळ वाणीने उत्तर देत असत.

श्री स्वामी त्यांच्या अखेरच्या दिवसांत ‘आपण निजधामास जाणार’ अशी काही चिन्हे दाखवत होते. एकदा ‘सागर’ या गावी गेले असताना, पहाटे पहाटे बाळाप्पा या आपल्या शिष्यास ते म्हणू लागले, ‘आम्हांस उंच जावयाचे आहे, आम्हांस लांब जावयाचे आहे. काय रे, तू आमची नोकरी करण्यास येतोस की नाही?’ ‘एकदा श्री स्वामी अक्कलकोट येथील एका लिंगायत महंताच्या समाधीच्या ठिकाणी गेले. रात्रीची वेळ होती. त्यावेळी ठाकूरदास बुवा कीर्तन करीत होते. बावडेकर पुराणिकही त्या ठिकाणी हजर होते.

एकाएकी श्री स्वामींनी दोन-चार टोपल्या गोव-या आणण्याची आज्ञा केली. नंतर देवळातील श्री महादेवाच्या पिंडीवर गोव-या रचून होम लावला. गावातील लिंगायतांना ही वार्ता समजली की आपल्या गुरुचीच समाधी श्री स्वामी समर्थ जाळत आहेत. महाराजांस शासन करण्यासाठी सर्व लिंगायत तावातावाने देवळात आले खरे, पण महाराजांकडे बघताक्षणीच त्यांच्या तोंडातून शब्दच बाहेर फुटेना. ते जास्त वेळ महाराजांकडे टक लावून पाहू देखील शकले नाहीत. शेवटी ते सगळे जण आल्यापावली निघून गेले.

तो रात्रीचा तिसरा प्रहर होता. पाच प्रहर ती पिंड जळत होती. खरे तर एवढा काळ झळ सोसल्यावर त्या पिंडीचे तुकडे तुकडे व्हायला हवे, पण श्री स्वामींची लीला अगाध आहे. ती पिंड पूर्वीपेक्षा जास्त सतेज, दैदीप्यमान दिसू लागली. अशी हरत-हेचा चिन्हे महाराज दाखवू लागले. पण त्यामागील गर्भितार्थ लोकांना समजला नाही. श्री स्वामी समर्थ दु:चिन्हे दाखवत आहेत, तेव्हा काहीतरी अनर्थ होणार एवढे मात्र सर्वानाच कळून चुकले होते.

निर्वाण व महासमाधी

शके १८००, चैत्र शुद्ध पौर्णिमा. सेवेकरी बिछाना घालावयास लागले. महाराज म्हणाले, ‘आता आम्हास बिछान्यावर निजायचे नाही.’ रात्री महाराजांना थोडा ताप आला व पहाटे ५ च्या सुमारास अमांश झाला. तेव्हापासून महाराजांच्या खाण्या-पिण्यात फरक पडला. वरकरणी महाराजांना काही दुखणे किंवा इजा आहे, असे कोणालाही वाटत नव्हते.

अक्कलकोटचे डॉक्टर-वैद्य, सोलापूरचे डॉक्टर-वैद्य रोज नाडी पाहू लागले. महाराजांच्या प्रकृतीकडे लक्ष देऊ लागले. देवमामलेदार, नारायणराव बर्वे न्यायाधीश आदी अग्रणी भक्तांनी महाराजांच्या हस्ते दानधर्म करविला. चैत्र वद्य त्रयोदशी. दोन प्रहर होईपर्यंत काही विपरित घडेल, असे कोणालाही वाटले देखील नाही.

एक वाजला. महाराजांनी काही जनावरे बाळगली होती. त्यांनी सर्व गाय-वासरे, बैल-घोडी यांना आपल्यापुढे आणा, असे सांगितले. हे ऐकल्यावर मात्र सेवेक-यांचा धीर सुटला. त्यांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सर्व जनावरे महाराजांच्या समोर आणून उभी केली. त्या दिवशी आलेले सर्व नैवेद्य महाराजांनी जनावरांस खाऊ घातले. आपली वस्त्रे महाराजांनी सर्व जनावरांस अंगावर घालावयास सांगितली.

त्या मुक्या जनावरांना काय समजले कोण जाणे, पण त्या वेळेस सर्व जनावरांच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागले. महाराजांनी त्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला व ते आपल्या पलंगावर येऊन बसले. लहान-मोठे असे तमाम लोक जमले होते.

महाराजांनी खूण करताच सेवक-याने तक्क्या आणून दिला. महाराज तक्क्यास टेकून बसले. तक्क्यास टेकून बसल्यावर श्री स्वामी समर्थानी डोळे मिटले. डॉक्टर जवळ होते. त्यांनी नाडी बघितली. तर नाडी मुळी हातास लागेचना. नि:शेष प्राणवायूचे चलन राहिले. मग काय विचारता, एकच आकांत उडाला. सेवेकरी शोक करू लागले. कपाळ आपटू लागले. गडबडा लोळू लागले. केस उपटू लागले.

सर्वांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. इतक्यात अकस्मात श्री स्वामी दयाघन सर्वातर्यामी भगवान् यांनी भक्तांची करुणा ऐकली. डोळे उघडले. प्रेमाने सर्वावर नजर टाकली. जमलेल्या सर्व लोकांना हुरूप आला. जीव भांडयात पडला. स्वामींनी हातानेच गलगला बंद करावा असे सांगितले. सर्वाची नजर श्री स्वामींच्या चेह-यावर खिळली होती. महाराजांनी खालील श्लोक म्हटला.

अनन्याश्चिंतयंतो मां ये जना: पर्युपासते।
तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।

श्लोक म्हणून त्यांनी आशीर्वादाचा हात केला व डोळे मिटले. सर्वानाच एक स्वप्नासारखा भास झाला व पुन्हा रडारड सुरू झाली. महाराज आपला अवतार संपवणार, असे कोणालाही वाटले नव्हते. अवघे लोक शोक करू लागले. ‘महाराज… महाराज…’ अशा हाकांनी अक्कलकोट दणाणून उठले. सारा आसमंत स्वामीरूप बनला होता.

ज्या ठिकाणी श्री स्वामी होते, तिथे जो तो धाव घेऊ लागला. श्री स्वामींचा कांचनवत् तेज:पुंज देह. त्यांच्याकडे पाहिल्यावर सजीवपणाचा भास होत होता. खूप लोक आशेने पाहत होते, की स्वामी काही हालचाल करतील म्हणून, परंतु, ‘योगक्षेमं वहाम्यहम।’ हाच श्री स्वामींचा शाश्वत व अखेरचा संदेश.
स्वामीभक्तांपैकी रामा सुतार वगैरे मंडळींनी लाकडाचे विमान तयार केले. केळीचे खांब व फुलांच्या माळांनी ते सुशोभित केले. विद्वान शास्त्रींनी श्री स्वामींना सर्व पोशाख व अलंकार चढविले. मोठया गजरात शेवटची आरती केली. डंका, निशाणे, जरी-पटक्याचे हत्ती, अंबारीचे हत्ती, शृंगारलेले घोडे, घोडेस्वार, पायदळ, तोफा इत्यादी लवाजम्यानिशी तयारी झाली.

महाराजांना विमानामध्ये, उंच सिंहासनावर बसविले. दारूकाम, नाना प्रकारची वाद्ये, भजन, बुक्का, गुलाल उधळून नामघोषाचा गरज सुरू झाला. बुधवार पेठेतील परमभक्त चोळप्पाच्या घराजवळ पूर्वीच समाधी मंदिर बांधले होते. वर पादुका आणि खाली पाषाणाची बसण्याची गुहा होती. तिथे श्री स्वामींना नेले. समाधीचे दार उघडून श्री स्वामी समर्थास अलंकारांसह आत बसविले. वेदोक्त पूजा व आरती झाली आणि समाधीचे दार बंद केले गेले.

त्या दिवशी अक्कलकोटचाच नव्हे, सा-या अवनीचा प्राण जणू निघून गेला. लोक, प्राणी, पक्षी अवघे वातावरण उदासीन झाले. सगळीकडे टपालाने, तार मागे बातमी गेली. भक्तांपैकी कोणी उपोषणे केली. कोमी सर्वसंग परित्याग केला. कोणी तीर्थे हिंडण्यास गेले. श्री स्वामीराय काही दृष्टांत देतात का, याची देखील कित्येक भक्त वाट पाहत राहिले.

ज्यांची जशी सेवा श्री स्वामीरायांच्या दरबारात झाली, तसतशी त्यांना फळे देखील मिळू लागली. असा हा त्रिगुणात्मक अवतार केवळ लोक तारण्याकरिता झाला होता. आजही श्री स्वामींचे कित्येक भक्त, श्री स्वामींच्या लीला वाचून, ऐहिक संसारामध्ये यशस्वी होतात. परमार्थाचे ज्ञान त्यांना प्राप्त होते. असे सच्चे भक्त खरोखरीचे जीवनमुक्त होतात.

।। रुद्राक्ष धारणेचा काळ।।

$
0
0
Rudraksha Mala

मेष, तुला लग्नी, ग्रहण, संक्रांती, अयन काळ, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग, तसेच इतर पवित्र मंगळवार व शनिवार वगळता इतर दिवशी रुद्राक्ष धारण करावा.

Rudraksha Malaमेष, तुला लग्नी, ग्रहण, संक्रांती, अयन काळ, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग, तसेच इतर पवित्र मंगळवार व शनिवार वगळता इतर दिवशी रुद्राक्ष धारण करावा. (देवी भागवत स्कंद ११) – उत्तम नक्षत्रे- हस्त, अश्विनी, रोहिणी, स्वाती, विशाखा, ज्येष्ठा, उ. फाल्गुनी, उ. आषाढ, उ. भाद्रपदा, धनिष्ठा, पुष्य, श्रवण.

।। रुद्राक्ष धारण करण्याची आवश्यकता।।

भारतीय संस्कृतीनुसार रुद्राक्ष हा साक्षात शिवरूप असून धार्मिकप्रसंगी रुद्राक्ष धारण केल्याने अधिक फलदायित्व लाभते. रुद्राक्षाच्या दर्शनाने जे पुण्य लाभते त्यापेक्षा करोडोपटीने स्पर्शाने पुण्य लाभते. तर तो अंगावर धारण केल्याने याच्या असंख्य पटीने पुण्य लाभते. तर याच्या लक्षकोटीपेक्षाही अधिक पुण्य रुद्राक्षाच्या माळेने जप केल्याने लाभते. (देवीभागवत्-११ स्कंध/अ. ५)

रुद्राक्ष धारणा व मंत्र संस्करण

तथा विना मंत्रेणयोधत्ते रुद्राक्ष भुविमानव: सयातिनरकानधोरान्यावदिंद्राश्चतुर्दश पंचामृतंपचगव्यं स्नानकालेप्रयाजयेत् रुद्राक्षस्यप्रतिष्ठायां मंत्रंपंचाक्षरंतथा त्रियंबकादिमंत्रंचतथातत्रप्रयोजयेत् यद्वा ॐ अधोर ओं-हैं अधोरेतर ॐ -हौं-हां नमस्तेरुद्ररुप-हैंस्वाहा अनेनभिमंत्र्यधारयेत् तथा अष्टोत्तरशतंकार्याचतु: पंचाशदेववा सप्तविंशतिमानावाततोहीनाधमास्मृता.

जो मनुष्य भूलोकी मंत्रावाचून रुद्राक्ष धारण करितो तो मनुष्य चवदा इंद्र आहेत तोपर्यंत धोर नरकांत जातो. रुद्राक्षाला स्नान घालण्याच्या समयी पंचामृते आणि पंचगव्ये ही घालावी. रुद्राक्षाच्या प्रतिष्ठेसाठी ‘ॐ अधोर ॐ -हैं अधोरेतर ॐ -हौं -हां नमस्ते रुद्र रुप -हैं स्वाहा’ या मंत्राने रुद्राक्षांचे अभिमंत्रणकरून धारण करावे. तसेच १०८, ५४ किंवा २७ मण्यांची रुद्राक्षांची माळ करावी. याहून कमी रुद्राक्षांची माळ अधम समजली जाते.

जपमाळ व संस्कारविधी
कुशोदक साहित्य पंचगव्यांनी माळेचे प्रक्षालन करावेव ती पिंपळाच्या पानावर ठेवून ‘‘ॐ -हीं अं आं इं ई उं ऊं ऋ ऋं लृं लृं एं ऐं ओं औं अं अ: कं खं गं घं डं चं जं झं त्रं टं ठं डं ढं णं तं थं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं षं सं हं क्षं’’ या ५० मातृकाक्षरांचा माळेवर न्यास करावा (संदर्भ धर्मसिंधु पृष्ठ ४५५)

गायत्री मंत्राची साधना कोणी करावी

$
0
0
Gayatri Mantra

गायत्री मंत्राची साधना केवळ ब्राह्मणांनीच करावी, अशी काहींची परंपरागत समजूत आहे; पण ती पूर्णपणे चुकीची आहे. कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तीला शुचिर्भूत राहून गायत्री मंत्राची साधना करण्याचा अधिकार आहे. जेवढा ब्राह्मणाला अधिकार आहे, तेवढाच अधिकार हरिजनाला आहे.

Gayatri Mantraगायत्री मंत्राची साधना केवळ ब्राह्मणांनीच करावी अशी काहींची परंपरागत समजूत आहे; पण ती पूर्णपणे चुकीची आहे. वेदांमधील ब्राह्मण याचा अर्थ, जो साधक मनाने आणि शरीराने शुचिर्भूत राहतो तो. त्यामुळे कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तीला शुचिर्भूत राहून गायत्री मंत्राची साधना करण्याचा अधिकार आहे. जेवढा ब्राह्मणाला अधिकार आहे, तेवढाच अधिकार हरिजनाला आहे.

भेदाभेद, जातीपाती व देवांनी-वेदांनी निर्माण केलेल्या नसून स्वार्थी माणसांनीच त्या स्वत:च्या फायद्यासाठी निर्माण केल्या आहेत. हल्ली तर इंग्लंड, अमेरिका, जर्मनी इत्यादी पाश्चिमात्य देशांतील अनेक लोक चांगले आचारविचार बाळगून गायत्री मंत्रांचा आणि वेदांचा अभ्यास करताना दिसतात.

स्त्रियांनाही गायत्री मंत्राची साधना करण्याचा पूर्ण अधिकार आहे. वेद उपनिषदकाळातही स्त्रियांना वेदाध्ययनाचा अधिकार होता. गार्गी, मैत्रेयी या स्त्रिया ब्राह्मवादिनी होत्या. भारद्वाज ऋषींची मुलगी श्रुतावती ही कुमारी ब्राह्मचारिणी तपस्विनी होती.

लोपामुद्रा, धोषा, गोधा, यमी, अदिती, इंद्राणी, लक्ष्मी, सरमा, सार्पराज्ञी, सूर्या, सावित्री, रोमशा, शिवा या स्त्रियांचे ज्ञानवैभव उपनिषदामध्ये पाहावयास मिळते. त्यांचा वेदांचा-उपनिषदांचा अभ्यास आणि तपसाधना कोणत्याही पुरुषाएवढीच श्रेष्ठ होती.

पांडवांची पत्नी द्रौपदी ही फार मोठी विदुषी होती. आद्य शंकराचार्यांशी भारतीदेवी नामक विदुषीने शास्त्रार्थ-वादविवाद केला होता. आधुनिक काळातही अनेक स्त्रिया गायत्री मंत्रसाधनेबरोबरच इतर उत्तम साधना करीत आहेत. त्यात त्यांनी प्रावीण्य मिळविलेले आहे.

गायत्री मंत्राच्या जपाचे वाचिक, उपांशू आणि मानसिक असे तीन प्रकार सांगितलेले आहेत. वाचिक जपाच्या प्रकारात तो दुस-यांना सहज ऐकू जाईल, इतक्या मोठया आवाजात केला जातो, तर उपांशू जपप्रकारात जपाचे उच्चार केवळ जप करणा-यालाच ऐकू येतात. इतरांना ऐकू येत नाहीत आणि मानसिक जप हा साधकाने मनातल्या मनात करावयाचा असतो. हा जप करताना जीभ, ओठ हलत नाहीत.

पहाटे ब्राह्ममुहूर्तावर निसर्गात जाऊन केलेली गायत्री उपासना अधिक फलदायी मानली जाते किंवा सकाळी उगवत्या सूर्याकडे पाहून, त्याचे ध्यान करून गायत्री उपासना केली तर ती अधिक फलदायी आहे. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी आपल्या सोईच्या, शांत एकांत जागी बसून गायत्री मंत्राचा जप करीत साधना करावी. अर्थात त्यासाठी योग्य, जाणकार गुरूचे मार्गदर्शन असणे योग्य ठरेल.

- ९८२०६५४८५७


मुंबईतील रामनवमी उत्सव

$
0
0
Prabhu Shree Ram

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात ही अयोध्यापती प्रभूरामचंद्र यांची जन्मतिथी अगदी उत्साहात साजरी केली जाते.

Prabhu Shree Ramमुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात ही अयोध्यापती प्रभूरामचंद्र यांची जन्मतिथी अगदी उत्साहात साजरी केली जाते. कलियुगात रामनामाचा गजर करण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणी सप्ताहाचे आयोजन केले जाते. सप्ताहाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाबरोबरच रामनामाचा महिमा समाजाला समजावा, हा या मागचा मूळ उद्देश असतो. रामाचे नाव घेतल्याने कामक्रोधाचा लवलेश लागत नाही, असे दाखले आपल्याला अभंगात मिळतात.

मानखुर्दमध्ये रामनवमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

रामनवमीचे औचित्य साधून मानखुर्दमध्ये साई श्रद्धा चॅरिटेबल ट्रस्ट आणि रिक्षाचालक-मालक संघटना महाराष्ट्रनगर यांच्यातर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.

मंडळाचे यंदाचे ८वे र्वष आहे. सप्ताहाचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाला. प्रारंभीचे कीर्तन सूदर्शन महाराज लातूरकर यांचे होते. तर दुस-या दिवशी सुभाष महाराज जाधव यांचे कीर्तन झाले. तिस-या दिवशी महिला कीर्तनकार शारदाताई सूर्यवंशी यांचे कीर्तन होते.

चौथ्या दिवशी साईनाथ महाराज रहाणे यांचे हरिकीर्तन झाले. पाचव्या दिवशी पांडुरंग महाराज पिसाळ यांचे कीर्तन होते. तर सहाव्या दिवशी कीर्तनकेसरी ह.भ.प. नामदेव आप्पा शामगांवकर यांचे पट्टशिष्य ह.भ.प. तुकाराम महाराज उराडे यांचे कीर्तन झाले. सप्ताह सांगताचे कीर्तन भास्कर महाराज पवार यांनी केले.

रामनवमी दिवशी या सप्ताहाची मिरवणूक असेल. सप्ताहात मृदंगमणी आनंद पुकळे, उत्तम उबाळे आणि गायक विष्णू बोडके यांचे सहकार्य लाभले. सप्ताहाचे व्यासपीठ चालक म्हणून पांडुरंग महाराज पिसाळ यांनी कामकाज पाहिले.

टिळकनगर येथे रामनवमीनिमित्त गुलाबबाबा स्मृती सोहळा

टिळकनगर येथील रहिवासी विकास मानपुरे आणि श्री. मानपुरे यांच्या संकल्पनेतून सन २००१ पासून टिळकनगर चेंबूर येथे श्री. गुलाबबाबा स्मृती सोहळा आयोजित केला जातो. दरवर्षी रामनवमीदिवशी गुलाबबाबा स्मृती सोहळा करण्यामागे एक सुरस कथा सांगितली जाते.

विकास मानपुरे यांचे ज्येष्ठ बंधू नंदकिशोर मानपुरे यांना गुलाबबाबांनी स्वप्नात दृष्टांत दिला होता. गुलाबबाबांचे प्रयाण जरी सन २००० मध्ये होळीदिवशी झाले असले तरीही त्यांचा स्मृती सोहळा रामनवमी दिवशी करावा असा आदेश त्यांनी नंदकिशोर मानपुरे यांना स्वप्नात दिला. महाराजांच्या प्रयाणानंतर म्हणजेच २००१ सालापासून टिळकनगर येथे हा स्मृती सोहळा उत्साहात साजरा होऊ लागला.

मुळातच गुलाबबाबांचे भक्त असणारे मानपुरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेकदा महाराजांची प्रचिती आल्यामुळे दरवर्षी ते हा सोहळा उत्साहात साजरा करतात. या सोहळ्यात दरवर्षी मानपुरे यांच्याकडून अन्नदान केले जाते. कोणाचीही मदत न घेता अविरत १७ वर्षे मानपुरे कुटुंबीयांनी हे कार्य सुरू ठेवले आहे. यादिवशी अन्नदानाबरोबरच भजन आणि प्रवचनाचा आनंद भाविकांना दिला जातो.

कल्याणमध्ये रामनवमी उत्सव

रामनवमी उत्सवानिमित्त साईबाबा मंदिर साईसंकुल, बारावे रोड, खडकपाडा, कल्याण येथे साईनाथ महाराज पालखी सोहळा व साईबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १ वाजता साई पालखीची भव्य मिरवणूक आणि ह.भ.प गवारी महाराज (बदलापूर) यांचे भजन होईल.

साईसंकुल ते खडकपाडा सर्कल व साई चौक ते साईसंकुल, कल्याण अशी पालखीची परिक्रमणा असेल. यानंतर सायंकाळी ७.३० वाजता साईंची आरती व प्रसाद होईल. रामनवमीच्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ८.३० साईंच्या मूर्तीवर अभिषेक व पूजा होईल.

यानंतर १० ते १२ सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम होईल. दुपारी २ ते ४ स्वानंद महिला भजन मंडळ (कल्याण) यांचे भजन होईल. सायंकाळी ५ ते ७ ह.भ.प. प्रीतीताई येलमकर (ठाणे) यांचे कीर्तन होईल. यानंतर आरती महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. वरील सर्व कार्यक्रमासाठी विभागातील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थांतर्फे केले आहे.

भारतीय संस्कृती रांगोळी चैत्रांगण

$
0
0
Chaitrangan Rangoli

चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीयेपर्यंत (काही घरांमध्ये ‘अन्नपूर्णा’ ही देवी (चैत्र महिन्यातील चैत्रगौर) देवघरात छोटया पाळण्यात विराजमान होते.) अंगणात रोज वैशिष्टयपूर्ण रांगोळी काढली जाते. तिला ‘चैत्रांगण’ असे म्हणतात. ही रांगोळी भारतीय संस्कृतीच्या विविध प्रतीकांचा उपयोग करून काढली जाते.

Chaitrangan Rangoliएकसारख्या अंतरावर काढलेल्या बिंदूंना (ठिपक्यांना) सारख्या रुंदीच्या पण नाजूक अशा सरळ किंवा वक्र रेघेत जोडून काढलेली सौंदर्याकृती म्हणजे रांगोळी. रांगोळी म्हणजे मांगल्याचे प्रतीक, पावित्र्याचे प्रास्ताविक व प्रसन्नतेची खूण. भारतीय संस्कृतीच्या विकासाचे प्रतिबिंब रांगोळीत दिसते. विविध मूर्त व निराकार संकल्पनांची प्रतीके रांगोळीत दिसतात.

उदा. चंद्र, सूर्य, शंख, चक्र, गदा, पद्म, गोंपद्म इ. आशयसंपन्न प्रतीकांतून भावनांची व विचारांची, सौंदर्यपूर्ण व संस्कृतीपूर्ण अभिव्यक्ती करणे हा रांगोळीचा मुख्य हेतू आहे. रांगोळी म्हणजे भूमीला अलंकृत करणे, भूमीला सजवणे, सुशोभित करणे.

दारात काढलेली छोटीशी पण सुबक रांगोळी घरातील स्वच्छता, शुद्धता, प्रसन्नता, पावित्र्य व मांगल्य यांचे दर्शन घडवते. इतकंच नव्हे तर अंगणात रांगोळी रेखाटणा-या गृहिणींच्या अंतकरणातील सौंदर्य व मनातील सात्त्विक भावनांचे दर्शनही घरात प्रवेश करणापूर्वीच घडते.

‘घराची कळा अंगण सांगे’ असे म्हणतात. यातील ‘कळा’ म्हणजे घराची स्थिती, अवस्था, स्थान, दर्जा, क्षेणी व सौंदर्य. पूर्वी शेणाने सारवलेल्या जमिनीवर शुभ्र रांगोळीचे रेखाटन करून त्यात हळदीकुंकवाची चिमूट टाकली जात असे. अशी रांगोळी देव्हारा, तुळशी वृंदावन, जेवणाची पंगत, उंबरठा इ. ठिकाणी काढली जाते.

पूजापाठ, अन्य धार्मिक कार्यक्रम, शुभकार्य व औक्षणप्रसंगीही रांगोळी काढतात. रांगोळी ही फार प्राचीन कला आहे.

रांगोळीला अधिक उठाव यावा म्हणून ‘गेरू’ या लाल-तपकिरी रंगाच्या मातीने रांगोळी काढण्याची जागा सारवून घेतात व रांगोळीत विविध रंगदेखील भरले जातात. रांगोळीभोवती पणत्या, मेणबत्त्या, फुले इ. ठेवून ती अधिक शुशोभित केली जाते.

आदिमानवाने गुहेत नैसर्गिक रंगाने काढलेली चित्रे ही त्या काळातील रांगोळी म्हणता येईल. चित्रकलेचा उगम तेथूनच झाला असावा. ऐतिहासिक काळातील रांगोळीही प्रसिद्ध आहे.

पेशवाईतील भोजनपंक्ती चांदीच्या ताटाभोवती रांगोळीच्या सुरेख महिरपी काढून सजवल्या जात. त्यानंतर ‘रांगोळ’ नावाचे एक छोटे यंत्र निर्माण झाले, त्यात रांगोळी भरून पंक्तीमध्ये ते जमिनीवर ओढले की एकसारखी रांगोळी ‘झटपट’ काढली जाते. आजकाल रांगोळ्यांचे रंगीबेरंगी ‘स्टीकर्स’ही बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून रांगोळीची हौस भागवली जाते.

भारतीय सौरवर्षाचे जे बारा महिने आहेत, त्या प्रत्येक महिन्याचे धार्मिक महत्त्व आहे. वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याने होते. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीयेपर्यंत (काही घरांमध्ये ‘अन्नपूर्णा’ ही देवी (चैत्र महिन्यातील चैत्रगौर) देवघरात छोटया पाळण्यात विराजमान होते.) अंगणात रोज वैशिष्टयपूर्ण रांगोळी काढली जाते. तिला ‘चैत्रांगण’ असे म्हणतात. ही रांगोळी भारतीय संस्कृतीच्या विविध प्रतीकांचा उपयोग करून काढली जाते.

चैत्रांगणातील मखरात दोन गौरी पाटावर बसवलेल्या काढतात. उन्हाळ्यात शीतलता असावी म्हणून ‘पंखे’, रात्रंदिवस घर प्रकाशाने उजळून निघावे म्हणून ‘चंद्र’, ‘सूर्य’, विष्णूला प्रिय म्हणून ‘शंख’, ‘चक्र’, ‘गदा’; आरोग्याचे प्रतीक म्हणून ‘तुळशी वृंदावन’, सुखकर्ता व दु:खहर्ता म्हणून ‘गणपती’, विद्येची देवता म्हणून ‘सरस्वती’, तेहत्तीस कोटी देव पोटात बाळगणा-या गाईचे प्रतीक म्हणून ‘गोपद्म’, दुधदुभते विपुल प्रमाणात मिळावे, गोधन नांदावे म्हणून ‘सवत्स धेनू’, कोमलतेचे प्रतीक म्हणून ‘कमळ’, शंकराला प्रिय असा नाद निर्माण करणारा ‘डमरू व वात’, कफ, पित्त या शरीरातील त्रिदोषांचे शमन करणारा ‘त्रिशूळ’, लक्ष्मीच्या स्वागतासाठी ‘दोन पावले’, घरचा रक्षणकर्ता म्हणून ‘नाग’, षड्विकारांवर विजय मिळवण्यासाठी ‘कासव’, शुभचिन्ह म्हणून ‘स्वस्तिक’, ‘कलश’ व ‘तोरण’ व जीवनाचा सन्मान करणारा नारळ म्हणजेच ‘श्रीफल’, सौभाग्य सूचक असे ‘हळदी कुंकवाचे दोन करंडे’, ‘फणी’, ‘मंगळसूत्र’, जीवनातील मधुरतेसाठी ‘आंबा’, श्रीकृष्णाला प्रिय असे ‘मोरपिस’ व ‘बासरी’ अशी विविध प्रतीके वापरून ‘चैत्रांगणाने’ भूमीला अलंकृत केले जाते.

आपल्या पूर्वजांची कल्पकता व कृतज्ञता खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. किती सुंदर विचार, किती सुंदर अर्थ या ‘चैत्रांगणात’ सामावलेला आहे. पाडव्यापासून सुरू होणा-या नवीन वर्षात आम्हाला ज्ञानसंपदा, आरोग्य, ऐश्वर्य समृद्धी लाभो व आमच्या घरात सुख, शांतता, शीतलता, प्रकाशमयता, तेजोमयता, गतीमानता नांदो, अशी सुंदर प्रार्थना या चैत्रांगणातील प्रतीकांद्वारे केलेली आहे.

 - ९००४६७०१८५

अनुभव

$
0
0
Shri Swami Samarth

९० वर्षापूर्वी श्री. जगन्नाथ शंकर शेठ यांचे विद्यार्थी श्री. विष्णू आण्णा थोरात यांनी लिहिलेल्या श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमधील अध्याय सहावा, श्लोक बारावा.

Shri Swami Samarthभक्ती नाही अंतरी। दांभिक साधनाते करी।।
तयांते स्वामी नरहरी।। प्रसन्न कैसे होतील।।

(नव्वद) ९० वर्षापूर्वी श्री. जगन्नाथ शंकर शेठ यांचे विद्यार्थी श्री. विष्णू आण्णा थोरात यांनी लिहिलेल्या श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमधील अध्याय सहावा, श्लोक बारावा.

‘भक्ती नाही अंतरी’ म्हणजे स्वामींचा जप करतो, पण मनात भक्ती अजिबात नाही. याचा अर्थ काय? आम्ही जी स्वामींची भक्ती करतो ती भक्ती स्वामींपर्यंत जाऊन पोहोचत नाही किंवा श्री स्वामींच्या चरणी सदर भक्ती रुजू होत नाही! कोणत्याही ईश्वराची भक्ती ही एक प्रोफेशनल परीक्षा आहे, येथे शंभरपैकी पन्नासला पासिंग आहे.

भक्त ईश्वराची भक्ती कशी करतो? ईश्वराला फुले, हार, तुरे वाहून किंवा त्या देवाचे नामस्मरण करून किंवा त्या देवतेच्या संदर्भात मोल-मजुरीची कामे करणे किंवा त्या देवतेसाठी धन दान देणे किंवा त्या देवतेची किंवा मूळ देवतेची पोथी वाचणे किंवा त्या देवतेच्या नावाने जेवणाच्या वेळी अभदान करणे, किंवा शिजवलेले अभ जेवणाच्या वेळी भक्तजनांना खाऊ घालणे इत्यादी..

आता या भक्तीमध्ये दांभिकपणा असणे म्हणजे काय? ईश्वरासाठी धन देणे, पण दिलेले धन हे सगळ्यांच्या निदर्शनास आणणे-बोलून दाखविणे याचे नाव दांभिकपणा. म्हणजे दिलेल्या दानात गुप्तता न राखणे, त्यात सत्पात्री वृत्ती नसावी.

उदा. समर्थाच्या चरणी अभदान करणे; पण ते वारंवार बोलून दाखविणे याचे नाव दांभिकपणा! समर्थाचरणी मोलमजुरीची कामे करणे, पण ती सुद्धा बोलून दाखविणे किंबहुना माझ्यासारखे काम कोणीच करीत नाही असे बोलून दाखविणे. यांचे नाव दांभिकपणा, मग या भक्तीवर स्वामी प्रसन्न कसे होतील? भगवंत आपल्या भक्ताला तो भक्त जसा आहे तसा सांभाळण्याचा प्रयत्न करतो.

हळूहळू त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न भगवंत करतो. हा प्रयत्न प्रवचन, विचारांची देवाण-घेवाण, पुस्तकांच्या वाचनातून होतो. अगदीच सुधारणा होत नसेल तर श्री स्वामी समर्थानी शेवटचे वाक्य सुंदराबाई, चोळप्पा यांच्या उदाहरणावरून सांगितले आहे, ‘अजूनही सुधार!’ अंतिम निर्णय भक्ताचा! त्यांच्यावर श्री स्वामी समर्थाचे शिक्कामोर्तब!

उदा. एखाद्या श्री स्वामी समर्थ भक्ताला खूप खोकला झाला आहे. त्यासाठी औषधोपचार करणे गरजेचे आहे. केवळ स्वामी बघतील असे म्हणून गप्प बसण्यात काहीच अर्थ नाही. भरपूर खोकला झाल्यानंतर औषध न घेता मनसोक्त भजी खाण्यात काहीच अर्थ नाही. असे करणे म्हणजे आपल्या देवतेची जबाबदारी वाढविणे आणि वास्तविकदृष्टया आपले आयुष्य कमी करून घेण्यासारखे आहे. म्हणूनच खरोखर जो स्वामीभक्त आहे तो खोकला होणार नाही याची काळजी घेईल. म्हणजेच तेलकट, तुपकट खाणार नाही. म्हणूनच भक्तीमध्ये ज्ञानाची गरज आहे.

तेलकट, तुपकट खाऊ नका, यात ज्ञान काय आहे? तर तेल-कट करा, तुप-कट करा आहारात तेलाचा वापर, तुपाचा वापर गरजेपुरताच असावा. तेथे अतिरेक नसावा म्हणजे खोकला होणार नाही. भक्तीमधील दांभिक साधना म्हणजे भक्त त्या देवतेला म्हणजे स्वामींनाच सांगतो, ‘‘स्वामी माझा खोकला जाऊ द्या!’’ भक्तीमध्ये ज्ञान असणे गरजेचे आहे, म्हणजेच काय आपल्या देवाला आज्ञा करू नका. माझा खोकला जावा म्हणूनच मी नामस्मरण करतो आहे. अशा प्रकारची व्यापारीवृत्ती भक्तीमध्ये नसावी. ‘करीती देवासी जो व्यापार त्यांचा बुडतो संसार।।’ अशी तुकोबांची भक्ती होती.

देवा माझा खोकला जाऊ दे असे म्हणायचे आणि देवा म्हणून भरपूर तेलकट, तुपकट भजी खायची हे सुद्धा बरे नाही. देव तारी त्याला कोण मारी हे खरं आहे; पण त्या देवाचे नावसुद्धा मनापासून घेणे गरजेचे आहे. ‘‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’’ हे पण खरे आहे; पण त्या खाटल्यावर बसून हरीचे नामस्मरण सुद्धा होणे गरजेचे आहे. कारण नामस्मरण या शब्दात शेवटी ‘मरण’ हा शब्द आहेच! म्हणूनच मागायचे काय आणि कसे मागायचे हे समजले पाहिजे.

माणूस वस्त्र बदलतो, घर बदलतो, कपडे बदलतो; पण भक्ती करून सुद्धा स्वत:चा स्वभाव बदलू शकत नाही. आपला स्वभाव रागीट असेल तर भक्ती-नामस्मरण करून तो प्रेमळ निर्मळ झालाच पाहिजे. कारण रागीट या शब्दामध्ये राग-ईट हे दोन शब्द आहेत.

पांडुरंग भक्तांचे राग घेण्यासाठीच ईटेवर उभा आहे. म्हणून पांडुरंगाला तुम्ही तुमचा राग देणार आहात का? आता राग या शब्दामध्ये र + आग असे दोन अर्थ आहेत? त्याचे काय? म्हणून पाच वर्षाच्या लखूला स्वामी सांगतात. माझ्यासमोर ठेवलेले गूळ-खोबरे खाऊ नको, त्यात त्या भक्ताचे मनोविकार राग असू शकतात.

श्री बाळप्पा यांना सुद्धा स्वामी म्हणायचे, माझ्यासमोर ठेवलेले प्रसाद तू खाऊ नकोस. तुझे अंतरंग तर खूप निर्मळ आहे, त्यात काहीही बिघाड होऊ देऊ नकोस. येथून सरळ पंजाबपर्यंत चालत जा, अग्निहोत्राचे कोर्स कर. तू माझा दुसरा नामदेव आहेस. म्हणजेच स्वामी भक्तांचे अंतरंग ओळखून त्यावर कृपा करतात.

म्हणून रचनाकार सांगतात,

भक्ती नाही अंतरी। दांभिक साधनाते करी।
तयांते स्वामी नरहरी।। प्रसन्न कैसे होतील!
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।

श्री स्वामी समर्थ गुरुदर्शन सोहळयातील चमत्कार

$
0
0
Swami Samartha

गुरुपौर्णिमा उत्सवानंतर सर्व भाविक सेवेक-यांना प. पू. गुरुमाऊलींचे दर्शन व्हावे यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, मुलुंडतर्फे सामुदायिक गुरुदर्शन सोहळयाचे आयोजन दि. ०२/०९/२००९ रोजी एका भव्य मोकळया पटांगणात केले होते. 

Swami Samarthaगुरुपौर्णिमा उत्सवानंतर सर्व भाविक सेवेक-यांना प. पू. गुरुमाऊलींचे दर्शन व्हावे यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, मुलुंडतर्फे सामुदायिक गुरुदर्शन सोहळयाचे आयोजन दि. ०२/०९/२००९ रोजी एका भव्य मोकळया पटांगणात केले होते.

या सोहळयासाठी प. पू. गुरुमाऊलींचे आगमन सकाळी ठीक १० वाजता झाले होते. मुख्य कार्यक्रम संध्याकाळी ४ वाजता संपन्न होणार होता. सकाळच्या सत्रात सेवा केंद्रास भेट व इतर चर्चा झाल्या.

सकाळपासून आकाश काळयाकुट्ट ढगांनी अंधारलेले होते. सेवेक-यांच्या मनात गुरुदर्शन सोहळयाचा आनंद व पर्जन्याची भीती अशी द्विधा अवस्था दिसत होती.

कार्यक्रम ठरलेल्या वेळेस सुरू झाला. असंख्य हजारो भाविकांना प.पू. गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. नादब्रह्म, जयजयकार व गुरुदर्शन सोहळा. प. पू. गुरुमाऊलींचे दर्शन घेण्यासाठी भली मोठी रांग लागली होती. मंत्रमुग्ध वातावरणात एकच नाद होता, श्री स्वामी समर्थ. नालासोपारा सेवा केंद्रातील सेवेक-यांवर जबाबदारी होती शिस्तबद्ध पहा-याची व संरक्षणाची.

गुरुदर्शन सोहळा सुरू असताना, संरक्षणाची जबाबदारी स्वीकारलेल्या सेवेक-यांपैकी चार सेवेक-याचे लक्ष गेले, एक पांढरी साडी परिधान केलेल्या, लांब केस असलेल्या, उंच अशा तेजपुंज स्त्रीकडे. तिच्या तेजाने ते चारही जण स्वत:ला विसरूनच गेले. त्यांनी पाहिले ते वर्णन असे -

त्या स्त्रीने रांगेत दर्शन घेतले. प.पू. गुरुमाऊलींच्या समोर जाऊन चरणांजवळ गुलाबाचे फूल ठेवले, काही संवाद साधला. नंतर परत फिरण्यासाठी ती स्त्री मागे वळली व नंतर अंतरधान पावली. तिचा शोध घेण्यासाठी त्या चारही सेवेक-यांनी आजूबाजूचा संपूर्ण परिसर पादाक्रांत केला. परंतु ती तेजपुंज स्त्री परत दिसलीच नाही. असो, गुरुदर्शन सोहळा संपला. प. पू. गुरुमाऊली अचानक उठल्या व म्हणाल्या,

।। आता आम्हाला जायलाच हवे, सकाळपासून आमच्या प्रस्थानाची वाट तो पर्जन्य बघतो आहे।।

व सर्व भाविकांना आशीर्वादाचा हात देत त्या गर्दीतून प.पू. गुरुमाऊलींच्या गाडीचे दिवे लागले, गाडी सुरू झाली व त्याच क्षणाला अवघ्या दोन मिनिटांच्या कालावधीत धो-धो असा पर्जन सुरू झाला.

अशी आनंद पर्वणी संपल्यावर आम्हा मुंबईतील ५०/६० सेवेकरी आनंदात पुनश्च प. पू. गुरुमाऊलींकडे दिंडोरीला गेलो.

प. पू. गुरुमाऊलींना संपूर्ण वृत्तांत सांगितला. परंतु अचानक नालासोपा-यातील चाचर सेवेकरी ज्यांचेकडे संरक्षणाची सेवा होती, ते उठले. श्रीस्वामी समर्थ प. पू. गुरुमाऊलींना मुजरा केला व घडलेल्या प्रसंगाचे वर्णन करून विचारले, ‘माऊली, आम्हाला सांगा, ती तेजपुंज स्त्री कोण होती?’ प. पू. गुरुमाऊलींनी हास्यमुद्रा करून सेवक-यांची उत्सुकता बघून सांगितले, ती तेजपुंज स्त्री

।। मुंबईची मुंब्रा देवी होती, ती आमच्या दर्शनास आली होती।।

सर्व सेवेक-यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फार मोठा जयजयकार करून हात उंचावून प. पू. गुरुमाऊलींचे दर्शन घेतले. सर्व सेवेक-यांच्या डोळयात आनंदाश्रू आले.

नाम घ्या श्रीहरीचे

$
0
0
Swami Samarth Maharaj

श्री स्वामी समर्थ महाराजांची दिनचर्या गुरुलीलामृत ग्रंथात अनेक वेळा आलेली आहे. श्री दत्त अवतारात, नृसिंह सरस्वती स्वामी अवतारात म्हणा किंवा त्याआधीच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात उपासना, कडक वैराग्य आणि टोकाची तपश्चर्या सांभाळल्याचे दिसते.

Swami Samarth Maharajश्री स्वामी समर्थ महाराजांची दिनचर्या गुरुलीलामृत ग्रंथात अनेक वेळा आलेली आहे. श्री दत्त अवतारात, नृसिंह सरस्वती स्वामी अवतारात म्हणा किंवा त्याआधीच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात उपासना, कडक वैराग्य आणि टोकाची तपश्चर्या सांभाळल्याचे दिसते. परंतु श्री स्वामी समर्थ अवतारात संपूर्ण विरुद्ध आचरण घडले. महाराज स्वच्छंद हिंडत-फिरत, मनाला वाटेल तिथे बसत, फिरत.

वाटेल तिथे झोपत, जेवत, कुठेही भविष्यवाणी करत. एक अवलिया साधू वाटावेत, आध्यात्मिक भाषेत त्याला ब्रह्मपिशाच्च म्हणतात. कधी कधी इतके विक्षिप्तपणे वागत, बोलत की त्याचा अर्थ लवकर कळत नसे. कधी लहान मुलांच्या बरोबर खेळात रंगून जात. कधी स्मशानात हाडांचा खेळ मांडत. तर कधी निवडुगांच्या काटय़ावर पहुडलेले असत. कधी राजवाडय़ात तीन तीन दिवस मुक्काम ठोकीत. कधी नांगरलेल्या शेतातून पळत सुटत.

सामान्यांच्या व्यवहारापेक्षा वेगळीच कृती करत. एकदा तर महाराज अचानकपणे लक्ष्मी तोफेच्या तोंडात आपले तोंड घालून बसू लागले. आज ही तोफ अक्कलकोट येथे कन्या प्रशालेच्या प्रवेशद्वारावर अनाथ अवस्थेत आहे. याचा अर्थ लोकांना नंतर समजला.

प्लेग नावाच्या रोगाची साथ आली आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले. अशा अनेक सूचक गोष्टी श्री महाराजांनी केल्या. थोडंसं चर्चेत गु-हाळ लांबलं खरं पण ते गरजेचं होत. नेहमी महारांचा विषय निघाला की, किती सांगू आणि किती नाही? असं होतं. कारण त्या अनंतकोटी ब्रह्मांडनायकाच्या ठिकाणी आहे.

तर आपण दिनचर्येबद्दल बोलत होतो. महाराज रात्री कितीही वेळ जागलेले असले तरी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे तीन वाजता उठलेलेच असत. पहाटे लगेच स्नान, पूजा, आरती होत असे. मग दिवसभर आलेल्या भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध असत. ब्रह्मांडाचा नायकच, देवांचा अवतार त्याला कसली आलीय रात्र आणि दिवस. खरं तर रात्रंदिवस केवळ लोक उद्धारासाठीच आलेले. भक्तांच्या इच्छेनुसार महाराज भोजन नैवेद्य घेत असत.

अक्कलकोट आणि अक्कलकोटच्या परिसरात महाराज सतत फिरत असत. सामान्य लोक, राजे-राजवाडे, महाराजे, परदेशी पाहुणे, क्रांतीकारण, संतसज्जन, दूरदूरची मंडळी महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्या दर्शनास येत असत. परंतु त्यांना कधीही विन्मुख पाठविलेले नाही. सेवेक-यांच्या करवी त्या सर्वाची व्यवस्था होत असे.

दिवसभराचा योगक्षेम पाहिल्यानंतर सायंकाळी शेजारती, विडा, दक्षिणा, विनवणी, पालखी, क्षमायाचना होऊन मग मंचकी निद्रा असा दिनक्रम असे. यातून महाराज किती श्रम झाले तर कधी थकलेले दिसत नव्हते. सदैव प्रसन्न आणि कार्यमग्न असणारे महाराज भूत, वर्तमान, आणि भविष्यातील घटनासुद्धा अगदी सहज सांगत असत. या दैनंदिनीचा आपल्याला कोणता फायदा होईल.

तर पहाटे उठणे हे आरोग्याच्या दृष्टीने, श्वासाच्या दृष्टीने अति महत्त्वाचे असते. पहाटे मेंदू ताजातवाना असतो. त्यामुळे पहाटे केलेला अभ्यास कायमस्वरूपी लक्षात राहतो. बुद्धी तल्लक होते. शुद्ध प्राणवायू पहाटे मोठय़ा प्रमाणात असतो. त्यामुळे श्वसनाचे, मेंदूचे, पोटाचे, डोळयांचे, पापण्यांचे आजार नाहीसे होतात. अल्हाददायक वातावरणाचा उपयोग कसा करावा हे महाराजांनी या कृतीतून दाखवून दिलेले आहे. आजही वटवृक्ष मंदिर अक्कलकोट येथे बरोबर चार वाजता पहाटे उठविले जाते आणि बरोबर पाच वाजता महाराजांची काकड आरती होते.

सकाळी लघुरुद्राभिषेक, साडेअकरा वाजता नैवेद्य, विश्रांती, चार वाजता सांय. दूध-फळांचा नैवेद्य, रात्री पावणेआठ वाजता शेजारती केली जाते. इतकी धावपळ असतानासुद्धा महाराजांनी कधी उभे राहूनच नैवेद्य स्वीकारला असे कुठेही आढळणार नाही. चरित्रामध्ये जागोजागी ताट, पाट, रांगोळी, उदबत्त्या, समई, पंचपक्वान्न, नैवेद्य, सेवेक-यांच्या समवेत, भक्तांच्या पंगतीत असाच जेवणाचा उल्लेख आहे.

हिंदू धर्म पद्धतीत खाली मांडी घालून जेवायला बसण्याचीच शास्त्रशुद्ध पद्धत आहे. प्रसन्न वातावरणासाठी रांगोळी, बसण्यासाठी पाट, उदबत्त्या, धुपांचा घमघमाट, अत्तर, समईची ज्योत तेवत ठेवणे, सगळयांनी एकत्र जेवायला बसून प्रसंगी श्लोक म्हणताना शेवटी देवाच्या नावाचा जयजयकार करणे म्हणजे नामस्मरण करत जेवणाची पद्धत आहे.

नंतर विडा, दक्षिणा दिली जाते. जेवणाच्या सुरुवातीस ज्या भगवंताच्या इच्छेनुसार हे जेवण मिळाले त्याच्याविषयी कृतज्ञता, नम्रभक्ती व्यक्त करण्याची पद्धत आहे. किती सुंदर काव्य आहे. पाहा काय म्हणायचे असते आणि त्याचा अर्थ काय तेही पाहा?

वदनी कवळ घेता। नाम घ्या श्रीहरीचे।।
सहज हवन होते। नाम घेता पुकाचे।।
जीवन करी जिवीत्वा। अन्न हे पूर्ण ब्रह्म।।
उदर भरण नोहे। जाणिजे यज्ञ कर्म।।

यातून केवढा त्याग आणि समर्पणाची भावना निर्माण होते याचा विचार व्हावा. देवा तुझ्या कृपेमुळेच मला हे यज्ञकर्माचे भाग्य मिळते, म्हणून तुझे नाम मीच नव्हे तर ज्या सर्वाना हे भाग्य मिळालेले आहे त्या सर्वाना घ्यावे म्हणजे या यज्ञकर्मात मुखावाटे मिळालेल्या सर्व आहुत्यांचे पचन होईल.

त्या श्री स्वामी नुसते नाव जरी घेतले तरी हे अन्न सहजासहजी पचते. कारण हे अन्न त्यानेच निर्माण केलेले आहे. ते माझे जीवत्व जपणार आहे. म्हणून हे एक महान यज्ञकर्म आहे. ते पोट भरण्याचे काम नाही. तोच निर्माण करतो आणि तोच जेवतो आहे. मी नव्हे. ही समर्पण भावना आहे. म्हणून शेवटी कृष्णार्पणमस्तु म्हटले जाते.

श्री स्वामींचे नामस्मरण आणि त्याचा अर्थ

$
0
0
Shri Swami Samarth

Shri Swami Samarthश्री स्वामींचे भक्त निरनिराळे नामस्मरण करतात. मूळ शब्द ‘नामस्मरण’ त्याचे विभाजन नाम: स्मरण! ‘स्मरण’ या शब्दामध्ये स: – अमरण! आणि अ-मरण या शब्दामध्ये अ-मरण! असा अर्थ बोध आहे. उदाहरणासाठी ‘श्री स्वामी समर्थ’ हा सहा अक्षरी जप आहे, मंत्र आहे. म्हणाल तर जप नाहीतर मंत्री नक्की! पण श्री स्वामींचे जप हे मंत्र सुद्धा आहे. कारण ते स्वयंभू मंत्र आहेत. हे जप श्री स्वामींच्या भक्तांना उत्स्फूर्तपणे सुचलेले-स्फुरलेले आहेत. श्री स्वामी समर्थ या जपांत शेवटी ‘अ’ आहे, जसे ‘दत्त’ शेवटी असते. ज्या जपाची सुरुवात ‘ॐ’ ने होत नाही त्याला जप असे म्हणतात. ज्या जपाची सुरुवात ओमने आणि शेवट ओमने होतो त्याला महामंत्र असे म्हणतात. मंत्राचे हवन होणे गरजेचे आहे. तो एक स्वतंत्र विषय आहे. कोणत्याही मंत्राच्या शेवटी/ जपाच्या शेवटी ‘अ’ येत असेल तर त्याला सामर्थ्यशाली/ शक्तिशाली जप असे म्हणतात. उदा. श्री स्वामी समर्थ, श्री दत्त इत्यादी. व्यवहारांत, कुटुंबात आम्ही म्हणतो, आजच आत्ताच मामाची आठवण काढली आणि मामा आला. भेटला म्हणजे आठवण काढली आणि दत्त म्हणून समोर उभा राहिला.

आता श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र! हा जप श्री बाळप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला, कारण त्यांचे पोट दुखायचे! नाभीस्थानांत एक छोटीशी विषाची पुडी अडकली आहे. ती सव्वा लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल. आता हा सव्वा लाख जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळप्पा सौ. बाळप्पा यांना पडला. कोणी ग्रामदेवतेचा तर कोणी कुलदेवतेचा सव्वा लाख जप केला, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी बाळप्पा श्री स्वामी समर्थासमोर भल्या पहाटे बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण मनांतल्या मनांत पुटपुटू लागले. श्री स्वामींनी मान हलवून होकार दिला. एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि सव्वा लाख जप कर, तू आपोआप बरा होशील. त्याप्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामींनी अक्कलकोट येथे स्थापन केलेला हाफक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री. बाळप्पा गेले तेथे सतत एक रकमी सव्वा लाख जप केला आणि नाभिस्थानातून विषाची बारीक पुडी बाहेर आली. म्हणून श्री स्वामी समर्थ हा शास्त्र शुद्ध-स्वयंभू आणि स्वत: श्री स्वामी समर्थाची अनुमती असलेला जप मंत्र आहे.

आता या जपाचा अर्थ काय आहे. श्री म्हणजे ऐश्वर्य, औदार्य, स्वामी म्हणजे स्वत:मधील ‘मी’चे स्वाहा: करणारी शक्ती आणि समर्थ म्हणजे असमर्थाना समर्थ करती एक शक्ती! श्री स्वामी समर्थ हा एक सहा अक्षरी मंत्र आहे. हा जप आम्ही एकशे आठवेळा जेव्हा करतो तेव्हा त्याचे एक आवर्तन पूर्ण होते. हा जप सहा अक्षरी आहे. तेव्हा सहा माळी जप सर्वसामान्य झाला तर जपाची सहा आवर्तने होऊन त्या जपाची परीपूर्णता जप करणा-याला लाभते. सहामाळी जप म्हणजे १०८ / ७६ = ६४८ इतका. आता ६४८ पैकी ६५ जप संख्येचे हवन झाल्यास त्या जपाची संपूर्ण परीपूर्णता जपकर्त्यांला त्या वास्तूला लाभते. आता हाच जप उदा. श्री स्वामी समर्थ एकूण दहा लोकांनी (भक्तांनी) केला तर १०८ /७१० = १०८० इतकी स्वामी भक्तांना जप करणा-यांना १०८० इतकी हॉर्स पॉवर शक्ती लाभते आणि वातावरण शुद्धीकरण्यास (वायुमंडळ) मदत होते. त्यामुळे निसर्गातील सात्विक शक्ती साधकांकडे आकर्षित होतात. त्यांच्याकडून चांगली कामे ईश्वरी शक्तींकडून करून घेतली जातात. अशा प्रकारचे जप सामर्थ्य निर्माण करताना जप करणा-यांमध्ये अहंकार, स्वार्थी वृत्ती, मी एकटा हे करीन, स्वामी समोर येणारी धनसंपदा घरी नेणे, स्वामी समोर येणारी वस्र्े, खाद्य पदार्थ, सोने-नाणे घरी नेणे अशी वृत्ती असल्यास त्याचे वाईट परिणाम साधकांवर होतात. घरच्या कोर्ट कचे-यांत अपयश येणे, घरातल्या स्त्रीयांमध्ये रोगवृत्ती बळावणे, विस्मरणासारखे रोगवृत्ती, आजारपण बळावणे, श्री स्वामींचा हात सोडून दुस-या पंथात जाणे इत्यादी गोष्टी बळावतात.

आता पुढे जाऊन जर ज्ञानाचा अर्थ काढला, तर श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ समाधी घेऊन शंभर वर्षे होऊन गेली. म्हणजे श्री स्वामी समर्थ सहा अक्षरी मंत्री आहे. ही सहा अक्षरे १०८ वेळा म्हणायची तर एकूण जप हा १०८ /७६ = ६४८ म्हणजे एक १०८ मण्यांची माळ घेऊन हा जप केला तर तो ६४८ वेळा स्मरण झाले जप झाला. एकूण दहा माळी जर जप झाला तर तो ६४८० इतका जप झाला. हीच श्री स्वामी समर्थ जपाची फार मोठी जादू आहे. म्हणूनच सर्वानी मिळून जप केलेला स्वामींना खूप आवडत असे, त्याला सांघिक जप असे म्हणतात. सांघिक जप खूप मोठ्ठी सांघिक नामस्मरणाची शक्ती निर्माण करते, कारण प्रत्येक अक्षरात मंत्रोक्त, वेदोक्त शक्ती आहे. आमचा वारकरी सगळ्यात गोष्टींनी श्रीमंत का आहे? कारण तो जपतो,

।। रामकृष्ण हरी जयजय रामकृष्ण हरी।।

कारण या जपांतला प्रत्येक शब्द नामरूप आहे. यात १६ अक्षरांचा समावेश आहे. हा जप १०० वेळा जर केला तर तो १६०० वेळा जप होतो. त्या जपाची शक्ती त्या वारक-याबरोबर कायम राहते. म्हणून वारीच्या वेळेस हे वारकरी जबरदस्त अभदान करू दाखवितात. यांचे नाव वारकरी ते जपतात राम कृष्ण हरी, कोणाची हिंमत आहे यांच्यावर वार करण्याची!

सर्व बोलू या ।। श्री स्वामी समर्थ।। श्री स्वामी समर्थांचा एक दुर्मीळ फोटो आहे, त्यांत श्री स्वामी समर्थांच्या हातात जपाची माळ आहे. एकदा त्यांचे लाडके भक्त श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात ‘‘स्वामी आम्ही तुमचा, तुमच्या नावाचा जप करतो तुम्ही कोणता जप करता? कोणाचा जप करता?
श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात. जो माझा जप करतो, त्याला मी जपतो! म्हणूनच घराघरांतून सांघिक जप झाला पाहिजे.

।। श्री स्वामी समर्थ।।

‘जसा आहार तशी बुद्धी’

$
0
0

Swami Samarthaश्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रातील वामनबुवा वैद्यांनी गुरुलिलामृत ग्रंथातील महाराजांची दैनंदिनी अपण मागील दोन भागातून पाहिली आहे. विषय आपला चालला होता. महाराजांच्या नैवेद्याचा आणि त्यानंतर मिळालेल्या प्रसादाचा. संपूर्ण चरित्राचा विचार केला तर महाराज त्यांना वाटेल तिथे जात असत, हिंडत असत, फिरत असत. भोजन मात्र शिस्तीनेच. धर्मशास्त्राने जो आहार ठरवून दिलेला आहे. तो घेण्याविषयीचे जे नियमधर्म आहेत. त्याच चौकटीत राहून घेत असत हे स्पष्ट होते. त्यांना तर वाटले हा आहार, नैवेद्य घेणे योग्य नाही. तेव्हा ते पूजा, आरती, नैवेद्य संपूर्णपणे नाकारत असत. महासाध्वी सुंदर बाईंचे भाग्य किती थोर पहा? अखिल ब्रह्मांडाचा नायक, योगीयांचाही राजा साक्षात परब्रह्म, सुंदराबाई काटगावकर यांच्या हातचा नैवेद्य स्वीकारत होते. काय पुण्याई असेल या महान साध्वीची? परंतू कधी नियम धर्माची पायमल्ली झाली असे लक्षात येताक्षणी जागेवर महाराज त्या नैवेद्याचा आव्हेर करुन जाणीव करून देत.

याचे कारणही तसेच आहे. चांगले, शुद्ध मनाने तयार केलेले अन्न, सात्विक अन्न घेतल्यास तशीच सात्विक बुद्धीही होते. प्रत्येक जेवणाला यज्ञकर्म म्हटलेले आहे. म्हणून आपण जसा आहार घेऊन तशीच आपली बुद्धी तयार होत असते. हे विज्ञान आहे. सर्वात उत्तम जेवण कुठले तर आपल्या घरी तयार केलेले जेवण हे सर्वोत्तम असते. घरी आपली काळजी घेणारी माऊली उत्तम स्वयंपाक करते. ते तयार होत असताना तिच्या मनात पवित्र भावना असते. की घरातील सगळय़ांनी पोटभर जेवण करून तृप्त व्हावे. कारण या अन्नामध्ये इतर कुणाच्याही वासना, नजरा, इच्छा, भावना दडलेल्या, पडलेल्या नसतात. त्यामुळे जी माऊली आपल्या हाताने तयार केलेला स्वयंपाक मोठय़ा प्रेमाने वाढते, तीची अपेक्षा एवढीच असते की, घरचे जेवण खाऊन सगळय़ांनी बलशाली व्हावे. त्यांना दीर्घायुष्य मिळावे. सुदृढ होऊन घरातील रोगराई पळून जावे. सुख समाधान तृप्ती मिळावी. मोठय़ा प्रेमाने, आनंदाने घरातील सर्वाना एका निश्चित वेळी एकत्र, पाटावर मांडी घालून बसावे. एकत्र भोजनाचा आनंद घ्यावा. त्यामुळे होते काय? तर घरातील स्नेहभाव, जिव्हाळा वाढतो. आग्रहाने जेवण होते. विचारांचे आदान प्रदान होते. बहिण, भाऊ, आईवडील, पती-पत्नी, भावजय, नणंद, आजोबा, आजी, काका, काकू, पुतण्या अशी नाती दृढ होतात. एकत्र कुटुंब पद्धतीही भारतात त्यामुळे तर आत्तापर्यंत टिकून राहिली होती. आता जशी पाश्चात्य पद्धती आपल्याकडे तशी आपलीच संस्कृती आपणच देशोधडीला लावली. असे सांगण्यासारखं बरंच काही आहे परंतू विषयांतराचा धोका आहे.

श्रोतेहो! मी कुणावर टिका करतो. असे नाही तर कलियुगाचे भविष्य आपण मुळग्रंथातील तिस-या चौथ्या अध्यायात वाचावे. कलियुगात धर्माची स्थिती कशी असेल? याचे इत्यंभूत वर्णन तिथे आलेले आहे. त्याला तुम्ही आम्ही अपवाद कसे असणार?

मनुष्यायुर्बल शतसंवत्सर। औरहात प्रमाणशरी।।
कूट द्रव्य अस्थि व्यवहार। अन्नमय प्राण असे।।

कलियुगामध्ये मनुष्याचे आयुष्यमान जास्तीतजास्त शंभरवष्रे असेल. आठवीतला म्हणजे हाताचा पंजा पसरल्यावर जेवढे माप होईल असे आठ इतकी उंची देहाची असेल. जास्तीत जास्त वाममार्गाने पैसा कमवून जगण्याकडे जास्त कल असेल. असल्या कमविलेल्या धनावरच जगण्यसाठी अन्न मिळविले जाईल. अशा अन्नावरच माणूस जगेल. मग त्याची बुद्धी कशी असेल? याचा वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही.

जसे अन्न तशी बुद्धी हा विचार आपण वरती पाहिला आहे. त्याच्या नेमकी उलटी परिस्थिती सर्वत्र रुढ होऊ लागला आहे. घरात अन्न बनविण्याचा कंटाळा किंवा ते अपमानास्पद वाटू लागल्यामुळे हॉटेलचे गोड लागू लागले आहे. घरात देव खिळय़ाला अडकवलेले. किचनमध्ये खाली एका कोप-यात किंवा त्यांचे अस्तित्वच गायब झाल्यामुळे नैवेद्याचा प्रश्नच राहिला नाही. पार्टी, बुफे च्या नावाखाली चप्पल, बुट घालूनच तामसी आहार घेण्यात भूषण वाटू लागल्यामुळे दिवाण खाण्यात, टिव्ही बघत किंवा संपूर्ण कपडे घालून बुटांसकट उभ्याने हातात ताट नव्हे प्लेट घेऊन भिका-यासारखे श्वान भोजन करण्यामध्ये उच्चवर्गातील असल्याचे साक्षात्कार प्रत्येकाला होऊ लागला आहे. जास्त प्रमाणात तामसी आहार म्हणजे मसाला युक्त तेलकट पदार्थ खाणे, भारतीय हवामानातील तयार होणा-या पालेभाज्या, अन्न पदार्थ खाणे म्हणजे खेडवळ असल्याचे समजून परदेशी, चायनिज, पिझ्झा, बर्गर, मांसाहारी पदार्थ जास्त प्रमाणात रस्त्यावरील गाडय़ावर, महागडय़ा हॉटेलात कसल्याही अवस्थेत खाणे म्हणजे श्रीमंताचे, प्रतिष्ठेचे खाणे समजले जाऊ लागले आहे. त्यांच्या सोबतीला मद्याचे प्रमाण तर विचारायलाच नको. हे सगळे भूषणावह प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यामध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. अभक्ष्य भक्षणच हे.

याचा परिणाम काय झाला पहा? एकत्र कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली. स्वैराचार वाढला. वडिलधारी माणसे घरातील अडगळ वाटू लागली. घरातील प्रेम, जिव्हाळा, नाती संबंध संपली. स्वार्थ वाढीस लागला. देश, समाज, राष्ट्र, आपले गाव, घर यांच्या विषयीचा अभिमान वाटेनासा झाला. धर्म, देव, संत, सज्जन या कल्पना वेडगळ वाटू लागल्या. किंवा त्या नाटकी वाटू लागल्या. आपलं ते सगळं वेडगळ आणि परदेशाचे सगळे स्टँर्डड, उच्च वाटू लागले. हे झाले सगळे सार्वजनिक.

वैयक्तिक परिणाम काय झाले तर? घरातील संवाद संपला. स्वैर स्वातंत्र्य मिळाले. घरात प्रत्येकाला काही न काही आजार निर्माण झाले. मधुमेह, रक्तदाब, किडनी, पोट, यकृत, मेंदूचे विकार बळावले. अपचन, अ‍ॅसिडीटी मुळे डॉक्टर व्यवसाय तेजीत आला. खाली बसता येईना. मणक्याचे, गुढग्याचे, मानेचे त्रास सुरु झाले. मनाची अस्थिरता वाढली. लोक रागीट, आक्रमक, स्वार्थी बनले. भोगवाद वाढला इतकेच.

श्री स्वामी समर्थ महाराज


गायत्री मंत्र उच्चार

$
0
0
YANGAYATRI MANTRA

ज्यांना गायत्री मंत्राचे योग्य उच्चारण करता येणे शक्य होणार नाही त्यांना सूर्यध्यान करताना पुढीलप्रमाणे काही सूर्यमंत्र म्हणता येतील. ज्यांना शक्य होईल त्यांनी तो मंत्रोच्चार करावा.

YANGAYATRI MANTRAध्येय: सदा सवितृमण्डलमध्यवर्ती
नारायण: सरसिजासनसंनिविष्ट:
केयूरवान् मकरकुण्डलवान् किरिटी
हारी हिरण्मयवपुर्धृतशंखचक्र:।।

६ ॐ -हां मित्राय नम:।
६ ॐ -हीं रवये नम:।
६ ॐ -हूं सूर्याय नम:।
६ ॐ -हैं भानवे नम:।
६ ॐ -हौं खगाय नम:।
६ ॐ -ह: पूष्णेन नम:।
६ ॐ -हां हिरण्यगर्भाय नम:।
६ ॐ -हीं मरिचये नम:।
६ ॐ -हूं आदित्याय नम:।
६ ॐ -हैं सवित्रेय नम:।
६ ॐ -हौं अर्काय नम:।
६ ॐ -ह: भास्कराय नम:।

आदित्यस्य नमस्काराने ये कुर्वन्ति दिने दिने।
जन्मान्तर सहस्षु दारिद्रय़ं नोपजायते।।
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम्।
सूर्यपादोदकं र्तीथ जठरे धारयाम्यहम्।।

।। रुद्राक्ष सिद्ध कसा करावा?।।

$
0
0
rudraksha

रुद्राक्षावर पंचामृत, पंचगव्य, गंगाजल, अष्टगंधजल,चंदन तेल, रक्तचंदन (सहाणेवर उगाळलेले), हिना, मजमुआ, खस, शुद्ध चंदन तेल, विभूती/ भस्म (अग्निहोत्रातील किंवा नाणगापूर अथवा अन्य जागृत स्थानातील) गाईचे तूप, राईचे तेल इ. वस्तूंनी कमी कमी ३ ते २७ दिवसापर्यंत त्यावर पुढील मंत्रांचा अभिषेक करावा.

rudrakshaरुद्राक्षावर शिवषडाक्षर मंत्र, महामृत्युंजय मंत्र, पुरुष सुक्त, श्रीसुक्त, अथर्वशीर्ष, विष्णूसहस्र् नामावली, सूर्यकवच, नवनागस्तोत्र, गौरीकवच, इ. च्या मंत्राभिषेकाने नंतरच तो रुद्राक्ष धारण करावारुद्राक्ष माळ तयार करण्यापूर्वी माळेत ओवण्याचा प्रत्येक मणी मुख, वजन व तेजस्वीपणा अभ्यासून निवडून घ्यावा. वजनाने हलका मणी माळेत गुंफू नये. सर्व मणी साधारणपणे सारख्या आकाराचे असावेत. माळेतील प्रत्येक मण्यावर मंत्रसंस्करण करून नंतरच माळ धारण करावी.

।। रुद्राक्षाचे मुख, उपयोग व मंत्र।।

एकमुखी रुद्राक्ष : एकाग्रता, मन:शांती, आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती, पवित्र वातावरण निर्मिती, इच्छित प्रयत्नांत यशदायक, अधीदैविक, अधीभौतिक व आध्यात्मिक शक्तिदायक.
मंत्र : ।। ॐ -हीं नम:।।

दोनमुखी रुद्राक्ष : स्त्रियांना गर्भधारणेवेळी शक्तिदायक, लोकसंग्रहकारक
मंत्र : ।।ॐ नम:।।

तीनमुखी रुद्राक्ष : विद्याप्राप्ती, कार्यक्षेत्र सिद्धी, दिव्यशक्ती प्राप्तीसाठी, साधनेमध्ये लवकर फल देणारा
मंत्र : ।। ॐ -हीं नम:।।

चारमुखी रुद्राक्ष : इच्छित विवाह प्राप्ती, धर्म, अर्थ, काम, मोक्ष (४ पुरुषार्थाचे गुणप्रदान करणारा)
मंत्र : ।। ॐ -हीं नम:।।

पंचमुखी रुद्राक्ष : तामसिक विचारांना मुक्त करणारा, रक्तदाबावर योग्य नियंत्रण ठेवणारा
मंत्र : ।। ॐ -हीं नम:।।

सहामुखी रुद्राक्ष : विद्यार्थ्यांना लाभदायक, संसारिक क्लेशांवर नियंत्रण
मंत्र : ।। ॐ -हीं हुं नम:।।

सातमुखी रुद्राक्ष : गर्भवती स्त्रियांना मानसिक व शारीरिक शक्ती देणारा, रोग, दारिद्रय़ निवारक, समृद्धीकारक, दैवीसिद्धी साधनेत यशदायी, स्वप्नदोष नाशक
मंत्र : ।। ॐ हुं नम:।।

आठमुखी रुद्राक्ष : वाईट विचारांवर नियंत्रण ठेवणारा, संकटकालीन स्थितीत धैर्यदायी
मंत्र : ।। ॐ हुं नम:।।

नऊमुखी रुद्राक्ष : नैसर्गिक आपत्ती समयी मनोबल वाढविणारा, वाईट विचारांपासून मुक्त करणारा
मंत्र : ।। ॐ -हीं हुं नम:।।

दहामुखी रुद्राक्ष : मानसिक व शारीरिक रोगावर नियंत्रण करण्यास मदत करणारा
मंत्र : ।। ॐ -हीं नम:।।

अकरा मुखी रुद्राक्ष : प्रयत्नांना इच्छित यश देणारा, मनोबल वाढविणारा, घरी व देव्हा-यात ठेवल्यास वास्तूमध्ये मंगलमय वातावरण निर्मिती करणारा
मंत्र : ।। ॐ -हीं हुं नम:।।

बारा मुखी रुद्राक्ष : संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त, चिकित्सावृत्ती वाढविणारा, मन:शांतीदायक व मानसिक विकारांपासून मुक्ती.
मंत्र : ।। ॐ क्रों श्रों रों नम:।।

तेरा मुखी रुद्राक्ष : संसारिक सुख देणारा, तर्कशक्ती व आध्यात्मिक शक्तीचा उत्कर्ष करणारा.
मंत्र : ।। ॐ -हीं नम:।।

चौदा मुखी रुद्राक्ष : वाईट कर्मापासून दूर ठेवणारा, शारीरिक व मानसिक संतुलन निश्चित ठेवणारा.
मंत्र : ।। ॐ नम:।।

पंधरा ते एकविस मुखी : सर्व सिद्धिदायक गुणधर्म असलेले रुद्राक्ष
मंत्र : शिवषडाक्षर मंत्र, महामृत्युंजय मंत्र, शिवस्तुती

गौरी शंकर : सर्व सिद्धिदायक गुणधर्म असलेले
मंत्र : ।। ॐ गौरी शंकरायनम:।।

गौरी पथ : सर्व सिद्धिदायक गुणधर्म असलेले
मंत्र : सर्वमंगल्य मांगल्येशिवेसर्वाथ साधिके। शरण्येत्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।

प्रतीक दर्शन ॐ

$
0
0
omm

जन्माला येणा-या प्रत्येक अर्भकाच्या मुखातून बाहेर पडणारा ‘टय़ांव, टय़ांव’ हा स्वर हे ओंकाराचेच रूप आहे. पण ते विकृत आहे, असे जाणकारांचे मत आहे. वाणी आणि प्राण हे मूलभूत दांपत्य मानले आहे. यांच्या संयोगाने ओंकाराचा उच्चार होतो.

ommओंकार: सर्वमंत्राणामुत्तम: परिकीर्तित:।
ओंकारेण प्लवैनैव संसाराब्धिं तरिस्यसि।।

सर्व मंत्रांमध्ये ओंकाराला उत्तम प्रसिद्धी मिळालेली आहे. या ओंकाररूपी होडीनेच आपण हा भगसागर (संसारसागर) तरू शकू. सृष्टी निर्माण करणा-या ब्रह्मदेवाने एकाच अक्षराने सर्व देव, वेद, यज्ञ, शब्द इत्यादींना जाणून घेण्याच्या इच्छेने तपाला आरंभ केला.

तेव्हा त्याला ‘‘ॐ’’ हे अक्षर दिसले व त्याने ते प्रथम उच्चारले, म्हणजेच ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रथमच अविकृत ओंकार बाहेर आला. जन्मला येणा-या प्रत्येक अर्भकाच्या मुखातून बाहेर पडणारा ‘टय़ांव, टय़ांव’ हा स्वर हे ओंकाराचेच रूप आहे. पण ते विकृत आहे, असे जाणकारांचे मत आहे. (संदर्भ : शास्त्र असे सांगते! वेदवाणी प्रकाशन)

जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक प्राणी हा मर्त्य आहे व मृत्यूचे भय प्रत्येकाला आहे. मृत्यूच्या पाशातून सुटण्यासाठी देवांनी वेदांचा आश्रय घेतला. परंतु तेथेही मृत्यू त्यांच्या मागे गेला. तेव्हा देवांनी वेदांमध्ये अभेद्य व दुर्गम असलेल्या ओंकाराचा आश्रय घेतला. तेथे मात्र मृत्यूला प्रवेश मिळाला नाही व देव अमर झाले. ओंकाराचे हे सामर्थ्य लक्षात घेऊन ऋषींनी मानवाला असा सल्ला दिला की, ज्याला मृत्यूच्या भयापासून (मृत्यूपासून नव्हे) सुटका हवी असेल त्याने ओंकाराची उपासना करावी. (छंदोग्य उपनिषद- आख्यायिका)

प्रणव व उद्गीय ही ओंकाराचीच नावे आहेत. प्रणव म्हणजे प्रकर्षाने केलेली स्तुती किंवा उत्तम स्तोत्र तर उद्गीय म्हणजे ही उच्च किंवा उत्तम स्तुती. ज्याची उत्तम स्तुती करण्यासाठी शब्द अपुरे पडतात, वाङ्मय पोहोचत नाही ते म्हणजे अर्थात परब्रह्म. परब्रह्माचे स्तवन करण्यासाठी सर्व शब्द ज्यात सामावले जातील, अशा ओंकाराचा प्रयोग ऋषीजनांनी केला.

वाणी आणि प्राण हे मूलभूत दांपत्य मानले आहे. यांच्या संयोगाने ओंकाराचा उच्चार होतो. म्हणजेच सोप्या भाषेत वाणी आणि प्राण यांनी ओंकाररूपी बालकाला जन्म देऊन आपले दांपत्य जीवन कृतार्थ बनवले. ओंकारातील अ, उ, म या तीन मात्रा मानवी शक्तीचे प्रतीक आहेत. मानवाची सर्व कर्मे, देह, बुद्धी व मन याद्वारे होत असतात. ओंकार या सर्व कर्माना प्रभावी व तेजस्वी बनवतो.

वेदांतील सर्व मंत्रांचा प्रारंभ ओंकारानेच होतो. ओंकाराशिवाय सर्व मंत्र अपूर्ण किंवा लंगडे समजले जातात. ओंकारपूर्वक केलेली सर्व कर्मे सात्विक होतात. ओंकार आपल्याला प्रत्येक कर्मात मार्गदर्शक म्हणून काम करतो. इतकेच नव्हे तर कर्मात राहिलेले दोषदेखील ओंकार दूर करतो.

ओंकाराची इतकी महती समजल्यावर प्रत्येकालाच ओंकाराची उपासना करावीशी वाटेल. पण फक्त ओंकाराची उपासना करण्यासाठी योग्य अधिकार किंवा पात्रता प्राप्त करून घ्यावी लागते. ज्याने जीवनात द्वंद्वामध्ये संतुलन राखले आहे, ज्याची वृत्ती पूर्ण अनासक्त किंवा वैराग्यमय आहे. त्यालाच फक्त ओंकाराची उपासना करण्याचा अधिकार आहे.

(संदर्भ-योगसूत्र) मग सामान्य माणसाचे काय करावे? सामान्य माणसाने केवळ ओंकाराचा जप न करता सगुण साकार भगवंताची उपासना करावी व त्यावेळी हरि ॐ, ॐ नम: शिवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय इ. जप करावा.

जाहिराती, वर्गणीपुस्तके, पत्रव्यवहार, दुकानाच्या पाटया, स्तुतिपर गीते अशा विविध कारणांसाठी ओंकार कागदावर वा अन्यत्र उतरवला जातो, पायदळीही तुडवला जातो. अतिपवित्र ओंकार सर्वसाधारण रूपात आणून त्याचे पावित्र्य नष्ट होऊ नये याची दक्षता सर्वानीच घेऊ या व ओंकाराचे सामर्थ्य व पावित्र्य अबाधित राखू या.

प्रतापगडावरील श्री भवानीदेवी

$
0
0
devi

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडास भेट देण्यासाठी आपणास प्रथम महाबळेश्वर गाठावे लागते. महाबळेश्वरपासून प्रतापगड साधारणपणे २१ कि.मी. अंतरावर आहे.

deviसातारा जिल्ह्यातील प्रतापगडास भेट देण्यासाठी आपणास प्रथम महाबळेश्वर गाठावे लागते. महाबळेश्वरपासून प्रतापगड साधारणपणे २१ कि.मी. अंतरावर आहे. महाबळेश्वरहून प्रतापगडास जाण्यास बससेवा उपलब्ध आहेत. प्रतापगडावर शिवकालीन रितीप्रमाणे आजही दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो.

समुद्रसपाटीपासून ३५५६ फूट उंचीवर प्रतापगड वसलेला आहे. अभ्यासकांनी केलेल्या वर्णनात महाबळेवरच्या जटात व पारघाटाच्या ओठात प्रतापगड उभारण्यात आलेला आहे. सन १६५८ च्या सुमारास या किल्ल्याची निर्मिती मोरोपंत यांच्या मार्गदर्शनाखाली २ वर्षात पूर्ण करण्यात आली. कोकण व वाई प्रांत यांना जोडणा-या वाटेवरील या डोंगराच्या भौगोलिक स्थानाचे महत्त्व शिवछत्रपतींनी हेरले.

याच प्रतापगडाच्या भौगोलिक सामर्थ्यांचा उपयोग करून शिवछत्रपतींनी अफजलखानाचा व त्याच्या सन्याचा समूळ पराभव केला. अफजलखान वधाने शिवछत्रपतींची एक शूर धाडसी व युद्धनिपुण सेनापती अशी प्रतिमा समस्त हिंदुस्थानभर तयार झाली. सन १६५९ ते १८१८ या प्रदीर्घ कालखंडात सन १६८९मधील काही महिन्यांचा कालावधी सोडल्यास प्रतापगड शत्रूच्या ताब्यात कधीच नव्हता.

शिवप्रतापाचा जिवंत साक्षीदार असणारा प्रतापगड महादरवाजा भक्कम टेहळणी बुरूज, चिलखती बांधणीची बुरूज रचना, भवानी मंदिर, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार, जिजाऊंचा वाडा, दिंडी दरवाजा, रेडका बुरूज, केदारेवर महादेव मंदिर, सदर यशवंत बुरूज, घोरपड शिल्प, वेताळ मंदिर, कडेलोट स्थान इत्यादी अनेक गौरवशाली ऐतिहासिक अवशेष जपून आहे.

गडावरील भवानीमातेची अष्टभूजा महिषासुरमíदनीची सिंहारूढ मूर्ती लक्षवेधक आहे. शिवाजीराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून ही मूर्ती घडवून घेतली व जुलै १६६१मध्ये तिची गडावर स्थापना केली. देवीचा गाभारा लहानसा असून येथील शिल्पकाम लाकडीच आहे. देवीच्या खर्चासाठी म्हणून पंधरा गावांचे उपन्न लावून दिल्याची नोंद आहे. याच देवीने छत्रपती शिवरायांना भवानी तलवारीचा प्रसाद दिला अशी कथा जनमानसात रूढ आहे.

परमानंद कवीच्या संस्कृत शिवभारतात ‘भवानी तलवार’ हे नाव का पडले याचा संदर्भ देण्यात आलेला आहे. प्रतापगड येथील मूर्तीसंबंधी चिटणीस बखरीत पुढील उल्लेख मिळतो ‘पर्वताचा राज लीलासेन याचे राज्यापावेतो जाऊन त्रिशूळगंडकी व श्वेतगंडकी आणि सरस्वती संगमी शिळेचा शोध करून उत्तम शिळा प्राप्त झाली. सिलपी प्रांतीचे हुनरवंद आणून मूर्ती सिद्ध केली आणि मोरोपंत प्रधान यास मागमे पाठवून प्रतिष्ठा केली.

सभासद बखरीत भवानीने राजांना मार्गदर्शन केल्याची व अभय दिल्याची अनेक वर्णने आहेत. प्रतापगडाच्या ऐतिहासिक साधनांचे संकलन मांडताना व संशोधित करताना येथील भौगोलिक स्थानाच्या महत्त्वाचे व बदलत्या बदलांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

शिवकाळात नेपाळचा राजा लीलासेन याच्याकडे मंबाजी नाईक पानसरे यांना पाठवून श्वेतगंडकी त्रिशूलगंडकी व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावरील उकृष्ट शिळा मिळवून गडावरील सध्या असणारी भवानी घडवली गेली, असाही संदर्भ मिळतो. अभ्यासकांनी प्रतापगडास युद्धशास्त्र, शिल्पशास्त्र, स्थापत्यशास्त्र, ऐतिहासिक संदर्भ अशा विविध अंगांनी न्याय दिला पाहिजे.

बोला जय जय हनुमान..

$
0
0
haminoon

‘अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान.. एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान..’ आणि टाळ, मृदंग, भजन, कीर्तनाच्या गजरात दुमदुमलेली चैत्र पौर्णिमेची पहाट ही रामभक्त हनुमंताच्या जन्मसोहळयाने रंगून जाणारी. पहाटेपासूनच श्री हनुमान जन्मसोहळयाची चाललेली आरास ही अवघा परिसर भक्तिमय करणारी.

haminoonगुढीपाडवा, रामजन्म सोहळयाइतकाच दिमाखदार ठरणारा हा सोहळा मानावा लागेल. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयावेळी श्री हनुमंताचा जन्मसोहळा ठिकठिकाणी थाटात साजरा केला जातो. भजन, कीर्तन आणि टाळ- मृदंगाच्या गजरात पहाटेपासूनच या सोहळयाला प्रारंभ केला जातो.

प्रत्येक गावाच्या सीमेवर हनुमंताचं मंदिर पाहावयास मिळतं. संकटमोचक म्हणून रामभक्त हनुमंताची पूजा केली जाते. हनुमान या शब्दातील ‘ह’ ब्रह्माचा, ‘नु’ अर्चनाचा, ‘मा’ लक्ष्मीचा, व ‘न’ पराक्रमाचा द्योतक मानला जातो.

राजदूत, नीतिज्ञ, विद्वान, गायक, बुद्धिमान म्हणूनही हनुमानाचा उल्लेख विष्णू पुराणात आला आहे. अंजनी सुत, पवन पुत्र हनुमंताला शिवावतार तसेच रुद्रावतारही म्हटले जाते. श्रीराम भक्त हनुमानाला बळ, बुद्धी, विद्या, शौर्य व निर्भयतेचे प्रतीक मानले जाते व संकटसमयी हनुमानाचे स्मरण केले जाते.

हनुमंताच्या पूजनासाठी विशेषत: रुईच्या पानांची माळा, तेल, शेंदूर अर्पण केला जातो. आज ठिकठिकाणी हनुमान मंदिरामध्ये साजरी होणारी हनुमान जयंती ही त्या त्या ठिकाणचे वैशिष्टय़ जपणारी आहे. प्रत्येक ठिकाणी हनुमंताच्या नामाचा होणारा गजर आणि भजन-कीर्तनामध्ये तल्लीन होणारी भक्त मंडळी पाहिली की आजही आपली श्रद्धा आणि संस्कृती येथे मोठया भक्तीभावाने जपली गेल्याचे दिसून येते.

आज प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात हनुमान जयंती उत्सव मोठया उत्साहाने, जल्लोषात साजरा केला जातो. भाळी शेंदुराचा टिळा लावून टाळ-मृदंगाच्या गजरात ‘पवनपुत्र हनुमान की जय’चा जयघोष करत हनुमंताची पालखी मिरवणूक गावागावातून, शहराशहरातून दिमाखात मंदिरापर्यंत आणली जाते. या निमित्ताने श्री हनुमंताच्या नामाचा दुमदुमणारा नाद, मंदिरामध्ये होणारी हनुमान चालिसा, मारुती स्तोत्राचे होणारे पठण, तर काही ठिकाणी श्रीराम, लक्ष्मण, सीता, मारुती यांच्या चलचित्रांची मिरवणूक, देखावे, आदीतून हनुमान जयंती सोहळा साजरा होताना दिसतो.

पालखीमध्ये मारुतीची मूर्ती, प्रतिमा बसवून, ढोल- ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. उत्सवाच्या पाच दिवस अगोदर हनुमान मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा घातली जाते. रामनवमीला जेवढा भाविकांचा प्रतिसाद मिळतो, तेवढाच प्रतिसाद हनुमान जयंती उत्सवाला ठिकठिकाणी मिळताना दिसतो.

प्रत्येक ठिकाणी मंदिरांमध्ये हनुमंताच्या विविधरूपी प्रतिमा पाहावयास मिळतात. काही मंदिरांमध्ये उभा मारुती, गदाधारी बसलेला मारुती, दक्षिणमुखी मारुती, तर काही ठिकाणी भिंतीमध्ये कोरलेली मारुतीची प्रतिमा, संपूर्ण शेंदरी रंगाची मारुतीची प्रतिमा, तर काही ठिकाणी काळया दगडामध्ये कोरलेल्या मारुतीच्या मूर्ती पाहावयास मिळतात. विशेषत: ही मंदिरे गावाच्या, शहराच्या वेशीवर आढळून येतात. तर बहुतांश ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांमध्ये हनुमंताची मंदिरे पाहावयास मिळतात.

खरं तर प्रत्येक ठिकाणी हनुमंताच्या मूर्ती आणि मंदिरे असलेली दिसून येतात आणि त्या ठिकाणच्या हनुमंताच्या मूर्तीची, मंदिराची एक वेगळी आख्यायिकाही असलेली दिसून येते. काही ठिकाणी मोठी मंदिरे तर काही ठिकाणी हनुमंताची छोटी मंदिरेही पाहावयास मिळतात. गावाची सीमा, समुद्राच्या किना-यालगत, खडकावर अशा स्वरूपातही मंदिरे आज अस्तित्वात आहेत.

तर काही मंदिरे ही उंच डोंगरावर असलेली दिसून येतात. या मंदिरामध्ये दर शनिवारी रुईच्या पानांची माळा, तेल, शेंदूर, काळे उडीद आदी अर्पण करून पूजा केली जाते आणि हनुमान जयंती सोहळयाला तर मंदिराची केली जाणारी आरास, तोरण-पताका, दिव्यांची रोषणाई, मंडप, स्थापन केली जाणारी मंडळं यातून एक आगळा उत्सव साजरा होताना दिसतो.

आपल्या ठिकाणच्या उत्सवासाठी प्रत्येक भक्त मंडळींचा उत्साह पणाला लागताना दिसतो. यातूनच आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम हा देखील उत्सव आणि उत्साहाचाच भाग मानावा लागेल. रामजन्माच्या सोहळयानंतर आठ दिवसांनी चैत्र पौर्णिमेला उत्साहात होणारा हनुमान जयंतीचा सोहळा हा भक्तांना नतमस्तक करणाराच.

हनुमान जयंती सोहळयाच्या औचित्याने सुंठीचा ‘सुंठवडा’ हा प्रसाद म्हणून सर्व भक्तांना वाटला जातो. समुद्राच्या काठावर बांधलेली मंदिरे आणि या मंदिरात साजरे होणारे उत्सव, आणि दिव्यांच्या रोषणाईने तेजाळणारे पाण्यातील प्रतिबिंब पाहता या झगमगाटाने सारा परिसरच उत्साही आणि तेजोमय होऊन जाताना दिसतो.

Viewing all 1081 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>